शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

अपघातमुक्त सेवेची जबाबदारी चालकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 6:00 AM

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ ११ ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षा अभियान राबवित आहे. गत ७१ वर्षांपासून सुरक्षित सेवेच्या माध्यमातून सामान्य प्रवाशांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. या विश्वासाला तडे जाऊ नये यासाठी प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन तपासणी वाहनांची तांत्रिक दुरुस्ती आदी बाबींवर भर दिला जाणार आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ११ ते २५ जानेवारीपर्यंत एसटी महामंडळाचे सुरक्षा अभियान

सूरज गोंडाणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवाकेश्वर : महाराष्ट्राची लोकवाहिनी एसटी बस आनंददायी आणि सुखकर प्रवासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र काही घटनांमुळे एसटीच्या नावलौकीकाला तडा जातो. आता एसटी सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने एसटीच्या अपघातविरहित सेवेवर मंथन सुरु असून अपघातमुक्त सेवेची जबाबदारी एसटी बस चालकांवर येऊन पडते. एसटीच्या लोकप्रियतेत वाढ करण्यासाठी चालक आणि वाहकच मुख्य भूमिका बजावू शकतात.राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ ११ ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षा अभियान राबवित आहे. गत ७१ वर्षांपासून सुरक्षित सेवेच्या माध्यमातून सामान्य प्रवाशांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. या विश्वासाला तडे जाऊ नये यासाठी प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन तपासणी वाहनांची तांत्रिक दुरुस्ती आदी बाबींवर भर दिला जाणार आहे.अलिकडे प्रवाशांच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत. चालक वाहकांच्या असभ्यपणाविषयी अनेक प्रकरणे दिसून येतात. कधी एसटीत वादाचे प्रसंगही घडतात. एसटीमहामंडळाच्या सेवेतील त्रृटी हा विषय ग्राहक कायद्यांतर्गत मोडतो. त्यामुळे त्याबाबत सामान्य प्रवाशांना माहित असणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहकाने नियोजित कामगिरी असताना त्यामागचे टप्पे व भाडेपत्रक जवळ ठेवणे गरजेचे आहे. बस स्वच्छ असणे आवश्यक आहे. तक्रार पुस्तिकाही बसमध्ये असण्याची गरज आहे.वृद्ध प्रवासी, गरोदर स्त्री, दिव्यांग व लहान मुलांना बसमध्ये चढण्या उतरण्यास मदत करणे अपेक्षित आहे. तसेच वाहकाने आपल्या शर्टवर नेमप्लेट लावणे गरजेचे आहे. परंतु या सर्व बाबींकडे कायम दुर्लक्ष होते. बसमध्ये धुम्रपान करणे आणि वाद्य वाजविण्यास सक्त मनाई आहे. परंतु मोबाईलवर अनेकदा गाणे वाजविले जातात. त्याचा सहप्रवाशांना त्रास होतो. अनेकदा वाहक सीव्हील ड्रेसवरच असतात. त्यामुळे तिकीट कुणाकडे मागावी असाही प्रश्न निर्माण होतो. या सर्व बाबींवर या सुरक्षा अभियानात मंथन होण्याची गरज आहे.प्रथमोपचार पेटी गायबएसटी बसमध्ये प्रथमोपचार पेटी आवश्यक आहे. अपघात झाल्यास तातडीने प्रथमोपचार करण्यासाठी ही पेटी लावली जाते. परंतु बहुतांश बसमध्ये आता प्रथमोपचार पेटी गायब झाल्याचे दिसून येते. यासोबतच बसमधील अग्नीप्रतिबंधक सिलिंडरही दिसेनासे झाले आहे. एखाद्यावेळेस अप्रिय घटना घडल्यास मोठा अनर्थ होवू शकतो. परंतु एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रथोपचार पेट्या व अग्निप्रतिबंधक यंत्रनेकडे लक्ष दिसत नाही. चालक आणि वाहक मात्र याबाबत बोलत नाही. महामंडळाने सुरक्षा अभियानांतर्गत या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.

टॅग्स :state transportएसटी