शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

ते ७० वर्षांपासून सांभाळताहेत भजनाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:38 IST

लाखांदूर : गत ७० वर्षांपूर्वी भजनी मंडळाच्या माध्यमातून धार्मिक वातावरण शहरामध्ये निर्माण करण्याचे कार्य लाखांदूर येथील श्री संत गाडगेबाबा ...

लाखांदूर : गत ७० वर्षांपूर्वी भजनी मंडळाच्या माध्यमातून धार्मिक वातावरण शहरामध्ये निर्माण करण्याचे कार्य लाखांदूर येथील श्री संत गाडगेबाबा भजनी मंडळ करीत आहे. ही भजनाची परंपरा आजही जोपासत असून, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करीत आहेत.

या भजनी मंडळाची स्थापना १९९६ रोजी लाखांदूर येथे झाली. गत ७० वर्षांपासून भजनी मंडळाच्या माध्यमातून धार्मिक वातावरण शहरामध्ये निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. या माध्यमामधून संस्कार व सांस्कृतिकपणा जपलेला आहे. कोणतेही आमिष न घेता भजनी मंडळ धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेत असतो.

या भजन मंडळाची स्थापना गोदरु कडिखाये यांनी ७० वर्षांपूर्वी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन केली. तोच वसा येथील श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीचे सचिव मार्गदर्शक फागो कडिखाये यांनी परंपरा कायम ठेवून आज रोजी संबंधित भजनी मंडळ कायम अविरत सुरु आहे. भजनी मंडळामध्ये अनेक बाल-गोपाल सहभागी होऊन जडण-घडणाचे कार्य येथे होते. भजनी मंडळ सर्व महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, जन्माष्टमी, गौरी, श्रावणमास, नवरात्री, भागवत सप्ताह, काकड आरती, अंत्ययात्रा, गणेशोत्सवात अनेकांच्या घरी भजन मंडळ सहभाग घेत असतो. यातून मंडळाच्या सुरेल भजनाला मागणी वाढली आणि लाखांदूर शहर आणि परिसरात त्यांचे भजनाचे कार्यक्रम सुरू झाले. संतपरंपरेतून सुरू असलेल्या वारकरी सांप्रदायिक भजनाची गोडी सध्याच्या आधुनिक युगात रिमिक्स जमान्यात काहीशी कमी होत असल्याचे दिसते. ही भजन परंपरा टिकून राहावी व आजच्या तरुणाईला तिची गोडी लागावी, या हेतूने काही प्रसिद्ध भजनप्रेमी आणि संगीत संस्थांनी पुढाकार घेऊन या भजनाला शास्त्रीय स्वरूप दिले. तिथूनच खरी संगीत भजनाला सुरुवात झाली. यात लाखांदूरच्या श्री संत गाडगेबाबा भजन मंडळ यांचा समावेश आहे.

आज तिसऱ्या पिढीतील बालगोपालांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे. त्यामध्ये मानव कडिखाये, नितीन पारधी, कुणाल प्रधान, भोजराज एफजी कडिखाये, गणेश ठाकरे, सुरेश नेवारे, हरिदास राऊत, हेमराज प्रधान, रमेश खरकाटे, रामकृष्ण दिवटे, वसंता गुरनूले, सूरज तलमले, मंगेश मोहुर्ले, प्रकाश राऊत, गणेश कार, योगेश भुते, संजू वाटगुळे, आदित्य वाटगुळे, प्रेमानंद गुरनूले, उन्नती कडिखाये, अरुणा कडिखाये यांच्यासह या भागातील बालगोपाल ही परंपरा जोपासत आहेत.

170921\1315-img-20210917-wa0006.jpg

गणपती दरम्यान भजन सादर करतांना भजनी मंडळ