शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

तलावातून मोठी नाली खोदल्याने पाण्याचा होतोय अपव्यव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST

मोहाडी : येथून जवळच असलेल्या परसवाडा येथे पाटबंधारे विभागाचा १७ हेक्टर जागेत तलाव आहे. हा तलाव मोहाडी मत्स्यपालन सहकारी ...

मोहाडी : येथून जवळच असलेल्या परसवाडा येथे पाटबंधारे विभागाचा १७ हेक्टर जागेत तलाव आहे. हा तलाव मोहाडी मत्स्यपालन सहकारी संस्थेने मासेमारीसाठी लीजवर घेतलेला आहे. या संस्थेचे सभासद मासेमारी करून तलावाची देखभाल करतात. मात्र अशातच परसवाडा येथील पाटबंधारे विभागाच्या तलावात कुशारी येथील पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांनी मोठी खोल नाली खोदल्याची तक्रार मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या अध्यक्ष सचिवांनी विभागीय कार्यालय सिंचन भवन, कार्यकारी अभियंता भंडारा यांच्याकडे केली असून त्वरित कारवाईची मागणी केली आहे. नुकतेच नहर खोलीकरणाचे काम झाले. त्या कामावरील पोकलेन मशीनने पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांनी मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या सभासदांना कोणतीही विचारपूस न करता तलावाच्या मध्यभागातून गेटपर्यंत मोठी खोल नाली खोदली आहे.

या नालीमुळे तलावातील संपूर्ण पाणी कॅनॉलद्वारे वाहून जाणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तलावातील लाखो रुपयांचे मासे मृत्यू पावतील. मत्स्यपालन संस्थेचे मोठे नुकसान होईल. कुशारी पाणी वापर संस्थेचा अध्यक्ष हा नेहमीच शेतकऱ्यांकडून पैसा घेऊन त्यांना तलावातील पाणी विकतो. त्यासाठीच त्याने ही नाली खोदल्याचा आरोप मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व सचिव सखाराम मारबादे यांनी तक्रारीत केला आहे.

बॉक्स

तलावावर केले अतिक्रमण

जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या या तलावाच्या देखभाल व दुरुस्तीकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. १७ हेक्टर जागेत असलेला हा तलाव अतिक्रमणांमुळे फक्त ६, ७ एकरामध्येच उरलेला आहे. तलावाच्या तिन्ही बाजूंनी शेतकऱ्यांनी तलावात अतिक्रमण करून शेती तयार केली आहे. काहींनी तर चक्क त्या शेतीत दुमजली घरे बांधली आहेत. अतिक्रमण व तलावातील गाळामुळे तलावात पाणी साठविण्याची क्षमता दिवसेदिवस कमी कमी होत आहे. हे दुष्टचक्र असेच सुरू राहिल्यास हा तलाव नामशेष होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. पाटबंधारे विभागाने या तलावाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. परिणामी तलाव गाळाने भरला आहे. पाळींना भेगा पडल्या असून गेट नादुरुस्त राहिल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. एकंदरीत, दुर्लक्ष झाल्याने तलावांच्या सिंचन क्षमतेवर परिणाम झाला असून याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.