शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना रब्बी पीकविम्याचा दावा मंजूर

By admin | Updated: January 22, 2015 00:32 IST

बुलडाणा जिल्ह्यातील २११३ शेतकरी लाभार्थ्यांना नुकसानीपोटी मिळणार ६६ लाख.

गिरीश राऊत / खामगाव (जि. बुलडाणा): गतवर्षी २0१३-१४ मधील रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकाचे नुकसानीपोटी जिल्ह्यातील २११३ शेतकर्‍यांना रुपये ६६ लाख ३१ हजार ६३१ रुपयांचा पीकविम्याचा दावा मंजूर झाला आहे. सदरची रक्कम लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून, या भरपाईमुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी येणारे नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान होते. यामुळे ज्याचे सर्वकाही शेतीपिकावरच अवलंबून आहे. अशा शेतकर्‍यांसमोर वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे संकट उभे राहते. यामुळे शेतकर्‍यांना शासन मदत देत असले तरी जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी काही वर्षांंपासून शासनाच्या अनुदानातून तसेच काही अंशी रक्कम शेतकर्‍यांकडून घेऊन पीकविमा उतरविला जातो. याच योजनेतून २0१३-१४ च्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील २५७२ शेतकर्‍यांनी गहू व हरभरा पिकाचा विमा कृषी विभागामार्फत विमा कंपनीकडे उतरविला होता. यापोटी १९ लाख १५ हजार ४१५ रुपयांची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे भरली होती. तर याच वर्षी नैसर्गिक संकट येत गारपीट तसेच वादळी वार्‍यामुळे जिल्ह्यात अनेक भागातील गहू व हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा मंडळनिहाय सर्व्हे महसूल तसेच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यात आली सोबतच या नुकसानीच्या आधारे शेतकर्‍यांनी काढलेल्या पीकविम्याचा दावासुद्धा मंजूर झाला आहे, त्यामुळे जिल्ह्यात ज्या भागात नुकसान झाले तसेच ज्या शेतकर्‍यांनी विम्याची रक्कम भरली होती अशा जिल्ह्यातील एकूण २११३ शेतकर्‍यांचा पीकविम्याचा दावा मंजूर झाला आहे., त्यामुळे ६६ लाख ३१ हजार ६३१ रुपये नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहेत. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रब्बी हंगामात ज्या शेतकर्‍यांचा पिकविमा दावा मंजूर झाला असल्याचे स्पष्ट केले.