शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

हरविलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 6:00 AM

मोबाईल हरविणे किंवा चोरीस जाणे ही दैनंदिन बाब झाली आहे. अनेकांचे महागडे मोबाईल चोरीस जातात किंवा कुठेतरी हरविले जातात. परंतु एकदा हरविलेला मोबाईल परत मिळत नसल्याने अनेक जण तक्रारही करीत नाही. मात्र हरविलेला मोबाईलही सापडू शकतो, हे भंडारा सायबर पोलीस ठाण्याने सिद्ध केले आहे. जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल हरविल्याच्या तक्रारींचा या ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला.

ठळक मुद्देसायबर पोलिसांची कामगिरी : आयएमईआय क्रमांकावरून शोधले ५० मोबाईल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकदा मोबाईल हरविला किंवा चोरीस गेला तर तो परत मिळण्याची आशाच नसते. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्त सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दोन नव्हे तब्बल ५० मोबाईलचा शोध घेवून मूळ मालकास परत केले. हरविलेला आपला मोबाईल परत मिळत असल्याचे पाहून प्रत्येकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.मोबाईल हरविणे किंवा चोरीस जाणे ही दैनंदिन बाब झाली आहे. अनेकांचे महागडे मोबाईल चोरीस जातात किंवा कुठेतरी हरविले जातात. परंतु एकदा हरविलेला मोबाईल परत मिळत नसल्याने अनेक जण तक्रारही करीत नाही. मात्र हरविलेला मोबाईलही सापडू शकतो, हे भंडारा सायबर पोलीस ठाण्याने सिद्ध केले आहे. जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल हरविल्याच्या तक्रारींचा या ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. आयएमईआय क्रमांकाला ट्रेसिंग करून मोबाईल शोधण्यात आले.एक दोन नव्हे तब्बल ५० मोबाईल सायबर पोलिसांनी शोधून काढले. त्यानंतर त्या मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या उपस्थितीत एका छोटेखानी समारंभात मूळ मालकाला त्यांचा मोबाईल परत करण्यात आला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण पवार, दिनेंद्र आंबेडारे, गौतम राऊत, स्रेहल गजभिये, राजेंद्र कापगते, सुमेध रामटेके, निलेश फाये, निखिल रोडगे, उमेश्वरी नाहोकर आदी उपस्थित होते.हरविलेल्या मोबाईलची तक्रार आवश्यकमोबाईल चोरीस गेल्यास किंवा हरविल्यास त्याची तक्रार करणे आवश्यक आहे. अन्यथा या मोबाईलचा गैरवापर होवू शकतो. तक्रार नसल्यास मूळ मालकावरच गुन्हे दाखल होवू शकतात. मोबाईल हरविल्यास सर्वप्रथम पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे एलसीबीचे रवींद्र मानकर सांगितले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस