शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

७ हजार हेक्टरला अवकाळी पावसाचा फटका

By admin | Updated: April 14, 2015 00:42 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ६१६ गावे बाधित; कांदा, मका, भुईमुगासह फळपिकांचे नुकसान.

बुलडाणा : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने ९ ते १२ एप्रिल या कालावधीत जिल्ह्याला पुन्हा फटका दिला. या पावसाची ४६९.६0 मिमी एवढी नोंद करण्यात आली. या पावसामुळे जिल्ह्यातील कांदा, कांदा बी, मका, भुईमूग, केळी, भाजीपाला असे शेतपिके आणि लिंब, संत्रा, डाळिंब आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ७ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पिके प्रभावित झाले असून, ६१६ गावे बाधित झाले.यात खामगाव, जळगाव जमोद, बुलडाणा, मोताळा, नांदुरा, शेगाव या सहा तालुक्यात प्रत्येक ५0 टक्केच्यावर पिकांचे व इतर नुकसान झाले. या तालुक्यामध्ये कांदा आणि कांदा बी या पिकांचे ७0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर बुलडाणा, खामगाव, जळगाव जमोद या तीन तालुक्यात ३0 टक्क्यांपेक्षा जास्त फळबागेचे नुकसान आहे. जिल्ह्याचा विचार करता या तीन दिवसांच्या पावसामुळे ७ हजार ११६ हेक्टरवरील शेतपिके आणि ६३३ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.या अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान जळगाव जमोद तालुक्यात झाले. गत तीन दिवसात तालुक्यात ७४ मिमी पाऊस पडला. या दरम्यान झालेल्या चक्रीवादळ व गाटपिटीमुळे १३६७ हेक्टरवरील शेतपिके व फळपिकांचे नुकसान झाले. तर ११९ गावांमध्ये घरांची पडझड होऊन कुटुंब उघड्यावर आली. तर त्या खालोखाल खामगाव तालुक्यात १२१५ हेक्टरवरील कांदा, कांदा बी, मका व इतर फळपिकांचे नुकसान झाले, तर ११0 गाव बाधित झाले.गत जानेवारी महिन्यापासून जिल्ह्याला सहा वेळा अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे सोयाबीन, हरभरा, कापूस, कांदा, मका, तूर, मूग, शाळू आदी खरीप व रब्बी पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे प्रत्येक महिन्यात निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.