शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे लाखांदूर नगरात पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST

हवामान खात्याने बुधवार व गुरुवारी संततधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. बुधवारी सायंकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. रात्रीच्यासुमारास उसंत घेतल्यानंतर गुरुवारी ...

हवामान खात्याने बुधवार व गुरुवारी संततधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. बुधवारी सायंकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. रात्रीच्यासुमारास उसंत घेतल्यानंतर गुरुवारी पहाटेपासूनच दुपारी १ पर्यंत संततधार पाऊस कोसळला. या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामातील धान रोवणीच्या कामात व्यस्त झाला असून, कोरडे पडलेली नदी, नाले आता भरले असल्याने ग्रामीण भागातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. मात्र लाखांदूर येथील तीन प्रभागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एका माजी नगरसेविकेचा समावेश आहे. बाबू शेख, सुखराम टेंभुरकर, विठ्ठल मेश्राम, कुंदा पुरामे, रामदास कापगते, लालाजी मिसार यांच्या घरात दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे दिसून आले.

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डाॅ. सौरभ कावळे यांनी सकाळी १० च्यासुमारास पावसातच कर्मचाऱ्यांसह या प्रभागांची पाहणी केली व येथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी असे निदर्शनास आले की, साकोली-वडसा महामार्गाची उंची वाढल्याने व माजी नगरसेविका वनिता लालाजी मिसार यांच्या घरामागील मोठी गटार बुजली आहे. त्यामुळे घरांमध्ये पाणी घुसल्याचे सांगण्यात आले. यासह लाखांदूर नगरात असलेल्या गटारी या ग्रामपंचायत काळातील असल्याने छोट्या आहेत. तसेच रस्त्यांची उंची वाढल्याने गटारांची उंची कमी होत चालली आहे.

चार महिन्यांंपूर्वीच लाखांदूर नगरपंचायतीचा कार्यकाळ संपला असून, लाॅकडाऊन काळामुळे निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे नगरपंचायतीचा संपूर्ण कारभार मुख्याधिकारी डाॅ. सौरभ कावळे पाहत आहेत. एकीकडे नगरपंचायत प्रशासन करोडो रुपयांची विकासकामे केली असल्याचा कांगावा करीत असताना, पूरपरिस्थिती निर्माण झाली कशी?, केलेला विकास कुठे दडला, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षीचा हा पहिलाच मोठा पाऊस असताना दोन प्रभागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर जर मोठा पाऊस पडल्यास काय होणार, हादेखील चिंतेचा विषय ठरला आहे.

प्रतिक्रिया :

१. "आमच्या संपूर्ण प्रभागातील पाणी गटारीच्या माध्यमातून वाहून जाण्याचा मोठा नाला एका महिलेने उन्हाळ्यामध्ये बुजविला असल्यामुळे पहिल्यांदा या वाॅर्डात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या नाल्याचा उपसा केल्यास अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची मला खात्री आहे."

- वनिता लालाजी मिसार, माजी नगरसेविका

२. "नगरपंचायतीवर पाच वर्षे भाजपची एकहाती सत्ता होती. आम्ही पाच वर्षे सत्तारूढ पक्षाला नगरातील १७ प्रभागांतील विविध समस्या मांडल्या होत्या. मात्र सत्तारूढ़ पदाधिकाऱ्यांनी आमचे ऐकले नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उद्धभवली आहे."

- रामचंद्र राऊत, माजी गटनेता

३. "संपूर्ण लाखांदूर नगरात हे दोन प्रभाग खूपच खाली असून, घरे ही नाल्यालगत आहेत. जेव्हा जेव्हा संततधार किंवा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा पाणी बाहेर निघण्याचा मार्ग नसल्याचे अशी परिस्थिती उद्भवते. अशी परिस्थिती येऊ नये यासाठी आम्ही पाच वर्षे परिश्रम घेतले आहेत. ज्या ठिकाणाहून पूर्ण पाणी निघू शकते, तिथे पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवणार नाही."

- विनोद ठाकरे, मा. गटनेता

080721\img-20210708-wa0064.jpg

राखेची वाहतूक होताना अशी उडते धूळ