शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

वणव्यामुळे कोट्यवधींचे वृक्ष नष्ट; वनविभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:34 AM

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अलीकडे उन्हाळा लागला की, धुरे, रस्त्याच्या कडेचे शुष्क गवत पेटविण्याचा मोसम सर्वत्र नजरेत पडतो. ...

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अलीकडे उन्हाळा लागला की, धुरे, रस्त्याच्या कडेचे शुष्क गवत पेटविण्याचा मोसम सर्वत्र नजरेत पडतो. मात्र या पेटवापेटवीत शेकडो जिवंत बहरलेली झाडे तसेच शासनाने अमाप खर्च करून लावलेली रोपे मरतात, याची कुणालाही फिकीर नाही. विशेष म्हणजे, आगीमुळे उन्मळून पडलेल्या झाडांच्या लाकडाची सर्वांदेखत वाहतूक होत असतानाही शासकीय विभाग त्याबाबत जाब विचारत असल्याचे चित्र कुठेच नाही.एकीकडे शासन झाडे लावण्यासाठी अमाप पैसा खर्च करीत आहे. दुसरीकडे दिवसाढवळ्या रस्त्याने लावलेल्या आगीत उभी झाडे पेटविली जात आहेत. शेतातील धुऱ्याचे गवत पेटविण्यासाठी तसेच नदी-नाल्याकाठी सफाईच्या नावावर शेतकरी आगी लावतात. ती आग झाडांना कवेत घेते आणि अखेर झाडे कोसळतात. विशेष म्हणजे, आगीच्या नोंदीची जबाबदारी तलाठ्यांकडे असताना, त्यांचे त्याकडे लक्षच नाही. नेमून दिलेल्या ठिकाणी भेट दिली, की वास्तव्याच्या ठिकाणी निघून जाण्यात ते धन्यता मानतात. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.राज्य शासनाने वृक्षारोपण योजनेकरिता अमाप खर्च केला. रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले. ती झाडे जगविण्याकरिता बचतगटांना उद्युक्त केले. मात्र, रस्त्याच्या कडेला लावलेल्या आगीमुळे वृक्षारोपण योजनेचा फज्जा उडाला आहे. शेतातील वा रस्त्यालगतची झाडे तोडून जिल्ह्यातील लाकडे वाहून नेली जात आहेत.

 

टॅग्स :fireआगforestजंगल