शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोका वन्यजीव अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:33 IST

यावर्षी अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत.

ठळक मुद्देपाण्याचे दुर्भिक्ष्य : मानव व वन्यजीव संघर्ष वाढीस, वन्यजीवांची भटकंती चिंताजनक

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : यावर्षी अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. कोका जवळील सोनकुंड वनतलावाच्या खोलीकरणावर जलयुक्त शिवार योजनेतून लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र दहा किमी परिसरातील उंच दºयाखोºयातून जलसंचय होणारा सोनकुंड वनतलाव कोरडा आहे. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य चिंतेचा विषय ठरत आहे.मागील दोन वर्षापासून कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाºया शेतकºयांसमोर यावर्षीही भिषण दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकºयांनी केलेली मेहनत वाया गेली असून हलक्या धानाची हजारों एकर शेती रोवणी अभावी पडीत आहे. पेरणी, नागरटी, खत, किटकनाशके, मजुरीचा पैसा शेतकºयांच्या माथ्यावर बसला आहे. परंतु अजूनही शासन-प्रशानाने नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे व मदतीचे आदेश दिलेले नाहीत. शेतकरी आर्थिक कंगाल झालेला असून नैरास्यातुन आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. मागील आठवड्यात तीन शेतकºयांनी दुष्काळी परिस्थितीला कंटाळून स्वत:ला संपविले. शासन शेतकºयांच्या नावाने विविध योजनांची घोषणा करीत असला तरी जमीनीवरील परिस्थिती वेगळीच आहे. कर्जमाफी, पीकविमा या बाबीच आता शेतकºयांना जाचक वाटू लागल्या आहेत. या योजनांचा फारसा फायदा होत नसल्याची ओरड दिवसेंदिवस वाढत चालली आहे.सन २०१३ मध्ये निर्मित कोका वन्यजीव अभयारण्यामुळे वन्यजीवांना सुरक्षीत अधिवास मिळाला. त्यामुळे वन्यजीवांची संख्या झपाट्याने वाढली. अभयारण्य वन्यजीवांसाठी सोयीसुविधा उभारण्यावर व पर्यटनाला चालना देण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र, अभयारण्याच्या बफरझोनमध्ये वन्यजीवांमुळे भितीचे वातावरण आहे. मानव व वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाळीव प्राण्यांचा फडसा व मनुष्य हाणीला सुध्दा सामोरे जावे लागत आहे.नागरिक सायंकाळी दहशतीत जीवन जगण्यास बाध्य आहेत. नागरिकांना दिलेले रोजगार निर्मितीचे व अन्य सोयीसुविधांचे आश्वासन पूर्ण करण्यात शासनप्रशासन अपयशी ठरल्याची बोंब गावागावात आहे.यावर्षी अत्यल्प पावसामुळे वन्यजीव व मानव यातील संघर्ष पराकोटीला पोहचण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अभयारण्यातील महत्वपूर्ण वनतलावात, बोड्यात नाल्यात पाण्याचा ठणठणाट आहे. जानेवारी २०१८ पर्यंतही पुरेल ऐवढे पाणी तलावात दिसून येत नाही. अभयारण्यातील बहुतक मोठ्या तलावांची हीच अवस्था आहे.साकोली ते पालोरा राज्यमार्गालगत असलेल्या सोनकुंड वनतलावाचे खोलीकरण जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. लाखोंचा खर्च यावर करण्यात आला. मात्र, खोलीकरण झालेल्या भागातही पावसाचे पाणी साठविलेले आहे. या तलावात जंगलटेकडींच्या दहा किमी परिसरातील पाण्याचा जलसंचय होत असतानाही भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचे दुभिक्ष्य चिंतेचा विषय असून वनाधिकाºयांनी आतापासूनच त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.