शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

निम्न ज्ञानगंगाच्या 'बॅकवॉटर'मुळे दिवठाणा येथील १५ घरे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 13:48 IST

दिवठाणा येथील १५ घरे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी १६० कोटीतून दिवठाणा येथे निम्न ज्ञानगंगा प्रकल्प तयार करण्यात आला. यावर्षी पासून पाणी अडवण्यास सुरवात झाली. मात्र पुर्नवसनाचा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने दिवठाणा येथील १५ घरे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे.‘साहेब, आम्हाला राहायला घर द्या’ अशाप्रकारची आर्त मागणी दिवठाणा येथील गावकऱ्यांनी गटविकास अधिकाºयांकडे केली. मात्र हतबल असल्याचे कारण पुढे करत त्यांनीही वरिष्ठांकडे दाद मागण्याचा सल्ला दिल्याने नागरिक संतप्त झाले होते.प्रकल्पामुळे १,१८१ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्प क्षेत्रात अतिक्रमीत वस्तीचे देखील स्थलांतर करण्याचे काम काही दिवसापूर्वी झाले. मात्र जागा वाटपात दुजाभाव केल्याचा आरोपही नागरिकांनी केला. पहिल्याच पावसाळ््यात प्रकल्प ७० टक्के भरला आहे. यामुळे प्रकल्पाच्या काठावरील गावांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने दिवठाणा येथील काही कुटूंबांना काळेगाव शिवारात प्लाटॅ दिले. त्याठिकाणी आपआपल्या सोईने काहींनी राहण्याची सुविधा उपलब्ध करून घेतली. सुमारे ११०० लोकवस्तीच्या गावातील अनेक कुटूंब अजूनही आहे त्याच जागी राहत आहेत. १५ सप्टेंबररोजीपासून प्रकल्पातील पाणी गावात शिरत आहे. पाण्यामुळे पाच ते सहा घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी प. स. मध्ये ग्रामस्थांनी व्यथा मांडली होती.

आमच्या गावातील काही लोकांना काळेगाव शिवारात प्लॉट दिले आहेत. मात्र अद्याप अनेक जण बाकी आहेत. त्यांच्या जिवित्वाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.- सुभाष वाकुडकर,सामाजिक कार्यकर्ते.

दिवठाणा येथील काही नागरिकांनी प्लॉट देण्यात आले. काही बाकी आहेत. प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरु आहे. त्यांचा पुर्नवसनाचा प्रश्न सोडविण्यात येईल.

- सुमीत जाधव,गटविकास अधिकारी, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाDamधरण