शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट, प्रस्तावित कृती आराखडा कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:21 IST

भंडारा तालुक्याला वैनगंगा ही नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावेही तहानलेली असल्याचे दिसून येते.

भंडारा : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, उन्हाळ्याच्या प्रारंभीच ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत कृती आराखडा तयार करण्यात येत असतो. मात्र भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये या कृती आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या झाली नसल्याने या गावांत जलसंकट उद्भवले आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागअंतर्गत पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला जातो. यामध्ये नळ योजना विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीर किंवा कूपनलिका निर्माण करणे, विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, तात्पुरती नळ योजना सुरुवात करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे आदी कामांचा समावेश असतो. अति तीव्र पाणीटंचाई आहे तिथे टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे योजिले असते. त्या अंतर्गत प्रत्यक्षरित्या काम केले जाते.

भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट बळावले आहे. भंडारा तालुक्याला वैनगंगा ही नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावेही तहानलेली असल्याचे दिसून येते. अंतर्गत खेड्यांमध्ये पाण्याची टंचाई उद्भवली आहे. जिल्हा हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो; परंतु भंडारा तालुक्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण पाणी पुरवठ्याची हद्द नसलेल्या भंडारा शहरातही काही कॉलनीमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जिल्हा टँकर मुक्त आहे, ही बाब फक्त कागदोपत्री शोभणारी आहे.

१६ लाखांचा खर्च अपेक्षित

ग्रामीण पाणीपुरवठा विभागअंतर्गत भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये प्रस्तावित योजनेअंतर्गत १६ लक्ष ८५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित करण्यात आला आहे. यात विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये विशेषतः विंधन विहिरींची संख्या वाढविणे तसेच त्यांची दुरुस्ती करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

एकूण ८४ लाखांचा खर्च

उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, ३० जूनपर्यंत प्रस्तावित केलेल्या उपाययोजना पूर्ण करणे अपेक्षित असते. परंतु याला ग्रामपंचायत स्तरावरही पाठपुरावा केला जात नसल्याचे समजते. एकूण प्रस्तावित उपाय योजनेसाठी ८४ लक्ष २७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची बाब ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या प्रस्तावित कृती आराखड्यावरून समजते.

टँकर मुक्तीची घोषणा नावापुरतीच

भंडारा जिल्हा हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो. परंतु प्रत्यक्षात ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यातून शहरेही सुटली नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीwater shortageपाणीकपातbhandara-acभंडारा