शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

कोरोनातील अल्प खर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 5:00 AM

दिवाळीपासून विवाह समारंभ सुरू झालेली आहेत. शहरासह ग्रामीण भागात सुद्धा विवाह सोहळा शाही थाटाऐवजी केवळ मोजक्याच लोकात व आप्तस्वकीयात पार पडत आहेत. संभाव्य कोरोनाचा धोका लक्षात घेता सामाजिक जबाबदारीचे ध्येय बाळगून स्वतः मास्क वापरत  इतरांना सुद्धा मास्क वापरण्याचा मौलिक सल्ला अप्रत्यक्ष दिलेला आहे.

ठळक मुद्देजनसामान्यासह वर-वधू सुद्धा कोरोनाशी लढण्यास सज्ज!

  लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : कोरोनामुळे विवाह समारंभावर ही बंधने आली आहेत. थेट आठ महिन्यापासून बंद असलेली सामाजिक  परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेली विवाह परंपरा सुरू झाली आहेत. यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, याकरिता वर्‍हाडी मंडळीसह वर-वधूने सुद्धा मास्क वापरत सर्वांना कोरोनाच्या काळात आरोग्याचा नैसर्गिक मूलमंत्र दिलेला आहे.दिवाळीपासून विवाह समारंभ सुरू झालेली आहेत. शहरासह ग्रामीण भागात सुद्धा विवाह सोहळा शाही थाटाऐवजी केवळ मोजक्याच लोकात व आप्तस्वकीयात पार पडत आहेत. संभाव्य कोरोनाचा धोका लक्षात घेता सामाजिक जबाबदारीचे ध्येय बाळगून स्वतः मास्क वापरत  इतरांना सुद्धा मास्क वापरण्याचा मौलिक सल्ला अप्रत्यक्ष दिलेला आहे.जग जसे बदलते तसेच आपण सुद्धा बदलत निसर्गाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. निसर्गानेच कोरोणा सारख्या संसर्गजन्य आजाराला जन्माला घातलेले आहे . प्रदूषण हा सर्वात मोठा शत्रू आरोग्याचा ठरला आहे. त्यामुळे खूप मोठ्या लोकांची गर्दी काढून मोजक्याच आप्तस्वकीय नाते मंडळीत लग्न करण्याची प्रेरणा कोरोनाने समाजाला दिलेली आहे. कमी खर्चात व्यवस्थित लग्न उरकण्याची नियमावली कोरोनाने आखुन दिलेली आहे. लोकही समजदार झाले असून समजदारीतूनच कोरोना सारख्या महामारी वर निश्चितच ब्रेक लागलेला आहे. भारतासारख्या १३५ करोड जनतेत सामाजिक अंतर राखत कोरोणाची साखळी तोडणे अशक्य असतानासुद्धा  सामंजस्य राखत विवाह सोहळा पार पडत आहेत.कोरोना ची दुसरी लाट येण्याची शक्यता  सगळी कडूनच  वर्तवण्यात आलेली होती. तिला रोखणे नितांत गरजेचे होते. रोखण्याकरिता समाजातील प्रत्येक स्तरातून समाज प्रबोधन केले गेले. शासन व प्रशासनाकडून सुद्धा आम जनतेला आवाहन करीत कोरोना ची साखळी सोडण्याकरता सहकार्याचे आवाहन नक्कीच इतरांना प्रेरणादायी ठरली असे वाटते.  प्रत्येकांनी कोरोना नियंत्रणासाठी नियम पाळण्याचे आवाहन होत आहे.कोरोना नियंत्रणासाठी नियम पाळण्याचे आवाहन कोरोना संसर्गजन्य आजारापासून प्रत्येकाला सावध राहणे नितांत गरजेचे आहे. कोरोना ने लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, असा भेद न करता त्याने आपली वचक सर्वांवर ठेवण्याचा प्रयत्न केला.  मात्र ज्यांनी आरोग्याचा नियम पाळला, त्याला निश्चितच कोरोना शिवू  शकला नाही हे विशेष.

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या