शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
4
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
5
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
6
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
7
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
8
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
9
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
10
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
11
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
12
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
13
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
14
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
15
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
16
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
17
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
18
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
19
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
20
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर

जलसंपदा विभागाअंतर्गत लाखोंचे हवामान यंत्र भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:32 AM

मोहन भोयर तुमसर : हवामान बदलाचे अचूक माहिती देणारे पाटबंधारे विभागांतर्गत जलसंपत्ती विभागाचे लाखोंचे हवामान यंत्र भंगार झाले आहे. ...

मोहन भोयर

तुमसर : हवामान बदलाचे अचूक माहिती देणारे पाटबंधारे विभागांतर्गत जलसंपत्ती विभागाचे लाखोंचे हवामान यंत्र भंगार झाले आहे. तुमसर तालुक्यातील आलेसूर गावाजवळ हवामान यंत्र व सदनिकांची दुरवस्था झाली आहे. हवामान बदल व हवामानाची माहिती देण्याकरिता येथे लाखोंचा निधी खर्च करून हवामान यंत्र लावण्यात आले होते. नियोजनाच्या अभावामुळे सदर यंत्र सध्या धूळखात पडून आहे. शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसत आहे.

राज्याच्या शेवटच्या टोकावर तुमसर तालुक्यातील आलेसूर गावाजवळ महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभाग जलसंपत्ती विभाग अंतर्गत जलसंपदा विभाग क्रमांक चार नागपूरअंतर्गत आलेसूर गावाजवळ सितेकसा हवामान केंद्र आहे. या हवामान केंद्र ची दुरवस्था झाले असून, संपूर्ण हवामान केंद्र हे भंगार झाले आहे. येथे सदनिकांची दुरवस्था झाली आहे.

हवामान केंद्र व सदनिका येथे वाऱ्यावर सोडणे झाल्याचे दिसून येते. राज्य शासनाने लाखो रुपये खर्च करून सदर हवामान केंद्र व कर्मचाऱ्यांकरिता वसाहती बनविल्या होत्या; परंतु त्यांच्या येथे उपयोग होताना दिसत नाही.

सितेकसा येथे बावनथडी प्रकल्प असून जंगल व्याप्त परिसरात आलेसूर येथे गावाशेजारी हवामान केंद्र व कर्मचाऱ्यांच्या वसाहती बांधकाम करण्यात आले आहे. सुरुवातीला हवामान केंद्र सुरळीत सुरू होते; परंतु त्यानंतर हे हवामान केंद्र बंद करण्यात आले. हवामान बदलाची अचूक माहिती देण्याकरिता राज्य शासनाने येथे हवामान केंद्र तयार केले होते. परंतु त्यानंतर सदर हवामान केंद्र का बंद करण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.

सदर हवामान केंद्र उभारण्याकरिता शासनाच्या नियमानुसार संबंधित विभागाने प्रस्ताव सादर केला होता त्यानंतर राज्य शासनाने लाखोंचा निधी येथे मंजूर केला. हवामानाची अचूक माहिती मिळावी हा त्यामागील उद्देश होता.

हवामान केंद्र व वसाहती स्थापन केल्यानंतर येथील हवामान केंद्र का बंद करण्यात आले हे न उलगडणारे कोडे आहे. शासनाच्या निधीच्या येथे अपव्यय करण्यात आलेले दिसून येते शासन व प्रशासनाचे नियोजनाअभावी लाखोंचा निधी येथे पाण्यात गेला आहे. शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे.

हवामान केंद्राची उपयोगीता असल्यामुळेच येथे हवामान केंद्र तयार करण्यात आले होते. सध्या हवामान केंद्राची उपयोगीता नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हवामान केंद्राची उपयोगिता नव्हती तर ते कां तयार करण्यात आले. असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधून संबंधित विभागाला विभागाला जाब विचारण्याची गरज आहे.