शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

जनजागृतीनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

By admin | Updated: February 19, 2017 00:21 IST

रामीण भागातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासन राबवित असलेल्या हागणदारीमुक्तीचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे.

हागणदारीमुक्तीचा फज्जा : अंमलबजावणी पुढाकाराची गरजसंजय साठवणे साकोलीग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासन राबवित असलेल्या हागणदारीमुक्तीचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. हागणदारीमुक्त गाव होऊन नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शासनाने 'हागणदारीमुक्त ग्रामपंचायत' योजना सुरू केलीे आहे; मात्र अनेक निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या परिसरातच घाण करणे सर्रास सुरू असल्याने हगणदरीमुक्तीचा सर्वत्र फज्जा उडाला आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गावागावातील रस्त्याच्या दोन्ही कडा घाणीने रंगलेल्या दिसत असून, हागणदारीमुक्त झालेली अनेक गावे पुन्हा हागणदारीयुक्त झाल्याने या अभियानाचा उद्देशच संपला आहे. शासनाने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याने याची चौकशी करण्याची गरज आहे.गावाबाहेर शौचास बसण्यास कायद्याने बंदी आहे; मात्र हागणदारीमुक्तीची ग्रामसभा, दवंडीच्या माध्यमातून आरोग्यास होणारे फायदे व आपले गाव स्वच्छ राखण्याकरिता योग्य उपाययोजनांच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासन स्तरावरून निधी उपलब्ध होत असल्यावरही सर्वत्र गावांच्या चारही बाजूने घाण दिसून येत आहे. या घाणीमुळे उदभवणाऱ्या अनेक आजारांचे थैमान असतानाही पंचायत समिती व जिल्हा परीषदेच्या संबंधित आरोग्य विभागाकडून गंभीर दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे ही बाब विकासास मोठी अडसर ठरत आहे. गावाबाहेर शौचास बसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शासन गाव तेथे घर व घर तेथे शौचालयसाठी अनुदान उपलब्ध करून देत असताना ही विदारक स्थिती कशी, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. दरवर्षी शासन योजना राबविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध करून देते; मात्र एवढा निधी खर्च करूनसुद्धा ही योजना प्रभावीरीत्या राबवली जात नसल्याचे दिसून येत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व ग्रामस्वच्छतेसाठी, योजना जन जागृतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे