शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हरदोली ग्रामपंचायतीने उभारली वेशीवर तटबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

नागपूर शहर रेड झोनमध्ये असून अनेकजण विविध मार्गाने भंडारा जिल्ह्यात शिरतात. त्यामुळे ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. शासनाने विविध निर्देश देवून जिल्ह्याची सीमा बंद केली आहे. आता गावकऱ्यांनी त्याही पुढे जावून गावाची सीमा बंद करणे सुरु केले आहे. हरदोली ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला असून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाशी दोन हात : ग्राम संरक्षक दलाची स्थापना, गावात येणाऱ्यांची केली जाते नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना भंडारा जिल्हा कोरोना मुक्त आहे. तो कोरोनामुक्तच राहावा यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या आहे. आता त्याला गावकरीही साथ देत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली ग्रामपंचायतीने तर गावच्या वेशीवर तटबंदी उभारली आहे. गावात येणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षा दलासमोर हजेरी घेतली जाते. महानगरातून येणाºया अनोळखी व्यक्तींना गावात बंदी घालण्यात आली आहे.
नागपूर शहर रेड झोनमध्ये असून अनेकजण विविध मार्गाने भंडारा जिल्ह्यात शिरतात. त्यामुळे ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. शासनाने विविध निर्देश देवून जिल्ह्याची सीमा बंद केली आहे. आता गावकऱ्यांनी त्याही पुढे जावून गावाची सीमा बंद करणे सुरु केले आहे. हरदोली ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला असून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली आहे. सरपंच सदाशिव ढेंगे यांच्या मार्गदर्शनात २३ युवक या सुरक्षा दलात सहभागी झाले आहेत. कोविड-१९ ग्राम संरक्षण दल असे नाव ठेवले आहे. समितीत अध्यक्ष, सरपंच, सचिव, पोलीस पाटील, निमंत्रक म्हणून ग्रामसेवक आणि २६ सदस्य आहेत.
गावात शिरण्यासाठी चार रस्ते आहेत. त्यातील एक रस्ता नागपूरकडून येतो. त्या चारही ठिकाणी सुरक्षा रक्षक आळीपाळीने कडा पहारा देत असतात. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करुन नोंद घेतली जाते. बाहेरुन येणाऱ्यांवर नियंत्रण राहावे, गावात विणाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर अंकुश लावावा, गावात गर्दी कमी व्हावी आदी उपाययोजना केल्या जातात. या सर्व सर्वांवर देखरेख सरपंच सदाशिव ढेंगे, पोलीस पाटील पंढरीनाथ झंझाड, ग्रामसेवक गोपाल बुरडे आदी करीत आहेत. लॉकडाऊनपर्यंत ही सेवा सुरु राहणार आहेत.

परप्रांतीयांना वाहनातून दिले सोडून
मध्यप्रदेशातील अनेक मजूर औरंगाबादमधून पायी आपल्या गावाकडे जात होते. हरदोलीवरुन जात असताना हा प्रकार सुरक्षा दलाच्या लक्षात आला. त्यांनी या मजुरांच्या भोजनाची व्यवस्था केली. तसेच आमदार राजू कारेमोरे यांच्या माध्यमातून अन्नधान्याची किट देण्यात आली. या सर्वांना एका वाहनाने तुमसर येथे सोडून देण्यात आले.

बाहेरुन माणसे कुठून येतात. याची माहिती व्हावी, तसेच गावात कोरोनाचा संशयित शिरु नये म्हणून उपाययोजना करण्यात आली. गावच्या चारही वेशीवर ग्रामरक्षक ठेवण्यात आले आहे.
-सदाशिव ढेंगे, सरपंच हरदोली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या