शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीमुळे शेतकरी संकटात

By admin | Updated: November 4, 2014 22:36 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज चुकविण्यात कूंटुबाचे पालन पोषण करण्यात मोठी दमछाक होत आहे.

पालोरा (चौ): निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज चुकविण्यात कूंटुबाचे पालन पोषण करण्यात मोठी दमछाक होत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाचा लहरीपणामुळे रडावे लागते. दरवर्षी तारेवरची कसरत करू न शेतकरी शेतातून पिक काढण्याच्या प्रयत्न करीत आहे. एकीकडे भारनियमन, जंगली जनावराचा हौदोस, पिकाला लागणारे विविध रोग रात्र दिवस एक करू न शेतकरी पिक काढण्याच्या प्रयत्नात असतो मात्र अखेरच्या क्षणी शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही. दुसरीकडे प्रशासकीय सोसायटी, पतसंख्या, बॅक कर्ज भरण्याचा तगाता लावत आहे. आता शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय काहीही पर्याय दिसत नाही हे बोलके चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही.भंडारा जिल्हा हा धान पिकासाठी प्रसिध्द आहे. यात पवनी तालुका हा नंबर एकवर आहे. या तालुक्यात अनेक शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी यावर्षी सुरू वातीला पऱ्हे जगवून रोवणी केली. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती आहे. त्यांचे पुर्वीपासूनच पाण्याअभावी पऱ्हे गेले. दुसऱ्यांदा पऱ्हे टाकण्यात आले. तेही पाण्याविना वारले होते. कसे तरी पऱ्हे जगवून रोवणी केली. थोडाफार पाणी येत असल्यामुळे महागडी रोजी असतांनी सुद्धा शेतकऱ्यांनी आशा न सोडता प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेरच्या पाण्याने जोरदार हजेरी लावली लोकांनी महागडे खत मारले. मात्र शेवटी एका पाण्यासाठी शेकडो हेक्टर शेतातील धान पिक मरळ झाले. पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे. धानाचा २००० रू. भाव मिळावा म्हणून अनेक पुढाऱ्यापासून शेतकरी रस्त्यावर आंदोलने केलीत होती. प्रशासनाच्या हुकूमशाही पुढे कुणाचेही काहीही चालले नाही. आता अच्छे दिन येणार म्हणून शेतकऱ्यांपासून तर सामान्य जनता आनंदीत होती. यावर्षी शेतकऱ्यांना वरुणराजाने दगा दिल्याने परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे. महागडे खत, औषधी, मजूरी सर्व खर्च जोडता प्रती एकराला १५ ते २० हजार रुपयाचा खर्च आला आहे. उत्पन्न मात्र दोन हजाराचे झाले नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न पडत आहे. प्रशासकीय कर्मचारी पाहणी करीत नाही. आनेवारीची आकडेवारी भरघोस दाखविली जात आहे. परिस्थिती मात्र उलट आहे. आता या भागातीलच मुख्यमंत्री झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना बोनस, कर्जमाफी मिळणार म्हणून अशी आशा आहे. संबधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊ न धान पिकाला २००० रु. भाव द्यावा, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, अशी मागणी पवनी तालुक्यातील आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केली आहे.आहे.(वार्ताहर)