शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

आगरात बांबू नाही, बाहेर दुप्पट भाव, पोट भरायचे कसे? कारागिरांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 3:17 PM

आगरातून बांबूचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांकडून ५० रुपये प्रती बांबू विकत घ्यावा लागतो. परिणामी व्यवसायातून उत्पन्न व खर्चाचा मेळ बसत नाही.

ठळक मुद्देबांबूचा पुरवठा करा, हमी भावाने खरेदी व पेंशनची मागणी

युवराज गोमासे

भंडारा : आगरात बांबू नाही, बाहेरून खरेदी करताना दुप्पट भाव. प्लास्टिकच्या वस्तूच्या अधिक वापराने बांबूच्या वस्तूंना ग्राहकच मिळेना. कोरोनातून सावरत नाही तोच महागाईचा फटका, आता आम्ही पोट तरी कसे भरावे, ना इलाजाने रोजगार हमीच्या कामावर जाण्याची वेळी आली, अशी व्यथा मोहाडी तालुक्यातील पालोराचे बांबू कारागीर सांगत होते. ही अवस्था एकट्या पालोराचीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांची आहे.

वनविभागाच्या आगारातून हमी भावाने कारागीर बांबूची खरेदी करतात. त्यापासून टोपले, सुप, पड्डे, ताटवे, चटई, ढोली, मासेमारीसाठी ढुटी, पंखे यासह विविध वस्तू तयार केल्या जातात. आगरातून कार्डधारक व्यावसायिकांना २० ते २२ फूट लांबीचा बांबू २५ ते ३० रुपयांच्या हमी भावात मिळायचा. मात्र ३० जून २०२१ पासून तुमसर वन विभागाच्या पालोरा आगरात बांबू नाही. कार्डधारकांकडून वारंवार मागणी करूनही पुरवठा होत नाही. कोरोना काळापासून बांबू व्यवसाय कमालीचा रोडावला. कोरोना काळात आठवडी बाजार बंदचाही फटका बसला. त्यातच घराघरात प्लास्टिक वस्तूंचा वापर वाढीस लागल्याने व्यवसाय कमालीचा अडचणीत सापडला आहे. वस्तू विकल्या जात नाही. खर्चाधारित भावही मिळत नाही. त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे.

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

आगरातून बांबूचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांकडून ५० रुपये प्रती बांबू विकत घ्यावा लागतो. परिणामी व्यवसायातून उत्पन्न व खर्चाचा मेळ बसत नाही. आठवडी बाजार, शेजारील गावात फेरी मारून ५० ते ३०० रुपयांपर्यंत वस्तूंना भाव मिळतो. पोट भरण्यापुरताही पैसा उपलब्ध होत नाही. त्यातच कीड व अधिक खडे असलेला व निस्तार बांबूमुळे नुकसान अधिक असते, अशी कैफियत बांबू कारागिरांनी मांडली.

जिल्ह्यात बांबू व्यवसायातील गावे

जिल्ह्यात भंडारा, मेंढा, अडयाळ, पालोरा, लाखनी, साकोली, बारव्हा, मुंढरी, माटोरा, सुकळी, मानगाव आदी गावात हा व्यवसाय केला जातो. ठेकेदाराच्या माध्यमातून वरठी रेल्वेस्थानकावरून नागपूर शहरात मालाचा पुरवठा केला जातो.

कार्डधारक बांबू कारागिरांना उपेक्षितांचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे विडी कारागिरांप्रमाणे पेंशनचा लाभ देण्यात यावा, औषधोपचारासाठी मोफत सुविधा मिळावी, कोरोना काळातील नुकसान भरपाई देण्यात यावी.

- हरिश्चंद्र कोडापे, बांबू कारागीर पालोरा.

पालाेरा येथील बांबू आगरात वेळेत व हमी भावात वनविभागाने बांबू उपलब्ध करून द्यावा, हस्तकलेच्या वस्तुंची शासनाने हमी भावा खरेदी केल्यास फायदा होईल.

- बाबुलाल कोडापे, बांबू कारागिर पालोरा.

टॅग्स :Socialसामाजिकbhandara-acभंडाराVidarbhaविदर्भ