शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तुमसरात मूलभूत सोयींचा अभाव

By admin | Updated: September 9, 2014 00:10 IST

तुमसर शहराची वाढ अत्यंत झपाट्याने होत असली तरी मूलभूत सोयी त्या वेगाने उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. नवीन तुमसर शहरामध्ये विनोबा नगर, श्रीराम नगर, दुर्गा नगर, इत्यादी नवीन वसाहती

तुमसर : तुमसर शहराची वाढ अत्यंत झपाट्याने होत असली तरी मूलभूत सोयी त्या वेगाने उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. नवीन तुमसर शहरामध्ये विनोबा नगर, श्रीराम नगर, दुर्गा नगर, इत्यादी नवीन वसाहती निर्माण झालेल्या आहेत. परंतु यापैकी कोणत्याही नगरात परिपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.विनोबा नगर व श्रीराम नगर याठिकाणी थोड्या प्रमाणात पाऊस पडला तरी रस्त्यावर पाणी साचते. रस्त्यांनी ये-जा करण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागतो. आवश्यक त्या प्रमाणात रस्ते बांधकामही पूर्ण अवस्थेत नाहीत. रस्त्यावरील पाणी लोकांच्या घरामध्ये शिरतो, कारण पाणी वाहून नेण्यासाठी नाल्या नाहीत. काही ठिकाणी नाल्याचे बांधकाम झालेले आहे. परंतु नाल्या कचऱ्याने तुडूंब भरलेल्या आहेत. नाल्यांची सफाई वेळेवर होत नसल्यामुळे नाल्यातील घाण पाणी लोकांच्या घरात शिरत असल्याने आरोग्याची समस्या बळावली आहे. जागोजागी रिकाम्या असलेल्या भुंखडाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे डास व इतर किटकांमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत. साचलेले पाणी व त्यामुळे डासांच्या संख्येत झालेली वाढ नागरिकांच्या जीवावर बेतलेली आहे. या परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळले असून सुद्धा लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रशासन सुस्तावस्थेत असल्याचे जाणवते. या परिसरातील प्रतिनिधींना लोकांच्या समस्येविषयी जाणून घेण्यात व सोडविण्यात काहीही रस नाही. वारंवार अर्ज विनंत्या करूनसुद्धा लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही. मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु झालेला आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी पथदिवे लावलेले आहेत. परंतु त्यापैकी अर्धेअधिक बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे लोकांना आपल्या घरापर्यंत पाण्यातून व चिखलातून वाट करत जावे लागते. काही ठिकाणी अजूनही पक्के रस्ते बांधण्यात आलेले नाही. कच्चे रस्ते चिखलमय झालेले आहे. रस्त्यावर अजूनही मुरुम टाकण्यात आलेले नाही. काही प्रतिनिधी जाणून लोकांच्या समस्येकडे डोळेझाक करीत आहेत. कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. नळयोजना राबविताना वर्षानुवर्षे निघून गेली परंतु लोक तहानलेलेच. अजूनही लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचविण्यात प्रशासन अपयशीच ठरलेले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)