शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मदत वाऱ्यावरच; रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:37 IST

भंडारा : हातावर कमावून पानावर खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालकांचाही समावेश आहे. ऑटो धावला नाही ...

भंडारा : हातावर कमावून पानावर खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालकांचाही समावेश आहे. ऑटो धावला नाही तर घरातील चूलही पेटणार नाही अशी अवस्था ऑटोरिक्षाचालकांची आहे. त्यातही संचारबंदीमुळे ऑटोरिक्षा बंद असल्याने जिल्ह्यातील या चालकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. उल्लेखनीय म्हणजे राज्य शासनाने ऑटोरिक्षा चालकांना घोषित केलेली दीड हजार रुपयांची मदतही अजूनपावेतो मिळालेली नाही.

प्रवासी वाहतूक करणारी वाहने प्रवाशांसाठी जीवनवाहिनीचे काम करतात. नागरिक, विद्यार्थी व अन्य वाहतुकीची व सुरक्षेची खात्री करून अन्य ठिकाणी पोहोचविण्याचे उत्तम साधन म्हणून ऑटोरिक्षाची ओळख आहे.

गतवर्षीपासुन सुरू झालेल्या कोरोना संकटामुळे, तर दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे ऑटोरिक्षा व्यावसायिक संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत कुटुंबाचा गाढा ओढायचा तरी कसा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित आहे. अनेक रिक्षाचालक मोलमजुरी करीत आहेत. संचारबंदी घोषित करण्यापूर्वी कष्टकऱ्यांना उपाशीपोटी राहू देणार नाही अशी ग्वाही देत राज्य शासनाने ऑटोरिक्षा चालकांनाही दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही.

ऑटोरिक्षा बंद असल्याने गत २० दिवसांपासून रोजी मिळाली नाही. हाताला काही काम मिळेल या आशेपोटी घराबाहेर गेल्यास संचारबंदीमुळे कामही मिळत नाही. शेतशिवारातही काम उपलब्ध असले तरी अपेक्षेप्रमाणे मजुरी मिळत नाही. शेतातही साहित्य पडून असल्याने त्यांच्याकडून मजुरी मिळेल किंवा नाही अशीही चिंता सतावते. शासनाने मदत करण्याची घोषणा केली. २५ दिवसांचा कालावधी लोटला; पण मदत मिळालेली नाही. शासन आमची थट्टा तर करीत नाही ना असे वाटते.

-सरोज रामटेके, ऑटो रिक्षाचालक

संचारबंदीमुळे ऑटोरिक्षा व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आमचे संपूर्ण आयुष्य ऑटोरिक्षा चालविण्यात गेले. दुसरा व्यवसाय काय करावा, असाही प्रश्न उपस्थित होतो. व्यवसाय करण्यास गेले की हातात पैसा नाही. कुटुंबाचा गाढा ओढायचा की व्यवसायात पैसे गुंतवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तुटपुंजी मदतीची घोषणा केली. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. दीड हजार रुपये कधी मिळणार हे दिवास्वप्नच वाटते.

-संजय हटवार, ऑटो रिक्षाचालक

कोरोना महामारीचा मोठा फटका ऑटोरिक्षा व्यवसायाला बसला आहे. मध्यंतरी पेट्रोलचे भाव १०० च्या वर पोहोचले. ते दर आजही कायम आहेत. संचारबंदीमुळे ऑटो धावत नाही. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही काळ काम मिळाले, मात्र त्यानंतर पुन्हा व्यवसाय बंद पडले आहेत. शासन मदत करेल या अपेक्षेत आम्ही आहोत. मात्र, मिळणारी मदतही तोकडीच आहे. दीड हजार रुपयांत काय करावे आणि काय नाही अशी अवस्था आमची झाली आहे. नोंदणी असलेल्या ऑटोरिक्षाचालकांना मदत मिळेल; पण ज्यांची नोंदणी झालीच नाही अशा रिक्षाचालकांनी करावे तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो. - गुरुदेव बोंदरे, ऑटो रिक्षाचालक

ऑटोरिक्षा म्हणजे जीवनवाहिनीचे कार्य करून इतरांना गंतव्य ठिकाणी पोहोचवत असतो. मात्र, गत २० दिवसांपासून आमचा व्यवसाय पूर्णत: ठप्प आहे. कुठे अन्यत्र कामही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा गाडा ओढायचा कसा, असा प्रश्न निर्माण होतो. घोषणेअंतर्गत मदत तत्काळ मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, तीन आठवडे लोटूनही मदत बँकेच्या खात्यात जमा झाली नाही. आता मदत खूप उशिरा मिळत असेल तर त्याला अर्थही राहणार नाही. किंबहुना मिळणारी मदतही तुटपुंजी असल्याने त्यात कुठल्या गरजा पूर्ण करायच्या असा प्रश्न उपस्थित होईल. कुठलेही नियोजन करताना त्यातील मदत लवकर मिळावी अशी आमची मागणी आहे. - विनोद डोरले, ऑटो रिक्षाचालक