शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
2
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
3
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
5
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
6
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
7
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
8
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
9
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
10
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

सायबर हल्ल्याच्या धोक्याबाबत दिला होता इशारा

By admin | Published: May 18, 2017 12:34 AM

सध्या जगभरात गाजत असलेल्या रॅन्समवेअर या हल्ल्याबाबत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी वर्षभरापूर्वीच संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.

नाना पटोलेंनी विचारला प्रश्न : उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरल्याची हमीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या जगभरात गाजत असलेल्या रॅन्समवेअर या हल्ल्याबाबत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी वर्षभरापूर्वीच संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत दिनांक ११ मे २०१६ रोजी पटोलेयांनी सायबर हल्ल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. यात त्यांनी म्हटले होते. प्रसार माध्यमांद्वारे पुढे आलेल्या माहितीनुसार आरआरसीटीसी या भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘डेटा हॅक’ करण्यात आला. यामध्ये जवळ पास १ कोटी ग्राहकांना ‘डेटा हॅक’ करण्याची भीती त्यांनी वर्तविली होती. या संकेतस्थळावर कोट्यवधी रुपयांची देवाण घेवाण करण्यात येते. आॅनलाईन रेल्वे तिकीट काढण्यासाठी आधारकार्ड, क्रेटीड कार्ड, डेबीट कार्ड आणि नेटबँकींगची माहिती ग्राहकांकडून पुरविण्यात येते. वेबसाईट ‘हॅक’ झाल्यास ग्राहकांची महत्वपूर्ण माहिती चोरल्या जाऊ शकते याचा विविध महत्वपूर्ण सेवांवर परिणाम होवू शकतो असा प्रश्न उपस्थित पटोले यांनी उपस्थित केला होता.पटोले यांनी १८ नोव्हेंबर २०१६ रोजी लोकसभेत अतारांकीत प्रश्नाद्वारे भारतीय ब ँकींग क्षेत्रावरील सायबर हल्ल्याशी निगडीत प्रश्न उपस्थित केला होता. यात त्यांनी म्हटले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्याही मोठ्या सायबर हल्ल्याशी सामना करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने कोणत्या उपाययोजना आहेत असा प्रश्न विचारला होता. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी, देशात कोणत्याही मोठ्या सायबर हल्ल्याचा सामना करण्यासाठी सायबर संकट व्यवस्थापन दलाची स्थापना करण्यात आली आहे. बँकींग परिवेक्षणासाठी सीईआरटीआयएन च्या मदतीने शासन बँकेमधील सुरक्षेबाबत पडताळणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पटोले यांनी १२ एप्रिल २०१७ रोजी लोकसभेत तारांकीत प्रश्नाद्वारे मुद्दा उपस्थित करून भारतातील अणू उर्जा संस्थावर आतंकवादी किंवा सायबर हल्ला झाल्यास याचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना, असा प्रश्न विचारला होता. अणू उर्जा संस्थांमध्ये उत्तम दर्जाची आंतरीक व बाह्य सुरक्षा स्थापित करण्यात आल्याचे तसेच, सायबर हल्ल्याला परतवून लावण्यासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्याचे उत्तर प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दिले होते.