शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतुकीने रस्ते जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 01:30 IST

जिल्ह्यात रेतीचा अवैध व्यवसाय जोमात सुरू असताना परवा रात्री एका ट्रक चालकाचा दुदैवी मृत्यू झाला.

जिल्ह्यात ४० रेतीघाट सुरू : रेतीचा अवैध गोरखधंदाभंडारा : जिल्ह्यात रेतीचा अवैध व्यवसाय जोमात सुरू असताना परवा रात्री एका ट्रक चालकाचा दुदैवी मृत्यू झाला. एरव्ही रेतीच्या अवैध वाहतुकीमुळे सामान्यांचा जीव जात असताना कालच्या प्रकरणाने पुन्हा एकदा या मुद्याला रंग चढला आहे. गेलेल्या जीव परत येऊ शकत नाही. मात्र या रेतीच्या अवैध व्यवसायामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची होणारी दयनिय अवस्था व त्यामुळे घडणारे अपघात सामान्यांची परीक्षाच घेत आहे. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांचे विस्तारीत पात्र आहे. याच नदीपात्रातून दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा रेतीचा उपसा केला जातो. नियमात नसला तरी २४ तास चालणारा हा ‘बिझनेस’ कधीकाळी अंगावरही येतो. यात महसूल प्रशासन व पोलीस विभागांचे संगनमत असते. कुणी चिरिमिरी देऊन सुटतात तर कुणी पळून जाण्यात यशस्वी ठरतात. मात्र रेतीचा अवैध गोरखधंदा बंद झालेला नाही.जिल्ह्यात सद्यस्थितीत ४६ रेतीघाट उपसा करण्याच्या स्थितीत आहे. यापैकी २०१५-१६ मध्ये झालेल्या लिलावादरम्यान आतापर्यंत सहा रेतीघाटांचे दिलेल्या मंजुरीप्रमाणे रेतीचा उपसा पूर्ण झालेला आहे. १५ रेतीघाटांचा उपसा अजुनही सुरू आहे. तर अन्य २५ रेतीघाट नियमितपणे कार्यरत आहे. वैनगंगा नदीपात्रात पाणी असेल तिथून वाळूचे खणन बंद आहे. जिथे पाणी वाहते व संथगती आहे अथवा पात्र कोरडे आहे, अशा ठिकाणाहून रेतीची वाहतुक सुरू आहे. ज्या नदीपात्रातून नियमाप्रमाणे रेतीचा उपसा केला जातो तिथे वजनकाटा नसल्याने कधी ओव्हरलोडेड ट्रक किंवा ट्रॅक्टर नदीपात्रातून बाहेर निघतो. त्यावर प्रशासन जलदगतीने कारवाई करते. परंतु ओव्हरलोडेड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत आहे. सातही तालुक्यातील ज्या नदीपात्रातून रेतीची वाहतूक सुरू आहे त्या घाटाजवळील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. रस्त्यावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून अपघातालाही आमंत्रण मिळत आहे. सर्वात जास्त वाईट स्थिती म्हणजे, ज्या घाटातून रेतीचा उपसा करून वाहन गावातून जात असल्यास तेथील रस्ते दयनीय झाले आहे. रेतीच्या अवैध वाहतुकीचा फटका अनेकांच्या जीवावर बेतला आहे. दुसरीकडे जे रस्ते जिल्हा मार्ग, राज्य मार्ग अथवा राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येतात त्या रस्त्यांच्या डागडुजीवरही शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च केला जातो. यात संबंधिताना पुन्हा वारेमाप पैसा मिळतो. मागील वर्षभरात अवैध वाहतुकीमुळे लहान मोठे अपघात घडले आहे. (प्रतिनिधी)ट्रक, टिप्परची वर्दळ थंडावलीविरली (बु.) : ट्रक चालक दिलीप रोहणकर यांच्या अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी हे लाखांदुरला येणार असल्यामुळे धास्तावलेल्या रेतीघाट कंत्राटदारांनी गुरूवारला रेतीघाट बंद ठेवले होते. परिणामी विरली-पवनी मार्गावर अविरत चालणारी रेतीच्या टिप्परची वर्दळ थंडावली. मंगळवारला रात्री लाखांदूरचे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड हे ओव्हरलोड रेती भरलेल्या टिप्परचा पाठलाग करीत असताना घाबरलेल्या चालकाने धावत्या ट्रकमधून उडी घेतली. यावेळी ट्रकच्या मागच्या चाकात दबून रोहणकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात की घातपात याविषयी चर्चा आहेत. या अपघाताच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी येणार असल्यामुळे रेतीघाट कंत्राटदारांनी लाखांदूर तालुक्यातील ईटान, नांदेड, मोहरणा हे रेतीघाट बंद ठेवले. त्यामुळे अहोरात्र चालणारी रेतीच्या टिप्परची वर्दळ आज थांबलेली दिसून आली. (वार्ताहर)