शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट, प्रस्तावित कृती आराखडा कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:21 IST

भंडारा तालुक्याला वैनगंगा ही नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावेही तहानलेली असल्याचे दिसून येते.

भंडारा : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, उन्हाळ्याच्या प्रारंभीच ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत कृती आराखडा तयार करण्यात येत असतो. मात्र भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये या कृती आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या झाली नसल्याने या गावांत जलसंकट उद्भवले आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागअंतर्गत पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला जातो. यामध्ये नळ योजना विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीर किंवा कूपनलिका निर्माण करणे, विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, तात्पुरती नळ योजना सुरुवात करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे आदी कामांचा समावेश असतो. अति तीव्र पाणीटंचाई आहे तिथे टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे योजिले असते. त्या अंतर्गत प्रत्यक्षरित्या काम केले जाते.

भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट बळावले आहे. भंडारा तालुक्याला वैनगंगा ही नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावेही तहानलेली असल्याचे दिसून येते. अंतर्गत खेड्यांमध्ये पाण्याची टंचाई उद्भवली आहे. जिल्हा हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो; परंतु भंडारा तालुक्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण पाणी पुरवठ्याची हद्द नसलेल्या भंडारा शहरातही काही कॉलनीमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जिल्हा टँकर मुक्त आहे, ही बाब फक्त कागदोपत्री शोभणारी आहे.

१६ लाखांचा खर्च अपेक्षित

ग्रामीण पाणीपुरवठा विभागअंतर्गत भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये प्रस्तावित योजनेअंतर्गत १६ लक्ष ८५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित करण्यात आला आहे. यात विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये विशेषतः विंधन विहिरींची संख्या वाढविणे तसेच त्यांची दुरुस्ती करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

एकूण ८४ लाखांचा खर्च

उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, ३० जूनपर्यंत प्रस्तावित केलेल्या उपाययोजना पूर्ण करणे अपेक्षित असते. परंतु याला ग्रामपंचायत स्तरावरही पाठपुरावा केला जात नसल्याचे समजते. एकूण प्रस्तावित उपाय योजनेसाठी ८४ लक्ष २७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची बाब ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या प्रस्तावित कृती आराखड्यावरून समजते.

टँकर मुक्तीची घोषणा नावापुरतीच

भंडारा जिल्हा हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो. परंतु प्रत्यक्षात ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यातून शहरेही सुटली नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीwater shortageपाणीकपातbhandara-acभंडारा