शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा आगडोंब, शेतकऱ्यांची गळचेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST

अर्जुनी-मोरगाव : ‘अच्छे दिन आएंगे’चा नारा काही वर्षांपूर्वी गुंजला होता. ‘अच्छे दिन’ तर सोडाच मात्र जुने दिवससुद्धा कायम राहू ...

अर्जुनी-मोरगाव : ‘अच्छे दिन आएंगे’चा नारा काही वर्षांपूर्वी गुंजला होता. ‘अच्छे दिन’ तर सोडाच मात्र जुने दिवससुद्धा कायम राहू शकले नाहीत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे वाढती महागाई अशा दुष्टचक्रात जनता अडकली आहे. वाढत्या महागाईवर केंद्र सरकारने लगाम लावावा, अशी मागणी माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.

पेट्रोल, गॅस सिलिंडरच्या दरात दैनंदिन वाढ होत आहे. तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट बिघडले आहे. गॅस सिलिंडरचे दर गेल्या एक महिन्यात सुमारे दोनशे रुपयांनी वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे दरवाढ झाल्याचे सांगितले जाते. मात्र, तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर त्या प्रमाणात किमती कमी होत नाहीत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचे दर वाढले.

या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. त्याचा विचार सरकारने केला पाहिजे, असे मत परशुरामकर यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे इफकोने खताच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. डीएपीच्या किमती ५८ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

राज्यातील शेतकरी डीएपीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. रब्बी हंगामात अडीच लाख टन तर खरीपमध्ये सहा लाख टनांपर्यंत डीएपीची विक्री होते. १२०० रुपयांना मिळणारे डीएपी १९०० रुपयात मिळणार आहे. १०:२६:२६ हे खत ११७५ रुपयांत मिळत होते. ते आता १७७५ रुपयात मिळणार आहे. तर १२:३२:१६ हे खत ११८५ रुपयाला मिळत होते ते आता १८०० रुपयांना मिळणार आहे. या खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. सरकारने याचा विचार करून दरवाढीवर नियंत्रण राखावे अन्यथा शेतकऱ्यांना जगणे मुश्किल होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.