शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांची नुकसान भरपाई द्यावी: शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST

शहरातील जिमखाना येथे २८ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ग्रीन ॲग्रोचे सदस्य डॉ.विजय भाले यांची ...

शहरातील जिमखाना येथे २८ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ग्रीन ॲग्रोचे सदस्य डॉ.विजय भाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दोन दिवसांपूर्वी चिखली तालुक्यातील भानखेड येथे बर्ड फ्लू या आजाराचा शिरकाव झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शेकडो कोंबड्यांना ठार केले आहे, शिवाय एक किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित केले आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी व बेरोजगार युवक कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले आहेत. या व्यवसायातून अनेक बेरोजगारांनी उन्नती साधली आहे, शिवाय या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथे ८० हजार पक्षी असून, ६५ हजार अंड्याची क्षमता आहे. कंपनीच्या वतीने अनेक शेतकऱ्यांशी करार करण्यात आला असून, शेतकऱ्यांकडे दीड लाख पक्षी असून, सव्वा लाख अंड्याची उत्पादन क्षमता आहे, परंतु मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात बर्ड फ्लू या आजाराचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे ज्या पक्ष्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशा पक्ष्यांची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, परंतु ज्या पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू या आजाराचा कुठलाच प्रादुर्भाव झाला नाही, अशा पक्ष्यांना ठार मारण्यात येत आहे. त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी तपासणी न करताच कोंबड्याना ठार मारणे थांबविण्यात यावे, अशी मागणी शेळके यांनी यावेळी केली आहे.