शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

जनजागृतीनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

By admin | Updated: February 19, 2017 00:21 IST

रामीण भागातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासन राबवित असलेल्या हागणदारीमुक्तीचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे.

हागणदारीमुक्तीचा फज्जा : अंमलबजावणी पुढाकाराची गरजसंजय साठवणे साकोलीग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासन राबवित असलेल्या हागणदारीमुक्तीचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. हागणदारीमुक्त गाव होऊन नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शासनाने 'हागणदारीमुक्त ग्रामपंचायत' योजना सुरू केलीे आहे; मात्र अनेक निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या परिसरातच घाण करणे सर्रास सुरू असल्याने हगणदरीमुक्तीचा सर्वत्र फज्जा उडाला आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गावागावातील रस्त्याच्या दोन्ही कडा घाणीने रंगलेल्या दिसत असून, हागणदारीमुक्त झालेली अनेक गावे पुन्हा हागणदारीयुक्त झाल्याने या अभियानाचा उद्देशच संपला आहे. शासनाने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याने याची चौकशी करण्याची गरज आहे.गावाबाहेर शौचास बसण्यास कायद्याने बंदी आहे; मात्र हागणदारीमुक्तीची ग्रामसभा, दवंडीच्या माध्यमातून आरोग्यास होणारे फायदे व आपले गाव स्वच्छ राखण्याकरिता योग्य उपाययोजनांच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासन स्तरावरून निधी उपलब्ध होत असल्यावरही सर्वत्र गावांच्या चारही बाजूने घाण दिसून येत आहे. या घाणीमुळे उदभवणाऱ्या अनेक आजारांचे थैमान असतानाही पंचायत समिती व जिल्हा परीषदेच्या संबंधित आरोग्य विभागाकडून गंभीर दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे ही बाब विकासास मोठी अडसर ठरत आहे. गावाबाहेर शौचास बसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शासन गाव तेथे घर व घर तेथे शौचालयसाठी अनुदान उपलब्ध करून देत असताना ही विदारक स्थिती कशी, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. दरवर्षी शासन योजना राबविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध करून देते; मात्र एवढा निधी खर्च करूनसुद्धा ही योजना प्रभावीरीत्या राबवली जात नसल्याचे दिसून येत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व ग्रामस्वच्छतेसाठी, योजना जन जागृतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे