शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्राचे पुनरुज्जीवन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 00:19 IST

राज्यातील ग्रामीण भागातील दिर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करुन ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी....

गणेशपूरला ५७ लाखांचा निधी मंजूर : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे अर्थसहाय्य, नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील ग्रामीण भागातील दिर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करुन ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतून गणेशपूर ग्रामपंचायतच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी ५६ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून येत्या काही दिवसातच गणेशपूरवासीयांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. वैनगंगा नदीचे दूषित पाणी नागरिकांना नळाद्वारे पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने बाजू लावून धरली होती. १७ एप्रिलच्या अंकात ‘दोन लाख नागरिकांच्या हातात विषाचा प्याला’ या आशयाचे वृत्त प्रकाशित होताच, याची दखल घेत जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याचा पाठपुरावा केला. याबाबत मुंबई येथे १८ एप्रिलला तातडीची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत गणेशपूर येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने ५६ लाख ८१ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला. याबाबत राज्यशासनाने ३ मे ला अधिसूचना जारी केली आहे. यामुळे येत्या कालावधीत मागील काही वर्षांपासून रखडलेले गणेशपूर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम आता मार्गी लागणार आहे. या कामासाठी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, ग्रामपंचायत गणेशपूर, पाणीपुरवठा विभाग भंडारा यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याची फलश्रृती शासनाने गणेशपूर येथील जलशुध्दीकरण केंद्राला निधी देवून नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रशासनाच्या कार्यतत्परतेवर केंद्राचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.जि.प. कडे राहणार अधिकारपाणीपुरवठ्याच्या योजना यापुर्वी ग्रामपंचायतच्या अधिकारात राहत होत्या. मात्र त्यांच्याकडून योग्य अंमलबजावणी होत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनात आली. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची अंमलबजावणी योग्यरीत्या व्हावी यासाठी आता या योजनांचे अधिकार जिल्हा परिषद प्रशासनाकडे राहणार आहे. जि.प. सभेत उचलला मुद्दागणेशपूर येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने स्वजलधारा, महाजनधारा अंतर्गत पाणीपूरवठ्याची योजना तयार केली. त्या योजनेचे २० टक्के काम शिल्लक असून ते पूर्ण करण्यासाठी निधी देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी जि.प. सर्व साधारण सभेत लावुन धरली होती. यानंतर जलशुद्धीकरण योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्याबाबत पाहणी करुन अंदाजपत्रक तयार करण्यात आले. यानुसार प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याअनुषंगाने हा निधी उपलब्ध झाला आहे. ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाचा पाठपुरावागणेशपूर ग्रामवासीयांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जलशुध्दीकरण यंत्राचे रखडलेले काम पुर्ण करण्यासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी गणेशपूर ग्रामपंचायतीने अनेकदा शासनाकडे लावून धरली. या अनुषंगाने जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने ही याचा सतत पाठपुरावा केल्याने हा निधी उपलब्ध झाला आहे.नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. या अनुषंगाने सर्वांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला. प्रशासनाने याची दखल घेवून निधी उपलब्ध करुन दिला. येत्या कालावधीत जलशुध्दीकरण यंत्राचे रखडलेले काम पूर्ण होवून नागरिकांना शुध्द पिण्यासाठी पाणी मिळेल.- जया सोनकुसरे,जिल्हा परिषद सदस्य, भंडारा