शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

तस्करी थांबविण्यासाठी ग्रामसभेचा ठराव

By admin | Updated: February 10, 2016 00:41 IST

पाचगाव रेती घाटावरुन नियमित सुरु असलेल्या अवैध रेती चोरांच्या विरोधात गावकऱ्यांनी दंड थोपटले आहे.

पाचगाव येथील प्रकार : फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी, प्रकरण रेतीच्या अवैध उत्खननाचे वरठी : पाचगाव रेती घाटावरुन नियमित सुरु असलेल्या अवैध रेती चोरांच्या विरोधात गावकऱ्यांनी दंड थोपटले आहे. यासंबंधी झालेल्या ग्रामसभेत रेती माफियांवर कारवाई करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन रेतीचे अवैध उत्खनन बंद करण्यात यावे असा ठराव पारित करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित विभागाला ठरावाची प्रत देण्यात आली आहे. आता यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दोन महिन्यापासून पाचगाव येथील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्यांना यावेळी सत्तेपासून हद्दपार व्हावे लागले. सत्तेत येण्यासाठी प्रयत्नरताच्या हाती प्रथमच सत्तेची किल्ली मिळाली. पण त्यांना ते चालवणे जमले नाही. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणाचे पडसाद त्यांच्या संबंधावर पडले आणि त्याचेच परिणाम म्हणून गावात सुरु असलेले अवैध रेती उत्खननाच्या तक्रारीवरुन दिसून येते.गावाला लागुन सुरु नदी वाहते. या नदीच्या पात्रात गावाला पिण्याचे पाणी पुरवठा योजनेचे पम्पहाऊस आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे शेत नदीपात्राला लागून असल्यामुळे नदीच्या पाण्यामुळे शेतकरी सुखावत होता. पण नियमित होणाऱ्या अवैध रेती उत्खननामुळे नदीचे पात्र धेक्यात आले आहे. पाणी पुरवठा योजनेच्या पम्पहाऊस जवळची रेती उपसल्यामुळे पम्पहाऊस धोकादायक स्थितीत आहे. उत्खननामुळे नदीच्या पात्रातील रेतीचे प्रमाण कमी झाले. यामुळे नदीत साठवून असणाऱ्या पाण्याची पातळी कमी झाली. नदीच्या काठावर बसलेल्या गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अनेक दिवसापासून या घाटचे लिलाव झाले नाही. पण रेतीचे उत्खनन नियमित सुरु आहे. गावातून दररोज शेकडो वाहनाने रेती चोरी सर्रास सुरु आहे. यामुळे गावअंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. दिवसभर रात्र बेभान धावणाऱ्या वाहनामुळे गावकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. बेभान धावणाऱ्या रेतीच्या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यांच्या कर्कश आवाजामुळे जिवन जगने कठीण झाले आहे. रेती चोरावर आळा न घातल्यास भविष्यात वाईट परिणाम भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यासंदर्भात संतुलाल गजभिये यांनी ग्राम सभेत रेती चोरावर कारवाईचा मुद्दा उचलून धरला व त्यांच्या मुद्याला श्रीराम भिवगडे यांनी अनुमोदन दिले. यावेळी सभेला उपस्थित ग्रामस्थांनी पाचगाव रेती घाटावरुन सुरु असलेल्या रेती चोरांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन कडक शासन होण्याचा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. (वार्ताहर)