शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

संततधार पावसामुळे लाखांदूर नगरात पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST

हवामान खात्याने बुधवार व गुरुवारी संततधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. बुधवारी सायंकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. रात्रीच्यासुमारास उसंत घेतल्यानंतर गुरुवारी ...

हवामान खात्याने बुधवार व गुरुवारी संततधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. बुधवारी सायंकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. रात्रीच्यासुमारास उसंत घेतल्यानंतर गुरुवारी पहाटेपासूनच दुपारी १ पर्यंत संततधार पाऊस कोसळला. या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामातील धान रोवणीच्या कामात व्यस्त झाला असून, कोरडे पडलेली नदी, नाले आता भरले असल्याने ग्रामीण भागातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. मात्र लाखांदूर येथील तीन प्रभागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एका माजी नगरसेविकेचा समावेश आहे. बाबू शेख, सुखराम टेंभुरकर, विठ्ठल मेश्राम, कुंदा पुरामे, रामदास कापगते, लालाजी मिसार यांच्या घरात दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे दिसून आले.

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डाॅ. सौरभ कावळे यांनी सकाळी १० च्यासुमारास पावसातच कर्मचाऱ्यांसह या प्रभागांची पाहणी केली व येथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी असे निदर्शनास आले की, साकोली-वडसा महामार्गाची उंची वाढल्याने व माजी नगरसेविका वनिता लालाजी मिसार यांच्या घरामागील मोठी गटार बुजली आहे. त्यामुळे घरांमध्ये पाणी घुसल्याचे सांगण्यात आले. यासह लाखांदूर नगरात असलेल्या गटारी या ग्रामपंचायत काळातील असल्याने छोट्या आहेत. तसेच रस्त्यांची उंची वाढल्याने गटारांची उंची कमी होत चालली आहे.

चार महिन्यांंपूर्वीच लाखांदूर नगरपंचायतीचा कार्यकाळ संपला असून, लाॅकडाऊन काळामुळे निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे नगरपंचायतीचा संपूर्ण कारभार मुख्याधिकारी डाॅ. सौरभ कावळे पाहत आहेत. एकीकडे नगरपंचायत प्रशासन करोडो रुपयांची विकासकामे केली असल्याचा कांगावा करीत असताना, पूरपरिस्थिती निर्माण झाली कशी?, केलेला विकास कुठे दडला, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षीचा हा पहिलाच मोठा पाऊस असताना दोन प्रभागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर जर मोठा पाऊस पडल्यास काय होणार, हादेखील चिंतेचा विषय ठरला आहे.

प्रतिक्रिया :

१. "आमच्या संपूर्ण प्रभागातील पाणी गटारीच्या माध्यमातून वाहून जाण्याचा मोठा नाला एका महिलेने उन्हाळ्यामध्ये बुजविला असल्यामुळे पहिल्यांदा या वाॅर्डात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या नाल्याचा उपसा केल्यास अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची मला खात्री आहे."

- वनिता लालाजी मिसार, माजी नगरसेविका

२. "नगरपंचायतीवर पाच वर्षे भाजपची एकहाती सत्ता होती. आम्ही पाच वर्षे सत्तारूढ पक्षाला नगरातील १७ प्रभागांतील विविध समस्या मांडल्या होत्या. मात्र सत्तारूढ़ पदाधिकाऱ्यांनी आमचे ऐकले नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उद्धभवली आहे."

- रामचंद्र राऊत, माजी गटनेता

३. "संपूर्ण लाखांदूर नगरात हे दोन प्रभाग खूपच खाली असून, घरे ही नाल्यालगत आहेत. जेव्हा जेव्हा संततधार किंवा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा पाणी बाहेर निघण्याचा मार्ग नसल्याचे अशी परिस्थिती उद्भवते. अशी परिस्थिती येऊ नये यासाठी आम्ही पाच वर्षे परिश्रम घेतले आहेत. ज्या ठिकाणाहून पूर्ण पाणी निघू शकते, तिथे पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवणार नाही."

- विनोद ठाकरे, मा. गटनेता

080721\img-20210708-wa0064.jpg

राखेची वाहतूक होताना अशी उडते धूळ