शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्यात थकबाकीचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 15:09 IST

वनटाईम सेटलमेंट न केल्याने तथा कर्जमाफीनंतरच्या वर्षातील कर्ज थकित असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात अडचणी येत आहे.

ठळक मुद्दे एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. १९ हजार ८९५ शेतकºयांना १६१ कोटी ८६ लाख २२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.बँकांनी १७.२० टक्के शेतकºयांना जुलै महिन्याच्या मध्यावर पीक कर्ज वाटप केल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकरी कर्ज माफी योजनेतंर्गत वनटाईम सेटलमेंट न केल्याने तथा कर्जमाफीनंतरच्या वर्षातील कर्ज थकित असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात अडचणी येत आहे. परिणामी पीक कर्ज वाटपाचा टक्का फारसा पुढे सरकला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, पात्र एक लाख १५ हजार ६४२ शेतकऱ्यांचा विचार करता प्रत्यक्षात बँकांनी १७.२० टक्के शेतकºयांना जुलै महिन्याच्या मध्यावर पीक कर्ज वाटप केल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात तीन लाख ३३ हजार ९६५ शेतकºयांना चालू आर्थिक वर्षात एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. यापैकी १२ हजार ४९६ शेतकरी नियमित कर्ज भरणारे आहे तर ७१ हजार ३५१ शेतकरी पीक कर्ज पूनर्गठणासाठी पात्र आहेत तर चार हजार ६८४ शेतकºयांनी पीक कर्जाचे पूर्नगठण करण्यास होकार दिलेले आणि अन्य काही असे मिळून प्रत्यक्षात एक लाख १५ हजार शेतकरी हे नव्याने पीक कर्ज मिळण्यासाठी पात्र ठरलेले आहेत. अशा शेतकºयांपैकी १९ हजार ८९५ शेतकºयांना १६१ कोटी ८६ लाख २२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी ही १७.२० टक्के येते. मात्र पीक कर्जाच्या उदिष्टाचा विचार करता ही टक्केवारी ९ टक्क्यांच्या आसपास असली तरी शेतकºयांकडे कर्जमाफी झाल्यानंतरच्या वर्षातील पीक कर्जाची रक्कम थकित असल्याने जवळपास एक लाख ११ हजार ८८५ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात अडचणी येत आहेत. त्या सोबतच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनंतर्गत कर्जमाफी मिळाल्यानंतरही २५ हजार ६४१ शेतकºयांनी त्यांच्या कर्जाचे वनटाईम सेटलमेंट केलेले नाही. योजनेतंर्गत कर्जमाफी मिळाली मात्र त्याचा लाभ न घेतलेले ४७ हजार ९९९ शेतकरी जिल्ह्यात आहे. या सर्व शेतकºयांचा एकत्रीत विचार करता एक लाख ८५ हजार ५२५ शेतकºयांना पीक कर्ज वाटपात अडचणी निर्माण झाल्या आहेत.बँक निहाय पीक कर्ज वाटपाचा टक्का पाहता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दहा हजार २०३ शेतकºयांना ७८ कोटी ९६ लाख रुपयांचे, खासगी अर्थात व्यापारी बँकांनी दोन हजार २२४ शेतकºयांना ३६ कोटी २५ लाख ४६ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केलेले आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने दोन हजार ६५९ शेतकºयांना २२ कोटी ५० लाख ५३ हजार रुपयांचे पीक कर्ज जुलै महिन्याच्या मध्यावर वाटप केलेले आहे.दरम्यान, जिल्हा सहकारी बँकेनेही पीक कर्ज वाटपात आघाडी घेतली असून चार हजार ८०९ शेतकºयांना २३ कोटी १४ लाख ४३ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केलेले आहे.शेतकºयांना पीक कर्ज वाटपासाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत आहे. त्यातच जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने जवळपास ७० टक्के पेरण्या पूर्णत्वास गेल्या आहेत. त्यामुळे या काळात शेतकºयांना आता खºया अर्थाने पैशांची निकड आहे. त्यामुळे बँकांनी शेतकºयांना त्वरेने पीक कर्ज वाटप करावे यासाठी रेटा वाढविण्याची गरज आहे.पुनर्गठणासाठी हवी संमतीजिल्ह्यातील ७१ हजार ३५१ शेतकरी हे पीक कर्जाच्या पूनर्गठणासाठी पात्र आहेत. जवळपास ५५४ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे यंदा वाटप करावयाचे आहे. मात्र पीक कर्जाचे पूनर्गठन करावयाचे असल्यास संबंधीत शेतकºयांची त्यासाठी संमती लागणार आहे. ७१ हजार ३५१ शेतकºयांपैकी आतापर्यंत चार हजार ६८४ शेतकºयांनीच असी संमती दिली असल्याचे अग्रणी बँकेची आकडेवारी स्पष्ट करते. दरम्यान, ३१ जुलै २०१९ पूर्वी २०१८ च्या खरीप हंगामातील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही बँकांना करावी लागणार आहे. अनुषंगीक विषयान्वये बँकांनी काटेकोरपणे कार्यवाही करण्याबाबत यापूर्वीच निर्देशीत करण्यात आलेले आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीनेही समन्वय ठेवण्याबाबत पुर्वीच सुचीत केले होते.शेतकºयांचे पीक कर्ज पूनर्गठन करावयाचे असल्यास संबंधित शेतकºयांची संमती आवश्यक आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी मिळाल्यानंतरच्या वर्षात शेतकºयांनी घेतलेल्या कर्जाची थकबाकी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जिल्ह्यात एक लाख १५ हजार ६४२ शेतकरी हे पीक कर्जासाठी पात्र ठरताहेत. अन्य शेतकºयांना पीक कर्ज देताना त्यामुळे अडचणी येत असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उत्तम मनवर यांनी दिली.जिल्ह्यातील तीन लाख एक हजार १६७ शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट ठरविण्यात आलेले आहेत. त्यांना एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. पैकी एक लाख ११ हजार ८८५ शेतकºयांकडे कर्ज थकित आहे. दरम्यान कर्जमाफी योजनेतंर्गत वनटाईम सेटलमेंटच जिल्ह्यातील २५ हजार ६४१ शेतकºयांनी केलेली नाही. योजनेतंर्गत कर्जमाफी झाल्यानंतर उर्वरित रकमेची शेतकºयांना वनटाईम सेलटमेंट करावी लागणार होती. ती करण्यात आलेली नाही.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक