शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

संततधार पावसामुळे लाखांदूर नगरात पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST

हवामान खात्याने बुधवार व गुरुवारी संततधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. बुधवारी सायंकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. रात्रीच्यासुमारास उसंत घेतल्यानंतर गुरुवारी ...

हवामान खात्याने बुधवार व गुरुवारी संततधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. बुधवारी सायंकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. रात्रीच्यासुमारास उसंत घेतल्यानंतर गुरुवारी पहाटेपासूनच दुपारी १ पर्यंत संततधार पाऊस कोसळला. या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामातील धान रोवणीच्या कामात व्यस्त झाला असून, कोरडे पडलेली नदी, नाले आता भरले असल्याने ग्रामीण भागातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. मात्र लाखांदूर येथील तीन प्रभागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एका माजी नगरसेविकेचा समावेश आहे. बाबू शेख, सुखराम टेंभुरकर, विठ्ठल मेश्राम, कुंदा पुरामे, रामदास कापगते, लालाजी मिसार यांच्या घरात दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे दिसून आले.

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डाॅ. सौरभ कावळे यांनी सकाळी १० च्यासुमारास पावसातच कर्मचाऱ्यांसह या प्रभागांची पाहणी केली व येथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी असे निदर्शनास आले की, साकोली-वडसा महामार्गाची उंची वाढल्याने व माजी नगरसेविका वनिता लालाजी मिसार यांच्या घरामागील मोठी गटार बुजली आहे. त्यामुळे घरांमध्ये पाणी घुसल्याचे सांगण्यात आले. यासह लाखांदूर नगरात असलेल्या गटारी या ग्रामपंचायत काळातील असल्याने छोट्या आहेत. तसेच रस्त्यांची उंची वाढल्याने गटारांची उंची कमी होत चालली आहे.

चार महिन्यांंपूर्वीच लाखांदूर नगरपंचायतीचा कार्यकाळ संपला असून, लाॅकडाऊन काळामुळे निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे नगरपंचायतीचा संपूर्ण कारभार मुख्याधिकारी डाॅ. सौरभ कावळे पाहत आहेत. एकीकडे नगरपंचायत प्रशासन करोडो रुपयांची विकासकामे केली असल्याचा कांगावा करीत असताना, पूरपरिस्थिती निर्माण झाली कशी?, केलेला विकास कुठे दडला, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षीचा हा पहिलाच मोठा पाऊस असताना दोन प्रभागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर जर मोठा पाऊस पडल्यास काय होणार, हादेखील चिंतेचा विषय ठरला आहे.

प्रतिक्रिया :

१. "आमच्या संपूर्ण प्रभागातील पाणी गटारीच्या माध्यमातून वाहून जाण्याचा मोठा नाला एका महिलेने उन्हाळ्यामध्ये बुजविला असल्यामुळे पहिल्यांदा या वाॅर्डात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या नाल्याचा उपसा केल्यास अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची मला खात्री आहे."

- वनिता लालाजी मिसार, माजी नगरसेविका

२. "नगरपंचायतीवर पाच वर्षे भाजपची एकहाती सत्ता होती. आम्ही पाच वर्षे सत्तारूढ पक्षाला नगरातील १७ प्रभागांतील विविध समस्या मांडल्या होत्या. मात्र सत्तारूढ़ पदाधिकाऱ्यांनी आमचे ऐकले नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उद्धभवली आहे."

- रामचंद्र राऊत, माजी गटनेता

३. "संपूर्ण लाखांदूर नगरात हे दोन प्रभाग खूपच खाली असून, घरे ही नाल्यालगत आहेत. जेव्हा जेव्हा संततधार किंवा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा पाणी बाहेर निघण्याचा मार्ग नसल्याचे अशी परिस्थिती उद्भवते. अशी परिस्थिती येऊ नये यासाठी आम्ही पाच वर्षे परिश्रम घेतले आहेत. ज्या ठिकाणाहून पूर्ण पाणी निघू शकते, तिथे पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवणार नाही."

- विनोद ठाकरे, मा. गटनेता

080721\img-20210708-wa0064.jpg

राखेची वाहतूक होताना अशी उडते धूळ