शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
4
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
5
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
6
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
7
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
8
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
9
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
10
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
11
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
12
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
13
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
14
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
15
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
16
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
17
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
18
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
19
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
20
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'

भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट, प्रस्तावित कृती आराखडा कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:21 IST

भंडारा तालुक्याला वैनगंगा ही नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावेही तहानलेली असल्याचे दिसून येते.

भंडारा : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, उन्हाळ्याच्या प्रारंभीच ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत कृती आराखडा तयार करण्यात येत असतो. मात्र भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये या कृती आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या झाली नसल्याने या गावांत जलसंकट उद्भवले आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागअंतर्गत पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला जातो. यामध्ये नळ योजना विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीर किंवा कूपनलिका निर्माण करणे, विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, तात्पुरती नळ योजना सुरुवात करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे आदी कामांचा समावेश असतो. अति तीव्र पाणीटंचाई आहे तिथे टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे योजिले असते. त्या अंतर्गत प्रत्यक्षरित्या काम केले जाते.

भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट बळावले आहे. भंडारा तालुक्याला वैनगंगा ही नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावेही तहानलेली असल्याचे दिसून येते. अंतर्गत खेड्यांमध्ये पाण्याची टंचाई उद्भवली आहे. जिल्हा हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो; परंतु भंडारा तालुक्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण पाणी पुरवठ्याची हद्द नसलेल्या भंडारा शहरातही काही कॉलनीमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जिल्हा टँकर मुक्त आहे, ही बाब फक्त कागदोपत्री शोभणारी आहे.

१६ लाखांचा खर्च अपेक्षित

ग्रामीण पाणीपुरवठा विभागअंतर्गत भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये प्रस्तावित योजनेअंतर्गत १६ लक्ष ८५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित करण्यात आला आहे. यात विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये विशेषतः विंधन विहिरींची संख्या वाढविणे तसेच त्यांची दुरुस्ती करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

एकूण ८४ लाखांचा खर्च

उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, ३० जूनपर्यंत प्रस्तावित केलेल्या उपाययोजना पूर्ण करणे अपेक्षित असते. परंतु याला ग्रामपंचायत स्तरावरही पाठपुरावा केला जात नसल्याचे समजते. एकूण प्रस्तावित उपाय योजनेसाठी ८४ लक्ष २७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची बाब ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या प्रस्तावित कृती आराखड्यावरून समजते.

टँकर मुक्तीची घोषणा नावापुरतीच

भंडारा जिल्हा हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो. परंतु प्रत्यक्षात ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यातून शहरेही सुटली नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीwater shortageपाणीकपातbhandara-acभंडारा