शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलन आयोजनाचा प्रस्ताव मागे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:40 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्यशक्तींना वाटते, त्या शक्तींनीच विवेकानंद आश्रम व स्व. शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली आहे. यामुळे ९१ वे साहित्य संमेलन आयोजनाचा प्रस्ताव मागे घेत असल्याची घोषणा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी येथे केली. यासंदर्भात अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देविवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष मालपाणी यांची पत्रकार परिषदेत घोषणाविवेकानंद विचार साहित्य संमेलन घेणार!

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम ( बुलडाणा) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्यशक्तींना वाटते, त्या शक्तींनीच विवेकानंद आश्रम व स्व. शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली आहे. यामुळे ९१ वे साहित्य संमेलन आयोजनाचा प्रस्ताव मागे घेत असल्याची घोषणा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी येथे केली. यासंदर्भात अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष आर. बी. मालपाणी म्हणाले, दीन दुबळ्य़ांना बळ देण्याचे कार्य नेहमीच स्व. शुकदास महाराज व विवेकानंद आश्रमाने केले.  ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लाखो जनतेला हे सर्व पाहायला मिळणार होते; परंतु हे संमेलन कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, अशी इच्छा असलेला एक वर्ग आहे; त्यांना विवेकानंदांचा बुद्धिप्रामाण्यवाद, धर्मनिष्ठा आणि आश्रमाची त्याग, सेवा, सर्मपणाची संस्कृती संमेलन आयोजनस्थळात अडचण ठरत असल्याने ते खोटे आरोप करत आहेत. परिणामी आश्रमाच्या कार्याशी जुळलेल्या लाखो संवेदनशील नागरिकांची मने दुखावली आहेत. त्यामुळे त्यांचा संमेलनातील सहभाग केवळ शारीरिक राहणार असेल, तर संमेलनाचा उद्देशच सफल होऊ शकत नाही. भाषा, साहित्य, संस्कृतीचा प्रचार व प्रसार हाच साहित्य संमेलनाचा पवित्र हेतू आहे, हा हेतूच सफल होऊ शकत नसेल, तर आणखी ताणून धरण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत, असेही मालपाणी यांनी जाहीर केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव व त्यांच्या सहकार्‍यांच्या आरोपांना विवेकानंद आश्रमाच्यावतीने सहसचिव तथा मुख्य प्रवक्ते संतोष गोरे, सह प्रवक्ते पुरुषोत्तम सांगळे, आत्मानंद थोरहाते यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. मानव यांच्या भूमिकेचा नागरिकांकडून ठिकठिकाणी निषेधही करण्यात येत आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी प्रशासकीय यंत्रणेला निवेदन देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

विवेकानंद विचार साहित्य संमेलन घेणार!विवेक विचारांचा प्रचार करणारे असलेले विवेकानंद विचार साहित्य संमेलन स्वतंत्रपणे विवेकानंद जयंतीनिमित्त आम्ही आयोजित करणारच आहोत, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही आर. बी. मालपाणी यांनी यावेळी केली.