शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

स्टेअरिंगवरील हात स्थिरावले शेतीकामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

धनवंत चामलाटे रा.पलाडी असे या चालकाचे नाव आहे. ते एसटी महामंडळात नियमित बसचालक म्हणून कार्यरत होते. सुमारे २५ वर्ष निष्णात हातांनी शेकडो प्रवाशांना त्यांनी आपल्या गावापर्यंत पोहचविले होते. मात्र कोरोनाचे संकट आले. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जगण्यासाठी एकच पर्याय उरला. तो म्हणजे शेती. आपल्या वडीलोपार्जीत शेतीत भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन केले.

ठळक मुद्देबसचालकाची कहाणी, कोरोनाने बदलले जीवनाचे अर्थकारण

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाचा परिणाम जाणवायला लागला आहे. अनेकांचा रोजी रोटीचा व्यवसायही बंद झाला. नोकरीवर असणाऱ्यांना घरी पाठविण्यात आले. जीवन जगण्यासाठी व्यवसाय बदलून संघर्ष सुरु झाला. असाच संघर्ष एसटी महामंडळातील चालकाच्या वाट्याला आला. महामंडळाने सक्तीच्या रजेवर पाठविले. मात्र त्याने स्वस्थ न बसता शेतीत वेळ घालविणे सुरु केले. भाजीपाला उत्पादनातून आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न चालविला. निष्णातपणे एसटीबस ते स्टेअरिंग सांभाळणारे हात आता शेतीव्यवसायात स्थिरावले आहेत.धनवंत चामलाटे रा.पलाडी असे या चालकाचे नाव आहे. ते एसटी महामंडळात नियमित बसचालक म्हणून कार्यरत होते. सुमारे २५ वर्ष निष्णात हातांनी शेकडो प्रवाशांना त्यांनी आपल्या गावापर्यंत पोहचविले होते. मात्र कोरोनाचे संकट आले. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जगण्यासाठी एकच पर्याय उरला. तो म्हणजे शेती. आपल्या वडीलोपार्जीत शेतीत भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन केले. पाऊण एकरात भाजीपाला पिकाची लागवड केली. राष्ट्रीय महामार्गावर त्याची विक्री सुरु झाली. या काळात ७० ते ८० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. ते एवढ्यावरच थांबले नाही. आपल्या शेतातील आंब्याची योग्य देखरेख केली. उन्हाळ्यात आंब्याचे भरघोस उत्पन्न आले. त्यातूनही ८० हजाराचा नफा झाला. उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी चालकाच्या उद्यमशीलतेचे कौतूक केले.राष्ट्रीय महामार्गावरून प्रवासी करत असताना भाजीपाला खरेदीच्या निमित्ताने चामलाटे यांचा परिचय झाला. कोणत्या वेळी कोणती पिके घ्यायची व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर मार्गदर्शन करण्यात आले. वारंवार भेटी होत गेल्या. आधुनिक शेतीची कास धरली तर शेतकऱ्यांची प्रगती आजही निश्चितच होऊ शकते हे धनीवंत चामलाटे यांच्या उदाहरणावरून दिसून येते. शेतकºयांनी आदर्श घेण्याची गरज आहे.-होमराज धांडे, मंडळ कृषी अधिकारी पहेलानिवृत्तीनंतर पूर्ण वेळ शेती करणारभंडारा आगारात असलेले धनवंत चामलाटे यांच्या निवृत्तीला आता दीड वर्ष बाकी आहे. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ शेती करण्याचा मनोदय त्यांनी केला आहे. कोरोनाने जगावर संकट आले असले तरी एका चालकाला मात्र कोरोनाने शेती व्यवसायात आणून अर्थार्जनाचा नवा मार्ग दाखविला. लॉकडाऊनने आपल्याला चांगलेच शिकविले. शेतीसाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी होमराज धांडे यांनी मार्गदर्शन केले. आता त्यांनी पाच एकर क्षेत्रात धानाची लागवड केली आहे. भाजीपाला व इतर शेतीपिकातून उत्पन्न चांगले मिळू शकते हे आपल्या अनुभवातून कळले. एसटीची नोकरी करताना शेती करणे शक्य नव्हते. लॉकडाऊन झाले नसते तर निवृत्तीनंतर घरी बसून राहलो नसतो. आता शेतीत पूर्णवेळ राबणार असल्याचे चामलाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती