शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट, प्रस्तावित कृती आराखडा कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:21 IST

भंडारा तालुक्याला वैनगंगा ही नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावेही तहानलेली असल्याचे दिसून येते.

भंडारा : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, उन्हाळ्याच्या प्रारंभीच ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत कृती आराखडा तयार करण्यात येत असतो. मात्र भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये या कृती आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या झाली नसल्याने या गावांत जलसंकट उद्भवले आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागअंतर्गत पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला जातो. यामध्ये नळ योजना विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीर किंवा कूपनलिका निर्माण करणे, विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, तात्पुरती नळ योजना सुरुवात करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे आदी कामांचा समावेश असतो. अति तीव्र पाणीटंचाई आहे तिथे टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे योजिले असते. त्या अंतर्गत प्रत्यक्षरित्या काम केले जाते.

भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट बळावले आहे. भंडारा तालुक्याला वैनगंगा ही नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावेही तहानलेली असल्याचे दिसून येते. अंतर्गत खेड्यांमध्ये पाण्याची टंचाई उद्भवली आहे. जिल्हा हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो; परंतु भंडारा तालुक्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण पाणी पुरवठ्याची हद्द नसलेल्या भंडारा शहरातही काही कॉलनीमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जिल्हा टँकर मुक्त आहे, ही बाब फक्त कागदोपत्री शोभणारी आहे.

१६ लाखांचा खर्च अपेक्षित

ग्रामीण पाणीपुरवठा विभागअंतर्गत भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये प्रस्तावित योजनेअंतर्गत १६ लक्ष ८५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित करण्यात आला आहे. यात विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये विशेषतः विंधन विहिरींची संख्या वाढविणे तसेच त्यांची दुरुस्ती करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

एकूण ८४ लाखांचा खर्च

उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, ३० जूनपर्यंत प्रस्तावित केलेल्या उपाययोजना पूर्ण करणे अपेक्षित असते. परंतु याला ग्रामपंचायत स्तरावरही पाठपुरावा केला जात नसल्याचे समजते. एकूण प्रस्तावित उपाय योजनेसाठी ८४ लक्ष २७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची बाब ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या प्रस्तावित कृती आराखड्यावरून समजते.

टँकर मुक्तीची घोषणा नावापुरतीच

भंडारा जिल्हा हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो. परंतु प्रत्यक्षात ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यातून शहरेही सुटली नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीwater shortageपाणीकपातbhandara-acभंडारा