शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आणेवारीचा ब्रिटिश कायदा बदलण्याची मागणी

By admin | Updated: July 14, 2014 23:49 IST

भारत देश स्वतंत्र होऊन ६४ वर्षे झाली तरी आणेवारीचा ब्रिटिश कायदा अजूनही जशाचा तशाच सुरू आहे. हे अद्याप कुणाच्याही लक्षात न आल्यामुळे भारतातील शेतकरी अधोगतीला लागले आहेत.

पहेला : भारत देश स्वतंत्र होऊन ६४ वर्षे झाली तरी आणेवारीचा ब्रिटिश कायदा अजूनही जशाचा तशाच सुरू आहे. हे अद्याप कुणाच्याही लक्षात न आल्यामुळे भारतातील शेतकरी अधोगतीला लागले आहेत.
सोयीनुसार जवळपास अनेक कायदे बनविण्यात आले. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान करीत असलेला आणेवारीचा कायदा अद्यापही कायम आहे. त्यामुळे शासनाच्या तशा कायद्याच्या निकषानुसार निसर्गाने कितीही अवकृपा केली तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही.
इंग्रजाच्या काळात शेतीचे उत्पन्न कमी होते. त्या काळात शेती उद्योगाला श्रेष्ठ समजले जात होते. परंतु नंतर देश स्वतंत्र झाला. शेती उद्योगात नवीन क्रांती आल्यामुळे शेती उत्पन्नत कमालीची वाढ झाली. मात्र आज शेतीला कनिष्ठ तर नोकरीला श्रेष्ठ मानल्या जाते. शेती उद्योगाला ब्रिटिशांनी शेतीसाठी जाचक कायदे बनविले होते. मात्र अद्याप तेच कायदे सुरू आहेत.
ब्रिटीश काळात एका एकरात धान क्विंटल उत्पन्न झाले तर १०० पैसे आणेवारी ठरविण्यात येत होती. म्हणजेच शेतकऱ्याला भरपूर उत्पन्न झाले असे ठरवून निसर्गाने कोणतीही अवकृपा केली तरीसुद्धा या शेतकऱ्याला इंग्रजी शासनाकडून कोणतीही मदत देण्यात येत नव्हती. आणेवारीचा हा कायदा अजुनही कुणाच्या लक्षात न आल्यामुळे आणेवारीवर कुणीही आक्षेप घेत नसल्याचे दिसत आहे.
ज्यावेळी निसर्गाची अवकृपा होते तर पूर, अतिवृष्टी यामुळे उत्पन्नत कमालीची घट होते. त्यामुळे शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत असतात. त्यासाठी मोर्चे काढून आंदोलन करून निवेदन सादर करण्यात येते.
मात्र त्यावेळी शासन दरबारी हे अधिकारी ब्रिटिश काळापासून लागू असलेल्या हीच आणेवारी सादर करतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळत नाही व बरेचशे शेकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहतात. शासनाने ब्रिटिशकालीन आणेवारीचा कायदा बदलून कायदा करावा जेणे करून त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ होईल, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)