शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ एकच - सदानंद सप्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 17:28 IST

'ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशातील आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ हा एकच आहे. मात्र, परकीयांनी भारतीयांचा बुद्धीभेद केला असून, या बुद्धीभेदातून आम्ही आजही बाहेर पडायला तयार नाही, हीच आमची शोकांतिका आहे'

ठळक मुद्देऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशातील आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ हा एकच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना ‘चले जाव’साठी प्रेरीत केले असता, त्यांनी भारतात आधी आर्य आणि नंतर इंग्रज आले. इंग्रज आणि आर्य हे दोन्ही परकीय आहेत. त्यामुळे इंग्रजांसोबतच आर्यांनी देखील भारत सोडला पाहीजे, असा आग्रह धरला. ‘आर्य’ हा जातीवाचक नव्हे, तर गुणवाचक शब्द असल्याचेही त्यांनी सोदाहरण देऊन स्पष्ट केले.

खामगाव - ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशातील आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ हा एकच आहे. मात्र, परकीयांनी भारतीयांचा बुद्धीभेद केला असून, या बुद्धीभेदातून आम्ही आजही बाहेर पडायला तयार नाही, हीच आमची शोकांतिका आहे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन आंतराष्ट्रीय स्तरावरील व्याखाते तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व विभागाचे सहसंयोजक सदानंद सप्रे यांनी येथे केले.

भारतीय नागरिक उत्थान समिती आणि भारतीय विचार मंच, खामगावच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक टिळक स्मारक मंदिरात आयोजित जाहीर व्याख्यानात ते शनिवारी सायंकाळी बोलत होते. त्यांच्या व्याखानाचा विषय ‘वैचारिक गुलामीसे भारत की मुक्ती’ हा होता. यावेळी व्यासपीठावर सुभाष लोहे, भारतीय नागरिक उत्थान समितीचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, भारतीय विचार मंचाचे जिल्हा संयोजक विनय वरणगांवकर यांची उपस्थिती होती. यावेळी अनिल अग्नीहोत्री, संजय बोरे, विकास कुळकर्णी, दिलीप शेट्ये, गजानन वायचाळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी सदानंद सप्रे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना ‘चले जाव’साठी प्रेरीत केले असता, त्यांनी भारतात आधी आर्य आणि नंतर इंग्रज आले. इंग्रज आणि आर्य हे दोन्ही परकीय आहेत. त्यामुळे इंग्रजांसोबतच आर्यांनी देखील भारत सोडला पाहीजे, असा आग्रह धरला. आर्य आणि द्रविड वेगवेगळे असा चुकीचा आणि खोटा सिध्दांत प्रस्थापित केला. मात्र, वस्तुस्थितीत ‘वैचारिक आणि वैज्ञानिक’ अशा दोन्ही दृष्टीकोनातून आर्य आणि द्रविडांचा डीएनए हा एकच आहे. असे सप्रमाण सिध्द झाले आहे. मात्र, आजही आम्ही ‘आर्याचे आक्रमण’ शिकविल्या जाते. ही वैचारिक गुलामगिरी असून, वैचारिक दृष्टीकोनातील गुलामी ही अतिशय वाईट आहे. केवळ बुध्दीभेदच नव्हे तर व्यक्ती-व्यक्तीत तिरस्कार निर्माण करणारी आहे. त्यामुळे सजगतेतून ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे, असे ते म्हणाले. 

‘आर्य’ हा जातीवाचक नव्हे, तर गुणवाचक शब्द असल्याचेही त्यांनी सोदाहरण देऊन स्पष्ट केले. यावेळी वैचारिक गुलामगिरीच्या अनेक खोट्या सिध्दांतावर त्यांनी प्रहार केला. वैचारिक गुलामगिरी संदर्भातील  चुकीचे सिध्दांत वेगवेगळे उदाहरण देत, खोडून काढले. यावेळी श्रोत्यांमधून उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. अनेकांच्या शंकांचे निरसनही केले. 

संस्कार महत्त्वाचे!

भारतीय संस्कृतीत संस्काराचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पाश्चात्य लोकही भारतीय संस्कृतीचे अनुकरण करताहेत. मात्र आम्हाला आपल्या पुरातन संस्कृतीचा विसर पडला आहे. वैचारिक गुलामगिरी झुगारून भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी  झटलं पाहिजे. अगदी मुलांच्या वाढदिवसापासून आपण भारतीय संस्कृतीच्या जतनाची सुरुवात करू शकतो. मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करणे निश्चितच चांगले नाही. असे ते म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIndiaभारत