शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

कोका वन्यजीव अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:33 IST

यावर्षी अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत.

ठळक मुद्देपाण्याचे दुर्भिक्ष्य : मानव व वन्यजीव संघर्ष वाढीस, वन्यजीवांची भटकंती चिंताजनक

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : यावर्षी अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. कोका जवळील सोनकुंड वनतलावाच्या खोलीकरणावर जलयुक्त शिवार योजनेतून लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र दहा किमी परिसरातील उंच दºयाखोºयातून जलसंचय होणारा सोनकुंड वनतलाव कोरडा आहे. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य चिंतेचा विषय ठरत आहे.मागील दोन वर्षापासून कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाºया शेतकºयांसमोर यावर्षीही भिषण दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकºयांनी केलेली मेहनत वाया गेली असून हलक्या धानाची हजारों एकर शेती रोवणी अभावी पडीत आहे. पेरणी, नागरटी, खत, किटकनाशके, मजुरीचा पैसा शेतकºयांच्या माथ्यावर बसला आहे. परंतु अजूनही शासन-प्रशानाने नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे व मदतीचे आदेश दिलेले नाहीत. शेतकरी आर्थिक कंगाल झालेला असून नैरास्यातुन आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. मागील आठवड्यात तीन शेतकºयांनी दुष्काळी परिस्थितीला कंटाळून स्वत:ला संपविले. शासन शेतकºयांच्या नावाने विविध योजनांची घोषणा करीत असला तरी जमीनीवरील परिस्थिती वेगळीच आहे. कर्जमाफी, पीकविमा या बाबीच आता शेतकºयांना जाचक वाटू लागल्या आहेत. या योजनांचा फारसा फायदा होत नसल्याची ओरड दिवसेंदिवस वाढत चालली आहे.सन २०१३ मध्ये निर्मित कोका वन्यजीव अभयारण्यामुळे वन्यजीवांना सुरक्षीत अधिवास मिळाला. त्यामुळे वन्यजीवांची संख्या झपाट्याने वाढली. अभयारण्य वन्यजीवांसाठी सोयीसुविधा उभारण्यावर व पर्यटनाला चालना देण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र, अभयारण्याच्या बफरझोनमध्ये वन्यजीवांमुळे भितीचे वातावरण आहे. मानव व वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाळीव प्राण्यांचा फडसा व मनुष्य हाणीला सुध्दा सामोरे जावे लागत आहे.नागरिक सायंकाळी दहशतीत जीवन जगण्यास बाध्य आहेत. नागरिकांना दिलेले रोजगार निर्मितीचे व अन्य सोयीसुविधांचे आश्वासन पूर्ण करण्यात शासनप्रशासन अपयशी ठरल्याची बोंब गावागावात आहे.यावर्षी अत्यल्प पावसामुळे वन्यजीव व मानव यातील संघर्ष पराकोटीला पोहचण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अभयारण्यातील महत्वपूर्ण वनतलावात, बोड्यात नाल्यात पाण्याचा ठणठणाट आहे. जानेवारी २०१८ पर्यंतही पुरेल ऐवढे पाणी तलावात दिसून येत नाही. अभयारण्यातील बहुतक मोठ्या तलावांची हीच अवस्था आहे.साकोली ते पालोरा राज्यमार्गालगत असलेल्या सोनकुंड वनतलावाचे खोलीकरण जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. लाखोंचा खर्च यावर करण्यात आला. मात्र, खोलीकरण झालेल्या भागातही पावसाचे पाणी साठविलेले आहे. या तलावात जंगलटेकडींच्या दहा किमी परिसरातील पाण्याचा जलसंचय होत असतानाही भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचे दुभिक्ष्य चिंतेचा विषय असून वनाधिकाºयांनी आतापासूनच त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.