शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

विजेचे बिल थकवले, नांदुऱ्याचे पाणी तोडले; ऐन उन्हाळ्यात नांदुरा शहरावर पाणी टंचाईचे गडद सावट

By अनिल गवई | Updated: March 30, 2024 15:42 IST

या कारवाईमुळे नांदुरा शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने शहरात एकच खळबळ माजली असून वीज जोडणी कापल्याची नामुष्की नांदुरा पालिकेवर ओढवली आहे.

खामगाव: नांदुरा शहरासाठी जीवन वाहिनी ठरणार्या नांदुरा शहर पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी महावितरणने कापली आहे. कोट्यवधी रूपयांची वीज बिल थकल्याने महावितरणने ही कारवाई केली. या कारवाईमुळे नांदुरा शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने शहरात एकच खळबळ माजली असून वीज जोडणी कापल्याची नामुष्की नांदुरा पालिकेवर ओढवली आहे.प्राप्त माहितीनुसार, नांदुरा शहरातील नागरिकांना खामगाव तालुक्यातील गेरू माटरगाव येथील धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी नांदुरा येथील जलशुध्दीकरण केंद्र ते गेरू माटरगाव धरणापर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली आहे. जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द केलेले पाणी नगर पालिका पाणी पुरवठा योजनेद्वारे विविध वार्डातील तसेच वस्तींतील नळांना पुरविण्यात येते. दरम्यान, गत काही वर्षांत पाणी पुरवठा योजनेतंर्गत महावितरणचे कोट्यवधी रूपयांचे देयक थकले आहे. नागरिकांकडून पाणी पट्टीची वसुली थकल्याने पालिकेने वीज वितरणच्या वीज बिलाचा भरणा केला नाही म्हणून, महावितरणच्या अधिकार्यांनी कनिष्ठ अभियंता अनिल जयस्वाल यांच्या नेतृत्वात नगर पालिका पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी कापली. त्यामुळे पालिका प्रशासनासोबतच नियमित पाणी पट्टीचा भरणा करणारे नागरिकही अडचणीत सापडले आहेत.

शहराचा पाणी पुरवठा ठप्पकोट्यवधी रुपयांच्या थकीत बिलासाठी वीज जोडणी कापण्यात आली. मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाचा जोर वाढत असतानाच, शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. शहरातील नियमित कराचा भरणा आणि पाणी पट्टी धारकांनाही पाणी पुरवठा करण्यास आता पालिका असमर्थ ठरत आहे.थकीत वसुलीमुळे पालिका वेठीस -कोट्यवधी रुपयांची पाणी पट्टी नागरिकांकडे थकली आहे. अशा परिस्थितीत पाणी पुरवठा योजना चालविणे नांदुरा नगर पालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असतानाच आता पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणीही कापण्यात आली आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासन संकटात सापडले आहे.थकीत वीज बिलासाठी पाणी पुरवठा योजनेची जोडणी कापण्यात आली आहे. ही वस्तुस्थिती आहे. यापुढे पाणी पट्टीचा नियमित भरणा करणार्यांनाही पाणी पुरवठा करणे अशक्य आहे. नागरिकांनी पाणी पट्टी भरून सहकार्य केल्यास परिस्थिती सुधारता येईल.नीरज नाफडे, पाणी पुरवठा अभियंता, नगर परिषद, नांदुरा... 

टॅग्स :electricityवीजWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई