शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

विजेचे बिल थकवले, नांदुऱ्याचे पाणी तोडले; ऐन उन्हाळ्यात नांदुरा शहरावर पाणी टंचाईचे गडद सावट

By अनिल गवई | Updated: March 30, 2024 15:42 IST

या कारवाईमुळे नांदुरा शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने शहरात एकच खळबळ माजली असून वीज जोडणी कापल्याची नामुष्की नांदुरा पालिकेवर ओढवली आहे.

खामगाव: नांदुरा शहरासाठी जीवन वाहिनी ठरणार्या नांदुरा शहर पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी महावितरणने कापली आहे. कोट्यवधी रूपयांची वीज बिल थकल्याने महावितरणने ही कारवाई केली. या कारवाईमुळे नांदुरा शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने शहरात एकच खळबळ माजली असून वीज जोडणी कापल्याची नामुष्की नांदुरा पालिकेवर ओढवली आहे.प्राप्त माहितीनुसार, नांदुरा शहरातील नागरिकांना खामगाव तालुक्यातील गेरू माटरगाव येथील धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी नांदुरा येथील जलशुध्दीकरण केंद्र ते गेरू माटरगाव धरणापर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली आहे. जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द केलेले पाणी नगर पालिका पाणी पुरवठा योजनेद्वारे विविध वार्डातील तसेच वस्तींतील नळांना पुरविण्यात येते. दरम्यान, गत काही वर्षांत पाणी पुरवठा योजनेतंर्गत महावितरणचे कोट्यवधी रूपयांचे देयक थकले आहे. नागरिकांकडून पाणी पट्टीची वसुली थकल्याने पालिकेने वीज वितरणच्या वीज बिलाचा भरणा केला नाही म्हणून, महावितरणच्या अधिकार्यांनी कनिष्ठ अभियंता अनिल जयस्वाल यांच्या नेतृत्वात नगर पालिका पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी कापली. त्यामुळे पालिका प्रशासनासोबतच नियमित पाणी पट्टीचा भरणा करणारे नागरिकही अडचणीत सापडले आहेत.

शहराचा पाणी पुरवठा ठप्पकोट्यवधी रुपयांच्या थकीत बिलासाठी वीज जोडणी कापण्यात आली. मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाचा जोर वाढत असतानाच, शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. शहरातील नियमित कराचा भरणा आणि पाणी पट्टी धारकांनाही पाणी पुरवठा करण्यास आता पालिका असमर्थ ठरत आहे.थकीत वसुलीमुळे पालिका वेठीस -कोट्यवधी रुपयांची पाणी पट्टी नागरिकांकडे थकली आहे. अशा परिस्थितीत पाणी पुरवठा योजना चालविणे नांदुरा नगर पालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असतानाच आता पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणीही कापण्यात आली आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासन संकटात सापडले आहे.थकीत वीज बिलासाठी पाणी पुरवठा योजनेची जोडणी कापण्यात आली आहे. ही वस्तुस्थिती आहे. यापुढे पाणी पट्टीचा नियमित भरणा करणार्यांनाही पाणी पुरवठा करणे अशक्य आहे. नागरिकांनी पाणी पट्टी भरून सहकार्य केल्यास परिस्थिती सुधारता येईल.नीरज नाफडे, पाणी पुरवठा अभियंता, नगर परिषद, नांदुरा... 

टॅग्स :electricityवीजWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई