शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्ह्यातील ५२ रेतीघाटांचा लिलावाचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:33 IST

तुमसर : बावनथडी वैनगंगा नदी पात्र रीतीने समृद्ध आहे मागील दोन वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव प्रक्रिया रखडली होती परंतु जिल्ह्यातील ...

तुमसर : बावनथडी वैनगंगा नदी पात्र रीतीने समृद्ध आहे मागील दोन वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव प्रक्रिया रखडली होती परंतु जिल्ह्यातील ५२ रेती घाटांची लिलाव प्रक्रियेला शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. तुमसर तालुक्यातील सात ते आठ रेती घा टांचा त्यात समावेश असल्याची माहिती आहे.

बावनथडी व वैनगंगा नदी रेती घा टा करिता प्रसिद्ध आहे मागील दोन वर्षांपासून येथील लिलाव प्रक्रिया रखडली होती. पर्यावरणाच्या येथे हित लक्षात घेण्यात आले होते. शासनाने यावर बंदी आणली होती. पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतीला ग्रामीण व शहरी भागात मोठी मागणी आहे अनेक बांधकामे यामुळे रखडली होती विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून शासनाने नियमानुसार रेती घाट लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. खनिकर्म विभाग महसूल प्रशासन व पर्यावरण यांच्या अंतिम निर्णयानुसार रेती घाट लिलावाला हिरवी झेंडी देण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणात रेती चोरी: रेती घाटांचे लिलाव नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करण्यात आली मागील दोन वर्षात नदीपात्र पोखरून काढण्यात आले. यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले होते बावांथाडी वैनगंगा नदीच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत त्यामुळे मध्यप्रदेशातील रेती तस्करांनी महाराष्ट्राच्या सिमेतील मोठ्याप्रमाणात रेतीचे उत्खनन केले आहे यामुळे राज्याचे महसूल मोठ्या प्रमाणात बुडले. आजही रेतीची चोरी सुरूच आहे शासनाने रेती उत्खननावर बंदी आणली होती परंतु रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेतीचे नियमबाह्य उत्खनन केले.

बॉक्स

रेती चोरीला बसणार आळा

रेतीघाटांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे रेती चोरी ला आळा बसेल व शासनाला महसूल मिळेल सध्या बावनथडी व वैनगंगा नदी पात्रात मुबलक रेतीसाठा उपलब्ध आहे. येथील पांढरेशुभ्र दाणेदार रेती दर्जेदार आहे या रे तिला शहरात बांधकामाकरिता प्रथम पसंती देण्यात येते त्यामुळे तिला मोठी मागणी आहे दररोज शेकडो ट्रक रेती शहराकडे जाते. नदीपात्रातील रेती उत्खनन केल्याने अनेक गावांना धोका वाढला आहे.त्यामुळे लिलाव झालेल्या नदीपात्रातून नियमानुसार रेतीचे उत्खनन करण्याची गरज आहे याकरिता महसूल विभागाची पथके तैनात करण्याची गरज आहे. ज्यामुळे नदीचे अस्तित्व कायम राहील.