शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

63 प्रकल्पांत केवळ 16 टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असे असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १९.५७ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी ४ जून रोजी ६३ प्रकल्पात १८.८४ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता. त्याची टक्केवारी १५.४८ एवढी होती. २०२० मध्ये २६.६९, टक्के जलसाठ्याची नोंद आहे. 

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उन्हाळ्याची दाहकता सुरू असून जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १६ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गत हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला. हे त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात दोन टक्क्यांनी घट झालेली आहे.लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पात केवळ ७. ९९ टक्के जलसाठा आहे. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे. सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ०.३१, बघेडा १४.७७, बेटेकर बोथली ३९.२८ आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा २१.३० टक्के आहे. जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्यस्थितीत ३९ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२.०६ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा १७.०७ टक्के आहे.जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी, पवनी तालुक्यातील वाही, भिवखिड़की, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी. लाखांदूर तालुक्यातील सालेवर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शीपार या प्रकल्पांचा समावेश आहे.गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असे असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १९.५७ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी ४ जून रोजी ६३ प्रकल्पात १८.८४ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता. त्याची टक्केवारी १५.४८ एवढी होती. २०२० मध्ये २६.६९, टक्के जलसाठ्याची नोंद आहे. यावर्षी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये “पाण्याचा अल्प साठा आहे. त्यामुळे जनावरांसाठी तसेच वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.

तीन प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट- लघु पाटबंधारे विभागांतर्गत खचलेल्या तीन प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. यात साकोली तालुक्यातील लवारी, केसलवाडा व कुंभली प्रकल्पांचा समावेश आहे. इतर प्रकल्पांमध्ये जलसाठा नाममात्र आहे. गोसेखुर्द धरणात १४८.५४ दलघमी उपयुक्त साठा असून त्याची टक्केवारी २०.०७ एवढी आहे. बावनथडी प्रकल्पात ५.२८ दलघमी उपयुक्त साठा असून त्याची टक्केवारी २.४३ टक्के एवढी आहे. भंडारा शहरानजीकच्या कारधा येथील वैनगंगा नदीपात्रात ४.४८ दलघमी जलसाठा आहे. - हवामान खात्याने आठवड्याभरानंतर मान्सूनचे आगमन होणार असल्याचे संकेत दिले आहे. सध्या मात्र अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्याने पाणीबाणी स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनचे लवकर आगमन न झाल्यास पाण्यासाठी नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाल्यास नवल वाटू नये. सध्या तरी अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

 

टॅग्स :water shortageपाणीकपातIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प