शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

ग्रामसेवकांच्या मागण्या तत्वत: मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 14:52 IST

मुख्य सचिवांनी ग्रामसेवकांच्या मागण्या तत्वत: मान्य करत आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या पृष्ठभूमीवर उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेत मुख्य सचिवांसोबत ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.यामध्ये मुख्य सचिवांनी ग्रामसेवकांच्या मागण्या तत्वत: मान्य करत आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीचे काम खोळंबले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या योजनांची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार गांभीर्य दाखवत नसल्याने या संवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.विविध मागण्यांबाबत वेळोवेळी झालेल्या चर्चा, बैठकात देण्यात आलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीला कूलूप लावून चाव्या गटविकास अधिकाºयांकडे दिल्या आहेत. संघटनेतर्फे सर्वच आमदार, मंत्री महोदयांनी निवेदने सादर केली होती. उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही जिल्हा कार्यकारीणीने निवेदन देवून मागण्याबाबत अवगत करून दिले होते. बावनकुळे यांनी आंदोलनाची दखल घेत २८ आॅगस्टरोजी संध्याकाळी संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्यासह पदाधिकाºयांना बैठकीसाठी आमंत्रीत केले. त्यानुसार मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या दालनात बैठक झाली. यामध्ये मुख्य सचिवांनी ग्रामसेवकाच्या मागण्या समजून घेतल्या. ग्रामसेवक संवर्गास दरमहा ३ हजार रुपये प्रवास भत्ता मंजूर करावा, ४ ग्रामसेवकांची शैक्षणिक अर्हतेत बदल करावा. कोणत्याही शाखा पदवीधर ग्रामसेवक भरतीत समाविष्ट करावा, ग्रामविकास अधिकारी पदे वाढवावीत, ग्रामसेवकांवरील अतिरिक्त कामाचा बोजा लादू नये, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी काढून सुधारणा करावी या मागण्या प्रामुख्याने मंजूर करण्याबाबत पदाधिकाºयांनी आग्रह धरला. मुख्य सचिवांनी याबाबत आश्वस्त केले. मागण्यांना तत्वत: मान्यताही दिली व आंदोलन मागे घेण्याबाबत सुचीत केले. मात्र पदाधिकाºयांनी लेखी आश्वासन मागितले. ते मिळू न शकल्याने जोपर्यत शासन लेखी देत नाही.तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आमच्या मागण्या रास्त आहेत. शासन नेहमीच आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती करते.एकदा आंदोलन मागे घेतले की, पुन्हा जैसे थे. ग्रामसेवकांच्या पदरी काहीही पडत नाही. त्यामुळे आम्ही जोपर्यत लेखी मिळत नाही. तोपर्यत आंदोलन सुरुच ठेवणार आहोत.- प्रशांत जामोदे, राज्य सरचिटणीस, राज्य ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव