शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

मोहाडीत तीन घरे आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 1:09 AM

येथील सुभाष वॉर्डात तीन घरांना लागलेल्या आगीत जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. आगीत तीन घरांपैकी दोन घरे पूर्णपणे जळालेली आहे तर एका घरातील एक भाग जळालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाड़ी : येथील सुभाष वॉर्डात तीन घरांना लागलेल्या आगीत जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. आगीत तीन घरांपैकी दोन घरे पूर्णपणे जळालेली आहे तर एका घरातील एक भाग जळालेला आहे.सुभाष वॉर्डातील शेवटच्या टोकावर असलेले देवराम शेंडे, सुखदेव शेंडे व रामप्रसाद शेंडे यांच्या घराला लागून असलेल्या शेतीच्या धुऱ्यावरील गवत जाळण्यासाठी कोणीतरी आग लावली.हवेमुळे ती आग या घराला लागली, असा अंदाज आहे, परिसरातील आकाश पिकलमुंडे, बादल सोनवाने, जितु सोनवाने, गुरुदेव बांते यांनी घराला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे विशेष प्रयत्न केले.तसेच चेतन गोपीचंद शेंडे या युवकाने जिवाची पर्वा न करता घरात असलेले गॅस सिलेंडर बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून नष्ट झाले, आग लागल्याची सूचना प्राप्त होताच ठाणेदार शिवाजी कदम पोलीस कर्मचारी विनोद सेलोकर, पवन राऊत, मिथुन चांदेवार, आशीष तिवारी, ज्ञानेश्वर हाके, संजय बडवाईक, संजय वाकलकर, राजेश गजभिये यांनी घटनास्थळावर धाव घेवून मदत कार्यात सहभाग घेतला, तुमसर नगर परिषदेची अग्निशमन बंब येत पर्यंत वॉर्डातील युवकांनी आग आटोक्यात आणली होती.यात आशिष पात्रे यांच्या पाण्याच्या टँकरने वेळीच घटनास्थळावर पोहोचून फार मोठी कामगिरी बजावली. या घटनेत देवांगणा सुखदेव शेंडे यांनी पेटीत ठेवलेले चार हजार रुपये तसेच मंगळसूत्र व दोन नथ वितळून नष्ट झाल्या तर कविता देवराम शेंडे यांनी पेटीत ठेवलेले आठ हजार रुपये नगदी व त्यांच्या सासूचे आठ हजार रुपये जळून नष्ट झाले, याशिवाय घरातील संपूर्ण साहित्य ची राखरांगोळी झाली.घरातील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तु, कपडे, इतर साहित्य जळून खाक झाले असल्याने त्यांच्यावर मोठेच संकट कोसळलेले आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आहे.

टॅग्स :fireआग