शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

सर्दी, खोकला होताच उभा राहतोय नागरिकांच्या अंगावर काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:23 AM

कोरोनाच्या धास्तीने साधी सर्दी, खोकला झाला तरी अंगावर काटा उभा राहतो. डॉक्टरकडे जायचीही भीती वाटते. अनेक जण अशा स्थितीत घरगुती उपाय करून अंगावर आजार काढताना जिल्ह्यात दिसत आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाची धास्ती वातावरणातील बदलाने संसर्गजन्य आजारात वाढ

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वातावरणातील बदलाने अनेकांना सर्दी, खोकला, अंगदुखीसह तापाची लक्षणे जाणवत आहे. कोरोनाच्या धास्तीने साधी सर्दी, खोकला झाला तरी अंगावर काटा उभा राहतो. डॉक्टरकडे जायचीही भीती वाटते. अनेक जण अशा स्थितीत घरगुती उपाय करून अंगावर आजार काढताना जिल्ह्यात दिसत आहे. दवाखान्यात जावे तर कोरोना तपासणीची धास्ती आणि नाही जावे तर प्रकृती आणखी खालावते काय, याची चिंता.

भंडारा जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना बाधितांचा आकडा तीन हजार ७३६ वर शनिवारी पोहचला होता. तर ८० जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. अशातच वातावरणातील बदलाने विषाणूजन्य आजारांची लागण झाली आहे. तसेही दरवर्षी या महिन्यात सर्दी, ताप, खोकला होताच. त्यावर रुग्णालयात जावून उपचारही केला जातो. परंतु यावर्षी स्थिती वेगळी आहे. साध्या शिंका यायला सुरूवात झाली तर मनात नाना शंका घर करून बसतात. सर्दी आणि खोकला झाला तर भीतीत भर पडते आणि ताप आला तर कुठेतरी आपण कोणाच्या संपर्कात तर आलो नाही ना याचा दहादा विचार सुरू होतो. याचे कारण म्हणजे सध्या कोरोना संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव होय.

याच कारणाने अनेक जण अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला झाला तरी अंगावरच काढत आहे. एकीकडे सोशल मीडियातून कोरोनावर नीट उपचार होत नसल्याची ओरडच आहे. खासगी रुग्णालयात जावे तर अनेक डॉक्टरांचे दार बंद असते. विनंती केल्यानंतर तपासणी करायची म्हटले तरी आधी कोरोना टेस्टचा आग्रह केला जातो. हे सर्व माहित असतानाही नियमांचे पालन मात्र कुणी करताना दिसत नाही. मास्क वापरणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे केले आहे. प्रशासनाने दंडाची तरतूद केली आहे. त्यानंतरही अनेक जण मास्कशिवाय फिरताना दिसून येत आहे.

जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यासाठी माझे कुटुंब सुरक्षित कुटुंब मोहीम राबविली जात आहे. यासोबत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्हा रुग्णालयासह कोविड केअर सेंटरला भेट देवून तेथील पाहणी केली. प्रशासन गांभीर्याने कोरोना निर्मूलनासाठी प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र त्याला तडे देताना दिसत आहे. जिल्ह्यात गावागावांत जनता कर्फ्यू आयोजित करूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत कुठे घट होताना दिसतस नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नागरिक बिनधास्तपणे आजही फिरताना दिसून येतात.वैद्यकीय उपचार महत्वाचेकोणत्याही आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच त्यावर वैद्यकीय उपचार करणे गरजेचे आहे. अलिकडे अनेक जण दुखणे अंगावर काढताना दिसत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य साथ निर्माण झाली आहे. भंडारा शहरात आलेल्या पुरामुळेही अनेक जण आजारी पडले आहेत. अशा स्थितीत रुग्णांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबतच आजाराची लक्षणे दिसतातच तपासणी करणे महत्वाचे आहे. यासोबतच पुरेशी झोप, दैनंदिन योग प्राणायम, गरम पाणी प्राशन, बाहेरचे खाणे टाळणे, फल आहार वाढविणे आणि कुटुंबात आनंदी राहणे आवश्यक असल्याचे येथील साई क्लिनिकचे डॉ. दिलीप गुरीपुंजे यांनी सांगितले आहे. मनात कोणतीही शंका आली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणालेघरगुती उपचारावरच भरविषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज असते. परंतु शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे जाण्यासाठी अनेक जण टाळतात. तर खाजगी रुग्णालयात डॉक्टर प्रतिसाद देत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळेच आता अनेक जण घरच्या घरीच उपचार करताना दिसतात. विविध वनस्पतींचा काढा, हळदीयुक्त दूध, निंबू पाणी, मिठाच्या पाण्याच्या गोळ्या, अद्रकाचा चहा घेण्यावर नागरिकांचा भर आहे. घरातील एक जण आजारी पडला की दुसराही आजारी पडतो. त्यामुळे कोरोनाची धास्ती वाढत आहे. अशा स्थितीत नागरिकांनी लक्षणांना न घाबरता थेट डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार करण्याची खरी गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस