शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

स्टेअरिंगवरील हात स्थिरावले शेतीकामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

धनवंत चामलाटे रा.पलाडी असे या चालकाचे नाव आहे. ते एसटी महामंडळात नियमित बसचालक म्हणून कार्यरत होते. सुमारे २५ वर्ष निष्णात हातांनी शेकडो प्रवाशांना त्यांनी आपल्या गावापर्यंत पोहचविले होते. मात्र कोरोनाचे संकट आले. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जगण्यासाठी एकच पर्याय उरला. तो म्हणजे शेती. आपल्या वडीलोपार्जीत शेतीत भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन केले.

ठळक मुद्देबसचालकाची कहाणी, कोरोनाने बदलले जीवनाचे अर्थकारण

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाचा परिणाम जाणवायला लागला आहे. अनेकांचा रोजी रोटीचा व्यवसायही बंद झाला. नोकरीवर असणाऱ्यांना घरी पाठविण्यात आले. जीवन जगण्यासाठी व्यवसाय बदलून संघर्ष सुरु झाला. असाच संघर्ष एसटी महामंडळातील चालकाच्या वाट्याला आला. महामंडळाने सक्तीच्या रजेवर पाठविले. मात्र त्याने स्वस्थ न बसता शेतीत वेळ घालविणे सुरु केले. भाजीपाला उत्पादनातून आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न चालविला. निष्णातपणे एसटीबस ते स्टेअरिंग सांभाळणारे हात आता शेतीव्यवसायात स्थिरावले आहेत.धनवंत चामलाटे रा.पलाडी असे या चालकाचे नाव आहे. ते एसटी महामंडळात नियमित बसचालक म्हणून कार्यरत होते. सुमारे २५ वर्ष निष्णात हातांनी शेकडो प्रवाशांना त्यांनी आपल्या गावापर्यंत पोहचविले होते. मात्र कोरोनाचे संकट आले. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जगण्यासाठी एकच पर्याय उरला. तो म्हणजे शेती. आपल्या वडीलोपार्जीत शेतीत भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन केले. पाऊण एकरात भाजीपाला पिकाची लागवड केली. राष्ट्रीय महामार्गावर त्याची विक्री सुरु झाली. या काळात ७० ते ८० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. ते एवढ्यावरच थांबले नाही. आपल्या शेतातील आंब्याची योग्य देखरेख केली. उन्हाळ्यात आंब्याचे भरघोस उत्पन्न आले. त्यातूनही ८० हजाराचा नफा झाला. उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी चालकाच्या उद्यमशीलतेचे कौतूक केले.राष्ट्रीय महामार्गावरून प्रवासी करत असताना भाजीपाला खरेदीच्या निमित्ताने चामलाटे यांचा परिचय झाला. कोणत्या वेळी कोणती पिके घ्यायची व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर मार्गदर्शन करण्यात आले. वारंवार भेटी होत गेल्या. आधुनिक शेतीची कास धरली तर शेतकऱ्यांची प्रगती आजही निश्चितच होऊ शकते हे धनीवंत चामलाटे यांच्या उदाहरणावरून दिसून येते. शेतकºयांनी आदर्श घेण्याची गरज आहे.-होमराज धांडे, मंडळ कृषी अधिकारी पहेलानिवृत्तीनंतर पूर्ण वेळ शेती करणारभंडारा आगारात असलेले धनवंत चामलाटे यांच्या निवृत्तीला आता दीड वर्ष बाकी आहे. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ शेती करण्याचा मनोदय त्यांनी केला आहे. कोरोनाने जगावर संकट आले असले तरी एका चालकाला मात्र कोरोनाने शेती व्यवसायात आणून अर्थार्जनाचा नवा मार्ग दाखविला. लॉकडाऊनने आपल्याला चांगलेच शिकविले. शेतीसाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी होमराज धांडे यांनी मार्गदर्शन केले. आता त्यांनी पाच एकर क्षेत्रात धानाची लागवड केली आहे. भाजीपाला व इतर शेतीपिकातून उत्पन्न चांगले मिळू शकते हे आपल्या अनुभवातून कळले. एसटीची नोकरी करताना शेती करणे शक्य नव्हते. लॉकडाऊन झाले नसते तर निवृत्तीनंतर घरी बसून राहलो नसतो. आता शेतीत पूर्णवेळ राबणार असल्याचे चामलाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती