शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोडावून झाले फुल्ल, धानाची उचल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST

मुखरू बागडे पालांदूर : वीस दिवसांपासून धान खरेदी गोडावून विविध समस्यांने बंद होते. धान खरेदी कधी सुरू होणार, ...

मुखरू बागडे

पालांदूर : वीस दिवसांपासून धान खरेदी गोडावून विविध समस्यांने बंद होते. धान खरेदी कधी सुरू होणार, अशी शेतकऱ्यांची रोज विचारणा होत होती. शासनाकडून धान उचल करण्याचे आदेश निर्गमित न झाल्याने गोडावून फुल्ल भरून आहेत. भात गिरणी मालकांच्या समस्या न सुटल्याने धान खरेदी प्रकरण आणखी प्रलंबित राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांची धान मोजणीची समस्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्याने शेतकरी समस्येत भर पडली आहे. ढगाळ वातावरणातही गोडावूनच्या मोकळ्या जागेत खुल्या नभाखाली पालांदूर संस्थेने धान मोजणी शेतकरी हितार्थ सुरू केली आहे.

वीस दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शेतकऱ्यांचे धान मोजणी सुरू झालेली आहे. किमान पंधरा हजार क्विंटल धान गोडावूनच्या भव्य पटांगणात गत ६० ते ७० दिवसांपासून अडून पडले आहे. धानाच्या पोत्याची नुकसान झाले आहे. गोडावून परिसरातील मोकाट जनावरेसुद्धा धानाचे नुकसान करीत आहेत. शेतकरी दररोज आपल्या पोत्याची पाहणी करुन घरी निराशेने परत येतो आहे. सेवा सहकारी संस्थेत शेतकरी भेट देत मोजणी करण्याची विनवणी करत आहेत. संस्थाही शेतकऱ्यांची असल्याने मोजणी करणे अत्यावश्यक आहे. परंतु गोडावून भरले असल्याने व आतापर्यंत एकही क्विंटल धानाची उचल न झाल्याने गोडावून भरलेलीच आहेत. शासन-प्रशासन स्तरावरून भात गिरणी मालकांच्या समस्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनीसुद्धा माल न उचलण्याचा हट्ट धरल्याने धान खरेदी प्रभावित झालेली आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान खरेदी केंद्र पालांदूर येथे सुरू झाले आहे. या खरेदी केंद्रावर सुमारे ३९ हजार क्विंटल धानाची खरेदी दोन गोडावूनच्या माध्यमातून आटोपली आहे. गोडावून रिकामे होतील व आपली खरेदीही सुरळीत राहील, अशी आशा असताना, शासनाकडून सहकार्य न मिळाल्याने धान खरेदी नाईलाजाने सुमारे वीस दिवस बंद ठेवावी लागली.

लोकप्रतिनिधीसुद्धा शेतकरी व भात गिरणी मालकांच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेत नसल्याने समस्या प्रलंबित आहे. जिल्हा मार्केटिंग कार्यालय व भात गिरणी मालकांची बैठका सुरू आहेत. परंतु अजून अपेक्षित तोडगा निघालेला नसल्याने आणखी धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात येऊ नये, याकरिता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पालांदूर यांनी मासिक सभा बोलावून शेतकऱ्यांच्या हितार्थ गोडावूनच्या खुल्या जागेत धान खरेदीचा निर्णय घेतला.

चौकट /डब्बा

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चारही जिल्ह्यांतील धान खरेदी काही प्रमाणात आटोपलेली असून, अडीच महिन्यात एकही क्विंटल धानाचे कोणत्याही भात गिरणी धारकांनी उचल केलेली नाही. शासन व प्रशासनाच्या डोईजड धोरणाने भात गिरणी मालक सुद्धा संकटात सापडले आहेत. वास्तव परिस्थितीचा विचार न करता, अवास्तव नियमांनी भात गिरणी मालकांचे कंबरडे मोडण्याची शक्यता असल्याने भात गिरणीधारक डिवो स्वीकारायला तयार नाहीत.

शेतकरी हा आमचा आधार असून, संस्थेला धान खरेदी केंद्र मिळालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा धान मोजणे हे आमची जबाबदारी आहे. १९ जानेवारीपर्यंत ३९ हजार पाचशे तीस क्विंटल धानाची मोजणी आटोपलेली आहे. आणखी १५ ते २० हजार क्विंटल धान मोजणी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने डिवोबाबत त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

विजय कापसे,

अध्यक्ष, कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पालांदूर.