शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

63 प्रकल्पांत केवळ 16 टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असे असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १९.५७ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी ४ जून रोजी ६३ प्रकल्पात १८.८४ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता. त्याची टक्केवारी १५.४८ एवढी होती. २०२० मध्ये २६.६९, टक्के जलसाठ्याची नोंद आहे. 

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उन्हाळ्याची दाहकता सुरू असून जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १६ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गत हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला. हे त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात दोन टक्क्यांनी घट झालेली आहे.लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पात केवळ ७. ९९ टक्के जलसाठा आहे. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे. सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ०.३१, बघेडा १४.७७, बेटेकर बोथली ३९.२८ आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा २१.३० टक्के आहे. जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्यस्थितीत ३९ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२.०६ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा १७.०७ टक्के आहे.जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी, पवनी तालुक्यातील वाही, भिवखिड़की, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी. लाखांदूर तालुक्यातील सालेवर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शीपार या प्रकल्पांचा समावेश आहे.गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असे असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १९.५७ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी ४ जून रोजी ६३ प्रकल्पात १८.८४ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता. त्याची टक्केवारी १५.४८ एवढी होती. २०२० मध्ये २६.६९, टक्के जलसाठ्याची नोंद आहे. यावर्षी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये “पाण्याचा अल्प साठा आहे. त्यामुळे जनावरांसाठी तसेच वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.

तीन प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट- लघु पाटबंधारे विभागांतर्गत खचलेल्या तीन प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. यात साकोली तालुक्यातील लवारी, केसलवाडा व कुंभली प्रकल्पांचा समावेश आहे. इतर प्रकल्पांमध्ये जलसाठा नाममात्र आहे. गोसेखुर्द धरणात १४८.५४ दलघमी उपयुक्त साठा असून त्याची टक्केवारी २०.०७ एवढी आहे. बावनथडी प्रकल्पात ५.२८ दलघमी उपयुक्त साठा असून त्याची टक्केवारी २.४३ टक्के एवढी आहे. भंडारा शहरानजीकच्या कारधा येथील वैनगंगा नदीपात्रात ४.४८ दलघमी जलसाठा आहे. - हवामान खात्याने आठवड्याभरानंतर मान्सूनचे आगमन होणार असल्याचे संकेत दिले आहे. सध्या मात्र अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्याने पाणीबाणी स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनचे लवकर आगमन न झाल्यास पाण्यासाठी नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाल्यास नवल वाटू नये. सध्या तरी अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

 

टॅग्स :water shortageपाणीकपातIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प