शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

अन्नातून आठ जणांना विषबाधा!

By admin | Updated: May 6, 2017 02:39 IST

बुलडाणा जिल्ह्यातील घटना

मलकापूर (जि. बुलडाणा): येथील सायकलपुरा भागातील वृद्धासह सात चिमुकल्यांना अन्नातून विषबाधा झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. बाधीत रूग्ण एकाच कुटुंबातील असून अंगणवाडीतून आणलेली खिचडी खाल्यानंतर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यामन, सर्व जणांना उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अब्दुल सत्तार अ. कादर (७५) यांच्या कुटुंबातील सालीया फिरदोस अ.गफ्फार (१0), इम्रान हुसेन इरशाद हुसेन ( ६), अ.इमरान हुसेन (१२), अलकीया फिरदोस ( १0), नाझीया फिरदोस (१५), अब्दुल इमरान अब्दुल जब्बार (६), अ.सिद्दीक अ.जब्बार (४) अशा सात चिमुकल्यांनी पालीका अखत्यारीतील देशमुख हवेली सायकलपुरा येथून सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंगणवाडीतील खिचडी घरी आणली. तीच खिचडी वृद्ध अ.सत्तार यांनी सेवन केली. सुमारे एक तासानंतर वृद्धासह सातही चिमुकल्यांना ओकार्‍या सुरू झाल्या. त्यामुळे परिवारातील इतर सदस्य घाबरले. त्यांनी दुपारी खाजगी रूग्णालयात उपचाराचे प्रयत्न केले. शेवटी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास स्थानीय उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ.अमोल नाफडे, डॉ.मितेश टावरी, डॉ.चव्हाण आदींच्या चमुने तात्काळ उपचार सुरू केले. प्राथमिक स्वरूपातील उपचारानंतर रूग्णांनी प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले आहे. रूग्णांना विषबाधा नेमकी खिचडीमुळे झाली की अन्य स्वरूपातील अन्न सेवनाने झाली. याबाबत मात्र स्पष्ट झालेले नाही.