शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राच्या ऐक्यासाठी झटणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:27 IST

राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रातील भिन्न भिन्न व्यक्तीची मने जोडण्याची प्रक्रिया होय.

राहुल डोंगरे यांचे प्रतिपादन : तुमसरात माजी सैनिकांचा मेळावातुमसर : राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रातील भिन्न भिन्न व्यक्तीची मने जोडण्याची प्रक्रिया होय. राष्ट्राच्या नागरिकांच्या मनात सुख दु:खाच्या समान भावना असायला पाहिजेत. पारतंत्राच्या ज्या तन्मयतेने, एकजुटीने त्या काळाची तरुण पिढी काढली. त्याच तन्मयतेने, जिद्दीने व त्यागाने देशाचे अखंडत्व कायमस्वरुपी टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी लढले पाहिजे. आपला धर्म हा आपल्या घरापुरताच मर्यादित ठेवून राष्ट्रधर्म हा श्रेष्ठ धर्म आहे असे यातून राष्ट्राच्या ऐक्यासाठी भारतीयांनी झटणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांनी केले. दिव्य ज्योती माजी सैनिक बहुउद्देशिय संस्था तुमसर - मोहाडीच्या विद्यमाने महिला महाविद्यालय तुमसर येथे आयोजित माजी सैनिक मेळाव्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर सुभाष सेलोकर, उद्घाटक के.के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नायब सुभेदार भोला कांबळे, माजी कॅप्टन कुंडलिक आगाशे मंचकावर उपस्थित होते.डोंगरे पुढे बोलताना सांगितले की, विविधतेत एकता असलेले आपले राष्ट्र आहे. आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेमुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्त्वासाठी आंबेडकरांनी जनतेस शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला. त्या संदेशाला प्रत्यक्ष कृती आणणे काळाची गरज ठरली आहे. शहीद लान्स नायक हनुमंतच्या सारखे वीरपुत्र या भारतमातीला लाभलेले आहेत. याच जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत. भारतीयांनी सम्राट अशोक, छत्रपती शिवायी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांचे पुरोगामी विचार अंगिकारले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्णा तितीरमारे यांनी तर संचालन व आभार शंकरलाल रुंधे यांनी केले. यशस्वितेकरिता मनोहर तुरकर, अर्जुन हिंगे, सुरेश सेलोकर, सावित्रीबाई महिला बचत गट, जिजामाता माजी सैनिक, महिला बचत गट व दिव्य ज्योती माजी सैनिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)