शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ एकच - सदानंद सप्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 17:28 IST

'ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशातील आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ हा एकच आहे. मात्र, परकीयांनी भारतीयांचा बुद्धीभेद केला असून, या बुद्धीभेदातून आम्ही आजही बाहेर पडायला तयार नाही, हीच आमची शोकांतिका आहे'

ठळक मुद्देऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशातील आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ हा एकच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना ‘चले जाव’साठी प्रेरीत केले असता, त्यांनी भारतात आधी आर्य आणि नंतर इंग्रज आले. इंग्रज आणि आर्य हे दोन्ही परकीय आहेत. त्यामुळे इंग्रजांसोबतच आर्यांनी देखील भारत सोडला पाहीजे, असा आग्रह धरला. ‘आर्य’ हा जातीवाचक नव्हे, तर गुणवाचक शब्द असल्याचेही त्यांनी सोदाहरण देऊन स्पष्ट केले.

खामगाव - ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशातील आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ हा एकच आहे. मात्र, परकीयांनी भारतीयांचा बुद्धीभेद केला असून, या बुद्धीभेदातून आम्ही आजही बाहेर पडायला तयार नाही, हीच आमची शोकांतिका आहे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन आंतराष्ट्रीय स्तरावरील व्याखाते तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व विभागाचे सहसंयोजक सदानंद सप्रे यांनी येथे केले.

भारतीय नागरिक उत्थान समिती आणि भारतीय विचार मंच, खामगावच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक टिळक स्मारक मंदिरात आयोजित जाहीर व्याख्यानात ते शनिवारी सायंकाळी बोलत होते. त्यांच्या व्याखानाचा विषय ‘वैचारिक गुलामीसे भारत की मुक्ती’ हा होता. यावेळी व्यासपीठावर सुभाष लोहे, भारतीय नागरिक उत्थान समितीचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, भारतीय विचार मंचाचे जिल्हा संयोजक विनय वरणगांवकर यांची उपस्थिती होती. यावेळी अनिल अग्नीहोत्री, संजय बोरे, विकास कुळकर्णी, दिलीप शेट्ये, गजानन वायचाळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी सदानंद सप्रे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना ‘चले जाव’साठी प्रेरीत केले असता, त्यांनी भारतात आधी आर्य आणि नंतर इंग्रज आले. इंग्रज आणि आर्य हे दोन्ही परकीय आहेत. त्यामुळे इंग्रजांसोबतच आर्यांनी देखील भारत सोडला पाहीजे, असा आग्रह धरला. आर्य आणि द्रविड वेगवेगळे असा चुकीचा आणि खोटा सिध्दांत प्रस्थापित केला. मात्र, वस्तुस्थितीत ‘वैचारिक आणि वैज्ञानिक’ अशा दोन्ही दृष्टीकोनातून आर्य आणि द्रविडांचा डीएनए हा एकच आहे. असे सप्रमाण सिध्द झाले आहे. मात्र, आजही आम्ही ‘आर्याचे आक्रमण’ शिकविल्या जाते. ही वैचारिक गुलामगिरी असून, वैचारिक दृष्टीकोनातील गुलामी ही अतिशय वाईट आहे. केवळ बुध्दीभेदच नव्हे तर व्यक्ती-व्यक्तीत तिरस्कार निर्माण करणारी आहे. त्यामुळे सजगतेतून ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे, असे ते म्हणाले. 

‘आर्य’ हा जातीवाचक नव्हे, तर गुणवाचक शब्द असल्याचेही त्यांनी सोदाहरण देऊन स्पष्ट केले. यावेळी वैचारिक गुलामगिरीच्या अनेक खोट्या सिध्दांतावर त्यांनी प्रहार केला. वैचारिक गुलामगिरी संदर्भातील  चुकीचे सिध्दांत वेगवेगळे उदाहरण देत, खोडून काढले. यावेळी श्रोत्यांमधून उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. अनेकांच्या शंकांचे निरसनही केले. 

संस्कार महत्त्वाचे!

भारतीय संस्कृतीत संस्काराचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पाश्चात्य लोकही भारतीय संस्कृतीचे अनुकरण करताहेत. मात्र आम्हाला आपल्या पुरातन संस्कृतीचा विसर पडला आहे. वैचारिक गुलामगिरी झुगारून भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी  झटलं पाहिजे. अगदी मुलांच्या वाढदिवसापासून आपण भारतीय संस्कृतीच्या जतनाची सुरुवात करू शकतो. मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करणे निश्चितच चांगले नाही. असे ते म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIndiaभारत