शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गोसावी मठ व मंदिरांचे संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

कालांतराने या मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी राहू लागले. येथे मठाची स्थापना झाली. महंत, साधू, सन्याशी असलेले दिवंगत झाले. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरीमहाराज, शंकरगिरीमहाराज यांचे येथे स्मारक बांधण्यात आले.

ठळक मुद्दे८०० वर्ष जूनी वास्तू । हेमाडपंथी वास्तूकलेतील चार मंदिरांचा समूह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न भंडारा शहरातील मेंढा परिसरात प्राचीन गिरी गोसावी यांचे अत्यंत कलात्मक व सुंदर मठ आणि मंदिर समूह आहेत. विष्णू भगवान, भगवान गणेश आणि विठ्ठल रखुमाईसह अनेक संतांच्या मूर्ती आहेत. भंडारा शहराच्या वैभवात भर पाडणारे हे वास्तूशिल्प ८०० वर्ष प्राचीन असून हेमाडपंती वास्तूशैलीने बांधलेले आहे. या मंदिर समूहाचे संवर्धक होण्याची आता गरज आहे.आद्य शंकराचार्यांनी गोसावी समाजाची स्थापना केली आणि समाजाचा विस्तार केला असे सांगितले जाते. शंकराचार्यांनी चारही दिशांना दहा शिष्य बनविले. त्यांनी मठ, मठी स्थापन केल्या. त्यापैकी भंडारा येथील मेंढा परिसरातील गिरी गोसावी समाजाचा मठ व मंदिर समूह होय. येथील वास्तू ८०० वर्ष जूनी असून हेमाडपंती वास्तूशैलीनुसार चार मंदिरांचा समूह तयार केलेला आहे.कालांतराने या मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी राहू लागले. येथे मठाची स्थापना झाली. महंत, साधू, सन्याशी असलेले दिवंगत झाले. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरीमहाराज, शंकरगिरीमहाराज यांचे येथे स्मारक बांधण्यात आले.अलोनीबाबा विषयी राजे रघुजी भोसले यांची विशेष श्रद्धा होती. ते दर्शनासाठी भंडारा येथे यायचे. सहाव्या पिढीपर्यंत येथे कुणीच महिला नव्हती. सातव्या पिढीपासून मठात स्त्रीयांचा समावेश झाला. नवव्या पिढीतील गजानन गिरी व नंतर दहाव्या पिढीतील किशोर गिरी हे सध्या मंदिराची देखभाल करीत आहेत.मंदिराच्या देखभालीसाठी २००७ साली ट्रस्ट स्थापन करण्यात आले. मंदिरात अनेक ठिकाणी अतीप्राचीन गणेशाची विविध रुपे मूर्तीच्या स्वरुपात आहेत. तसेच पशूपक्षी, राक्षसे, पुष्प व सुंदर नक्षीकाम केलेले स्मारके विलोभनीय आहेत. आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.विकास कामे रखडलीट्रस्टच्या वतीने या स्थळाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर शासनाकडून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला. संरक्षक भिंत व इतर कामासाठी शासनाकडून ७३ लाख रुपये मंजूर होऊन सुरक्षा भिंतीचे काम करण्यात आले. परंतु पुढे सौंदर्यीकरणासाठी निधी प्राप्त न झाल्याने विकास कामे रखडली आहेत.भंडारा शहराचा संपन्न वारसा सांगणाऱ्या या वास्तूची जतन होण्याची गरज आहे. ट्रस्टतर्फे प्रयत्न सुरु आहेत. परंतु हवा तसा निधी अद्यापही मिळाला नाही. या परिसराचा विकास झाल्यास हे स्थळ नावारुपाला येईल यात शंका नाही.मो.सईद शेख, अध्यक्ष ग्रीन हेरिटेज, भंडारा.

टॅग्स :Templeमंदिर