शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५२ रेतीघाटांचा लिलावाचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:33 IST

तुमसर : बावनथडी वैनगंगा नदी पात्र रीतीने समृद्ध आहे मागील दोन वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव प्रक्रिया रखडली होती परंतु जिल्ह्यातील ...

तुमसर : बावनथडी वैनगंगा नदी पात्र रीतीने समृद्ध आहे मागील दोन वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव प्रक्रिया रखडली होती परंतु जिल्ह्यातील ५२ रेती घाटांची लिलाव प्रक्रियेला शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. तुमसर तालुक्यातील सात ते आठ रेती घा टांचा त्यात समावेश असल्याची माहिती आहे.

बावनथडी व वैनगंगा नदी रेती घा टा करिता प्रसिद्ध आहे मागील दोन वर्षांपासून येथील लिलाव प्रक्रिया रखडली होती. पर्यावरणाच्या येथे हित लक्षात घेण्यात आले होते. शासनाने यावर बंदी आणली होती. पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतीला ग्रामीण व शहरी भागात मोठी मागणी आहे अनेक बांधकामे यामुळे रखडली होती विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून शासनाने नियमानुसार रेती घाट लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. खनिकर्म विभाग महसूल प्रशासन व पर्यावरण यांच्या अंतिम निर्णयानुसार रेती घाट लिलावाला हिरवी झेंडी देण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणात रेती चोरी: रेती घाटांचे लिलाव नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करण्यात आली मागील दोन वर्षात नदीपात्र पोखरून काढण्यात आले. यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले होते बावांथाडी वैनगंगा नदीच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत त्यामुळे मध्यप्रदेशातील रेती तस्करांनी महाराष्ट्राच्या सिमेतील मोठ्याप्रमाणात रेतीचे उत्खनन केले आहे यामुळे राज्याचे महसूल मोठ्या प्रमाणात बुडले. आजही रेतीची चोरी सुरूच आहे शासनाने रेती उत्खननावर बंदी आणली होती परंतु रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेतीचे नियमबाह्य उत्खनन केले.

बॉक्स

रेती चोरीला बसणार आळा

रेतीघाटांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे रेती चोरी ला आळा बसेल व शासनाला महसूल मिळेल सध्या बावनथडी व वैनगंगा नदी पात्रात मुबलक रेतीसाठा उपलब्ध आहे. येथील पांढरेशुभ्र दाणेदार रेती दर्जेदार आहे या रे तिला शहरात बांधकामाकरिता प्रथम पसंती देण्यात येते त्यामुळे तिला मोठी मागणी आहे दररोज शेकडो ट्रक रेती शहराकडे जाते. नदीपात्रातील रेती उत्खनन केल्याने अनेक गावांना धोका वाढला आहे.त्यामुळे लिलाव झालेल्या नदीपात्रातून नियमानुसार रेतीचे उत्खनन करण्याची गरज आहे याकरिता महसूल विभागाची पथके तैनात करण्याची गरज आहे. ज्यामुळे नदीचे अस्तित्व कायम राहील.