शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविणे सुरू

By admin | Updated: September 27, 2014 23:09 IST

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना आपल्या जुन्या गावातील साहित्य नवीन गावठानात नेता यावे याकरीता गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम मागील पाच दिवसापासून २३९.६०० मीटरवर थांबविण्यात आले होते.

गोसे (बुज.) : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना आपल्या जुन्या गावातील साहित्य नवीन गावठानात नेता यावे याकरीता गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम मागील पाच दिवसापासून २३९.६०० मीटरवर थांबविण्यात आले होते. जलस्तर वाढविण्याचे काम कालपासून सुरू करण्यात आले आहे. आज जलस्तर २३९.६५० मीटरवर गेला आहे. भंडारा जिल्ह्यातील पाथरी व सावरगाव तातडीने रिकामे करण्याची गरज आहे. केंद्रीय जलआयोगाच्या संचालकाच्या मार्गदर्शनात एका चमूने गोसीखुर्द धरणाला भेट देऊन धरणातील जलस्तर वाढविण्याच्या कामावर समाधान व्यक्त केले. संचालकांनी धरणामध्ये ३० तारखेपर्यंत २४० मीटरपर्यंत जलस्तर वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु बुडीत क्षेत्रातील अनेक गावातील प्रकल्पग्रस्त हळुवारपणे गाव सोडत असल्यामुळे जलस्तर वाढविण्याकरिता समस्या येत आहेत. पाथरी गावातील मुख्य रस्ता धरणाच्या पाण्यात बुडण्याची शक्यता असल्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करूनच धरणाचा जलस्तर वाढविला जात आहे. भंडारा जिल्ह्यातील पाथरी व सावरगावला तातडीने रिकामे करण्याची गरज आहे. पाथरी गावातील ४३८ कुटूंबे धरणातील पाण्याने बाधीत होत आहेत. त्यापैकी अनेक कुटूंबानी नवीन गावठानात स्थानांतरण केले आहे. या गावातील चारही बाजूंना धरणाचे पाणी होऊन रस्ते बुडाले आहेत. या गावात अजुनही हे कुटुंब त्यांची शेती जवळ असल्याने राहत आहेत. त्यांनाही हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गावातील तिन्ही रस्ते बंद झाले असून एक रस्ता खुला आहे. नवेगावमध्ये पाणी शिरले असून पुर्ण गाव रिकामे झाले आहे. सिर्सीमध्ये पाणी शिरले असून उंचावरील भागात काही कुटुंबे राहत आहेत. अनेक गावातील प्रकल्पग्रस्तांना योजनेचा लाभ मिळाला नसल्यामुळे ते गाव सोडायला तयार नाहीत. (वार्ताहर)