शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

धान पट्ट्यातील भंडारा जिल्ह्याचा रबी पीक विम्यात यंदा पहिल्यांदाच समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 5:00 AM

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. परंतु रबी हंगामात गहू, हरभरा आणि लाखोळीची लागवड केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु यंदा त्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु आतापर्यंत खरीप हंगामातील विमा कंपन्यांचा अनुभव बघता शेतकरी फारसे उत्सूक दिसत नाही.

ठळक मुद्दे६३ शेतकऱ्यांनी काढला विमा : खरीपातील अनुभवाने शेतकऱ्यांची पाठ

  संताेष जाधवर    लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्याचा यंदा पहिल्यांदाच रबी पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात विमा काढला जातो. यंदाच्या खरीपात एक लाख ८३ हजार ४०१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र मोठे नुकसान होवूनही अत्यल्प शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ झाला. खरीपाचा अनुभव गाठीशी असल्याने रबी पीक विमा काढण्यास शेतकरी अनुस्तुक दिसत आहे. पीक विमा भरण्याची अंतिम तिथी तीन दिवसावर असताना केवळ ६३ शेतकऱ्यांनी रबी पीक विमा काढला आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. परंतु रबी हंगामात गहू, हरभरा आणि लाखोळीची लागवड केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु यंदा त्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु आतापर्यंत खरीप हंगामातील विमा कंपन्यांचा अनुभव बघता शेतकरी फारसे उत्सूक दिसत नाही. पदरमोड करून विमा हप्ता भरता तेवढेही पैसे परत मिळत नसतील तर विमा काढायचा तरी कशाला, असा सवाल केला जातो. पीक विम्याकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.

खरीप नुकसानीचे अनुदानभंडारा जिलह्यात अतिवृष्टी आणि महापुराने धान पिकासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ८५ हजार ६५४ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. मात्र खरीप हंगामात अतिवृष्टीत आणि महापूरात २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ४०१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे  शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

विमा काढणार नाहीखरीप हंगामात मी धान पिकाचा विमा उतरविला होता. अतिवृष्टी आणि त्यानंतर तुडतुडा पिकाने प्रचंड नुकसान झाले. मात्र विमा कंपनीकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. दरवर्षी खरीप पीक विमा भरतो. मात्र मदत मिळत नसल्याने रबी पिकांचा पीक विमा उतरविणार नाही. तसेही रबीत नुकसान कमी होते. - सुरेश गिरेपुंजे, खरबी नाका.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा