शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

काँग्रेस-शिवसेनेत १० जागांवरुन भांडणं, तर...; प्रकाश आंबेडकरांनी सांगितली 'अंदर की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 10:10 IST

भंडारा येथील पहिल्याच सभेत आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर थेट भाष्य केलं. 

भंडारा/मुंबई - लोकसभा निवडणूकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना भाजपाने १९५ जागांवर उमेदवारांची घोषणाही केली. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीचं जागावाटपच अद्याप झालेलं नाही. त्यात, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यावरुन जागावाटप निश्चित होत नाही. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या जागांची मागणी महाविकास आघाडीला अद्याप तरी मान्य नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच, अजूनही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येईल की नाही, यावर प्रश्नचिन्हच आहे. त्यातच, प्रकाश आंबेडकरांनी जाहीर संभांना सुरुवात केली. भंडारा येथील पहिल्याच सभेत आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर थेट भाष्य केलं. 

बहुजन सारे एक होऊया, सत्ता आपल्या हाती घेऊया... अशा बॅनरखाली भंडारा येथे बहुजन अधिकार महासभेतील जाहीर सभेतून प्रकाश आंबेडकरांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकावर हल्लाबोल केला. तसेच, महाविकास आघाडीतील वंचितच्या सहभागावरही भाष्य केलं. काँग्रेस शिवसेनेत १० जागांवरुन भांडणं सुरू आहेत. तर, काँग्रेस आणि एनसीपी यांच्यात ५ जागांवरुन भांडणं सुरू आहेत. म्हणजेच, ४८ पैकी १५ जागांवरुन महाविकास आघाडीतील पक्षांची भांडणं सुरू आहेत. पण, माध्यमांत वंचित बहुजन आघाडी बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही, हे मी सांगतो. आमच्यासाठी चर्चा कधी सुरू होईल, त्यांची भांडणं संपल्यानंतर. आता, त्यांचीच भांडणं सुरू झाली नाहीत, तर आमच्याशी चर्चा काय होणार आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाची अंदर की बात सांगितली. 

१२ ते १६ मार्च दरम्यान आचारसंहिता लागू होईल. आज ४ मार्च, किती दिवस शिल्लक राहिले आहेत. आता, यांचं भांडण मिटलं नाही तर, मग काय. मी अपेक्षा करतो की, ह्यांचं भांडण मिटेल आणि आमच्यासोबत चर्चा सुरू होईल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

आपल्यात एकच गोष्ट समसमान

हा लढा महत्त्वाचा आहे. मतदानातून हा लढा लढायचा आहे. त्यामुळेच, आम्ही एकत्र येण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत. पण, जर हे शक्य झालं नाही तर निराश व्हायचं नाही, ताकद गळल्यासारखं व्हायचं नाही. त्यांना आपण बरोबर घेत आहोत, काहींना भाजपाने हाकललंय म्हणून ते वेगळे झाले आहेत. काहींना तुरुंगात जाण्याची भीती आहे, म्हणून ते आपल्यासोबत आहेत. त्यांचा अजेंडा त्यांच्याकडे, आपला अजेंडा आपल्याकडे. मात्र, या दोन्ही अजेंड्यातून एकच गोष्ट समसमान आहे, ती म्हणजे त्यांनाही भाजपा आणि आरएसएसचं सरकार नको आहे, आणि आपल्यालाही भाजपा व आरएसएसचं सरकार नको आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.  

जितेंद्र आव्हाडांचं पत्र

वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू आहे, ते आमच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये असतील, असे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटले. तर, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन पत्र लिहून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबतच यावे, असा आग्रह केला आहे. संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले अमूल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया ! जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, असे जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांना उद्देशून म्हटलं आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस