शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोका वन्यजीव अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:33 IST

यावर्षी अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत.

ठळक मुद्देपाण्याचे दुर्भिक्ष्य : मानव व वन्यजीव संघर्ष वाढीस, वन्यजीवांची भटकंती चिंताजनक

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : यावर्षी अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. कोका जवळील सोनकुंड वनतलावाच्या खोलीकरणावर जलयुक्त शिवार योजनेतून लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र दहा किमी परिसरातील उंच दºयाखोºयातून जलसंचय होणारा सोनकुंड वनतलाव कोरडा आहे. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य चिंतेचा विषय ठरत आहे.मागील दोन वर्षापासून कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाºया शेतकºयांसमोर यावर्षीही भिषण दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकºयांनी केलेली मेहनत वाया गेली असून हलक्या धानाची हजारों एकर शेती रोवणी अभावी पडीत आहे. पेरणी, नागरटी, खत, किटकनाशके, मजुरीचा पैसा शेतकºयांच्या माथ्यावर बसला आहे. परंतु अजूनही शासन-प्रशानाने नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे व मदतीचे आदेश दिलेले नाहीत. शेतकरी आर्थिक कंगाल झालेला असून नैरास्यातुन आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. मागील आठवड्यात तीन शेतकºयांनी दुष्काळी परिस्थितीला कंटाळून स्वत:ला संपविले. शासन शेतकºयांच्या नावाने विविध योजनांची घोषणा करीत असला तरी जमीनीवरील परिस्थिती वेगळीच आहे. कर्जमाफी, पीकविमा या बाबीच आता शेतकºयांना जाचक वाटू लागल्या आहेत. या योजनांचा फारसा फायदा होत नसल्याची ओरड दिवसेंदिवस वाढत चालली आहे.सन २०१३ मध्ये निर्मित कोका वन्यजीव अभयारण्यामुळे वन्यजीवांना सुरक्षीत अधिवास मिळाला. त्यामुळे वन्यजीवांची संख्या झपाट्याने वाढली. अभयारण्य वन्यजीवांसाठी सोयीसुविधा उभारण्यावर व पर्यटनाला चालना देण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र, अभयारण्याच्या बफरझोनमध्ये वन्यजीवांमुळे भितीचे वातावरण आहे. मानव व वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाळीव प्राण्यांचा फडसा व मनुष्य हाणीला सुध्दा सामोरे जावे लागत आहे.नागरिक सायंकाळी दहशतीत जीवन जगण्यास बाध्य आहेत. नागरिकांना दिलेले रोजगार निर्मितीचे व अन्य सोयीसुविधांचे आश्वासन पूर्ण करण्यात शासनप्रशासन अपयशी ठरल्याची बोंब गावागावात आहे.यावर्षी अत्यल्प पावसामुळे वन्यजीव व मानव यातील संघर्ष पराकोटीला पोहचण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अभयारण्यातील महत्वपूर्ण वनतलावात, बोड्यात नाल्यात पाण्याचा ठणठणाट आहे. जानेवारी २०१८ पर्यंतही पुरेल ऐवढे पाणी तलावात दिसून येत नाही. अभयारण्यातील बहुतक मोठ्या तलावांची हीच अवस्था आहे.साकोली ते पालोरा राज्यमार्गालगत असलेल्या सोनकुंड वनतलावाचे खोलीकरण जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. लाखोंचा खर्च यावर करण्यात आला. मात्र, खोलीकरण झालेल्या भागातही पावसाचे पाणी साठविलेले आहे. या तलावात जंगलटेकडींच्या दहा किमी परिसरातील पाण्याचा जलसंचय होत असतानाही भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचे दुभिक्ष्य चिंतेचा विषय असून वनाधिकाºयांनी आतापासूनच त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.