शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

गोसावी मठ व मंदिरांचे संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 6:00 AM

कालांतराने या मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी राहू लागले. येथे मठाची स्थापना झाली. महंत, साधू, सन्याशी असलेले दिवंगत झाले. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरीमहाराज, शंकरगिरीमहाराज यांचे येथे स्मारक बांधण्यात आले.

ठळक मुद्दे८०० वर्ष जूनी वास्तू । हेमाडपंथी वास्तूकलेतील चार मंदिरांचा समूह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न भंडारा शहरातील मेंढा परिसरात प्राचीन गिरी गोसावी यांचे अत्यंत कलात्मक व सुंदर मठ आणि मंदिर समूह आहेत. विष्णू भगवान, भगवान गणेश आणि विठ्ठल रखुमाईसह अनेक संतांच्या मूर्ती आहेत. भंडारा शहराच्या वैभवात भर पाडणारे हे वास्तूशिल्प ८०० वर्ष प्राचीन असून हेमाडपंती वास्तूशैलीने बांधलेले आहे. या मंदिर समूहाचे संवर्धक होण्याची आता गरज आहे.आद्य शंकराचार्यांनी गोसावी समाजाची स्थापना केली आणि समाजाचा विस्तार केला असे सांगितले जाते. शंकराचार्यांनी चारही दिशांना दहा शिष्य बनविले. त्यांनी मठ, मठी स्थापन केल्या. त्यापैकी भंडारा येथील मेंढा परिसरातील गिरी गोसावी समाजाचा मठ व मंदिर समूह होय. येथील वास्तू ८०० वर्ष जूनी असून हेमाडपंती वास्तूशैलीनुसार चार मंदिरांचा समूह तयार केलेला आहे.कालांतराने या मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी राहू लागले. येथे मठाची स्थापना झाली. महंत, साधू, सन्याशी असलेले दिवंगत झाले. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरीमहाराज, शंकरगिरीमहाराज यांचे येथे स्मारक बांधण्यात आले.अलोनीबाबा विषयी राजे रघुजी भोसले यांची विशेष श्रद्धा होती. ते दर्शनासाठी भंडारा येथे यायचे. सहाव्या पिढीपर्यंत येथे कुणीच महिला नव्हती. सातव्या पिढीपासून मठात स्त्रीयांचा समावेश झाला. नवव्या पिढीतील गजानन गिरी व नंतर दहाव्या पिढीतील किशोर गिरी हे सध्या मंदिराची देखभाल करीत आहेत.मंदिराच्या देखभालीसाठी २००७ साली ट्रस्ट स्थापन करण्यात आले. मंदिरात अनेक ठिकाणी अतीप्राचीन गणेशाची विविध रुपे मूर्तीच्या स्वरुपात आहेत. तसेच पशूपक्षी, राक्षसे, पुष्प व सुंदर नक्षीकाम केलेले स्मारके विलोभनीय आहेत. आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.विकास कामे रखडलीट्रस्टच्या वतीने या स्थळाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर शासनाकडून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला. संरक्षक भिंत व इतर कामासाठी शासनाकडून ७३ लाख रुपये मंजूर होऊन सुरक्षा भिंतीचे काम करण्यात आले. परंतु पुढे सौंदर्यीकरणासाठी निधी प्राप्त न झाल्याने विकास कामे रखडली आहेत.भंडारा शहराचा संपन्न वारसा सांगणाऱ्या या वास्तूची जतन होण्याची गरज आहे. ट्रस्टतर्फे प्रयत्न सुरु आहेत. परंतु हवा तसा निधी अद्यापही मिळाला नाही. या परिसराचा विकास झाल्यास हे स्थळ नावारुपाला येईल यात शंका नाही.मो.सईद शेख, अध्यक्ष ग्रीन हेरिटेज, भंडारा.

टॅग्स :Templeमंदिर