शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी, संपर्काचा जाच-आता बास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

मानवजातीला संकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभागही अपेक्षित धरला जात आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे अनावश्यक गर्दी टाळणे हा होय. अनेक नागरिकांकडून हा उपाय गांभीर्याने घेतला जात नाही. या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात असून गर्दी टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

ठळक मुद्देसंसर्गाची वाढते भीती : संपर्क रुग्णाचा शोध घेणे होते अवघड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मानवजातीला संकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभागही अपेक्षित धरला जात आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे अनावश्यक गर्दी टाळणे हा होय. अनेक नागरिकांकडून हा उपाय गांभीर्याने घेतला जात नाही. या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात असून गर्दी टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.कोरोना विषाणूवरचा उपचार अद्यापि उपलब्ध नसल्याने त्याचा संसर्ग न होऊ देणे, हाच त्यापासून वाचण्याचा सध्याचा उपाय आहे. त्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. सार्वजनिक समारंभ, कार्यक्रम, जाहीर सभा याबरोबरच चित्रपटगृहे, नाट्यगृहे अशा गर्दी होणाºया ठिकाणांवर काही दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार हेही बंद आहेत. आयटी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश देण्यात आले आहेत.कोरोनाबाधित व्यक्ती गर्दीत आली तर तिच्या संपर्कातून या विषाणूचा प्रसार त्वरेने होण्याची भीती असते. सार्वजनिक ठिकाणी कोरोनाग्रस्तांनी हाताळलेल्या वस्तू, त्याचे खोकणे, शिंकणे या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होतो. कोरोनाबाधितांच्या उच्छ्वासातून, शिंकण्यातून बाहेर पडणाºया द्रवात डोळ्यांना न दिसणारे कोट्यवधी विषाणू असतात. त्याचा संपर्क झाल्यास अथवा श्वसनावाटे या विषाणूंचा संसर्ग होण्याची भीती असते.जिल्हा परीषद आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे यांनी सांगितले, की एखादा सेकंदही या प्रक्रियेसाठी पुरेसा आहे. त्यानंतर काही तासांनी किंवा त्या व्यक्तीची शारीरिक क्षमता जशी असेल, त्याप्रमाणे हा विषाणू कार्यान्वित होतो. प्रतिकारशक्ती जास्त असेल, तर तो विरूनही जातो किंवा मग त्वरेने परिणाम दर्शवतो. अशा वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींनायाची लागण होऊ शकतो. त्यांच्याकडून पुन्हा आणखी काही जणांना अशा व्यक्ती शोधणे, त्यांना बरे होईपर्यंत वेगळे ठेवणे हे सगळे अशक्य होईल. त्यामुळेच गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे.जिल्हा रुग्णालयाचे निवासी अधिकारी डॉ. निखिल डोकरीमारे म्हणाले, ‘‘खोकल्याने किंवा शिंकल्याने तोंडातून उडणारा द्रवपदार्थ तीन फुटांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याच्या आतमध्ये त्याला जी जागा मिळेल त्यावर तो पडतो, जिवंत राहतो व त्यानंतर हाताच्या संसर्गातून शरीरात प्रवेश करतो. जागा मिळाली नाही तर तो विषाणू त्या द्रवाबरोबर जमिनीवर पडतो व विरून जातो. गर्दी करू नका, याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीपासून तीन फुटांच्या किंवा त्यापेक्षाही जास्त अंतरावर राहा. गर्दीमध्ये हा विषाणू अगदी सहजपणे त्याला जागा मिळेल त्याप्रमाणे प्रवास करू शकतो. अनेकांना बाधित करू शकतो. त्यामुळे गर्दी टाळणे फायद्याचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या