शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बाल साहित्य लेखकांचा मेळावा एक ऐतिहासीक क्षण! - बालसाहित्यकार राजीव तांबे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 4:16 PM

बुलडाणा येथे होत असलेला बाल साहित्य लेखकांचा मेळावा म्हणजे एक ऐतिहासीक क्षण आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी केले. 

बुलडाणा: बाल साहित्य रुजविण्यासाठी काही प्रयत्न केले नाही, तर २० वर्षांनी मराठी साहित्य बंद पडेल. त्यामुळे साहित्य संमेलनांची गरज निर्माण झाली आहे. बालसाहित्याला मान देणं, त्याची पेरणी करणं गरजेच आहे. त्यानुषंगाने बुलडाणा येथे होत असलेला बाल साहित्य लेखकांचा मेळावा म्हणजे एक ऐतिहासीक क्षण आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी केले. ते बुलडाणा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये शनिवारी आयोजित राज्यस्तरीय बाल साहित्य लेखकांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद् भालचंद्र जोशी हे होते. या उद्घाटन सोहळ्यामध्ये काही बालसाहित्याच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. वाचनावर प्रकाश टाकताना राजीव तांबे म्हणाले ‘मुलं वाचनाकडे वळली पाहिजे’ असे प्रत्येकजण म्हणतात. मात्र समाजाने वाचनाकडे वळणं आज महत्वाचं आहे. अशा मेळाव्यामुळे बाल साहित्याला एक दिशा मिळत आहे. यामुळे बालसाहित्यीकारांची जबाबदारी वाढली आहे. बाल साहित्याच्या दृष्टीने तीन पातळ्यांवर विचार करायला लागणार आहे. त्यामध्ये जागतीक, देशातील  आणि महाराष्ट्र अशा बाल साहित्याचा तुलनात्मक अभ्यास करून आपण कुठे आहोत हा शोध घ्यावा लागणार आहे. कुठलीही कला शासनाचे पुरस्कार मिळाले म्हणून टिकत वा वाढत नाही. तिला समाजाचे प्रोत्साहन गरजेचे असते, असे तांबे यावेळी म्हणाले. यावेळी बाल साहित्यीक जयंत मोडक, किरण केंद्रे, डॉ. विद्या सुर्वे बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक बाल साहित्यीकारांची उपस्थिती होती.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाcultureसांस्कृतिक