शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ एकच - सदानंद सप्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 17:28 IST

'ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशातील आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ हा एकच आहे. मात्र, परकीयांनी भारतीयांचा बुद्धीभेद केला असून, या बुद्धीभेदातून आम्ही आजही बाहेर पडायला तयार नाही, हीच आमची शोकांतिका आहे'

ठळक मुद्देऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशातील आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ हा एकच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना ‘चले जाव’साठी प्रेरीत केले असता, त्यांनी भारतात आधी आर्य आणि नंतर इंग्रज आले. इंग्रज आणि आर्य हे दोन्ही परकीय आहेत. त्यामुळे इंग्रजांसोबतच आर्यांनी देखील भारत सोडला पाहीजे, असा आग्रह धरला. ‘आर्य’ हा जातीवाचक नव्हे, तर गुणवाचक शब्द असल्याचेही त्यांनी सोदाहरण देऊन स्पष्ट केले.

खामगाव - ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशातील आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ हा एकच आहे. मात्र, परकीयांनी भारतीयांचा बुद्धीभेद केला असून, या बुद्धीभेदातून आम्ही आजही बाहेर पडायला तयार नाही, हीच आमची शोकांतिका आहे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन आंतराष्ट्रीय स्तरावरील व्याखाते तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व विभागाचे सहसंयोजक सदानंद सप्रे यांनी येथे केले.

भारतीय नागरिक उत्थान समिती आणि भारतीय विचार मंच, खामगावच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक टिळक स्मारक मंदिरात आयोजित जाहीर व्याख्यानात ते शनिवारी सायंकाळी बोलत होते. त्यांच्या व्याखानाचा विषय ‘वैचारिक गुलामीसे भारत की मुक्ती’ हा होता. यावेळी व्यासपीठावर सुभाष लोहे, भारतीय नागरिक उत्थान समितीचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, भारतीय विचार मंचाचे जिल्हा संयोजक विनय वरणगांवकर यांची उपस्थिती होती. यावेळी अनिल अग्नीहोत्री, संजय बोरे, विकास कुळकर्णी, दिलीप शेट्ये, गजानन वायचाळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी सदानंद सप्रे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना ‘चले जाव’साठी प्रेरीत केले असता, त्यांनी भारतात आधी आर्य आणि नंतर इंग्रज आले. इंग्रज आणि आर्य हे दोन्ही परकीय आहेत. त्यामुळे इंग्रजांसोबतच आर्यांनी देखील भारत सोडला पाहीजे, असा आग्रह धरला. आर्य आणि द्रविड वेगवेगळे असा चुकीचा आणि खोटा सिध्दांत प्रस्थापित केला. मात्र, वस्तुस्थितीत ‘वैचारिक आणि वैज्ञानिक’ अशा दोन्ही दृष्टीकोनातून आर्य आणि द्रविडांचा डीएनए हा एकच आहे. असे सप्रमाण सिध्द झाले आहे. मात्र, आजही आम्ही ‘आर्याचे आक्रमण’ शिकविल्या जाते. ही वैचारिक गुलामगिरी असून, वैचारिक दृष्टीकोनातील गुलामी ही अतिशय वाईट आहे. केवळ बुध्दीभेदच नव्हे तर व्यक्ती-व्यक्तीत तिरस्कार निर्माण करणारी आहे. त्यामुळे सजगतेतून ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे, असे ते म्हणाले. 

‘आर्य’ हा जातीवाचक नव्हे, तर गुणवाचक शब्द असल्याचेही त्यांनी सोदाहरण देऊन स्पष्ट केले. यावेळी वैचारिक गुलामगिरीच्या अनेक खोट्या सिध्दांतावर त्यांनी प्रहार केला. वैचारिक गुलामगिरी संदर्भातील  चुकीचे सिध्दांत वेगवेगळे उदाहरण देत, खोडून काढले. यावेळी श्रोत्यांमधून उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. अनेकांच्या शंकांचे निरसनही केले. 

संस्कार महत्त्वाचे!

भारतीय संस्कृतीत संस्काराचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पाश्चात्य लोकही भारतीय संस्कृतीचे अनुकरण करताहेत. मात्र आम्हाला आपल्या पुरातन संस्कृतीचा विसर पडला आहे. वैचारिक गुलामगिरी झुगारून भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी  झटलं पाहिजे. अगदी मुलांच्या वाढदिवसापासून आपण भारतीय संस्कृतीच्या जतनाची सुरुवात करू शकतो. मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करणे निश्चितच चांगले नाही. असे ते म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIndiaभारत