शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

जिल्ह्यात रेती तस्करीत कोट्यवधीची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

घाटावर १२ चक्का टिप्पर भरण्यासाठी २० हजार रूपये घेतली जातात. २२ बकेट जेसीबी रेती यात भरली जाते. साधारणत: शंभर ते दीडशे वाहने येथे भरली जातात. २० हजार रूपयाप्रमाणे एका दिवसाची होणारी रक्कम सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारी आहे. महिन्याभराच्या उलाढालीचा अंदाज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यात प्रचंड मेहनत आणि धोका रेती तस्करांना आहे.

ठळक मुद्देमहसुलाला चुना : तस्करीत अधिकारी-कर्मचारी मालामाल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महापुरानंतर जिल्ह्यात रेती तस्करीने मोठी उचल खाल्ली असून जिल्ह्यातील दहा ते बारा घाटांवर कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत आहे. जीव धोक्यात घालून रेती उपसणाऱ्या तस्करांपेक्षा अधिकारी-कर्मचारीच मालामाल होत असून शासनाच्या महसुलाला चुना लागत आहे. पवनी, तुमसर तालुक्यात खुलेआम रेती सुरू असून कितीही तक्रार केली तरी तस्करी थांबायचे नाव घेत नसल्याचा अनुभव आहे.भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीची रेती विदर्भासह मध्यप्रदेशात प्रसिद्ध आहे. उच्च दर्जाच्या रेतीसाठी येथील घाट ओळखले जातात. ऑगस्ट महिन्यात झालेल्या महापुरानंतर घाट रेतीने तुडूंब भरले आहे. त्यावर आता तस्करांची नजर गेली आहे. जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नसताना खुलेआम रेतीतस्करी होत आहे. पवनी तालुक्यातील गुडेगाव, जुनोना, एनोडा, भोजापूर, तुमसर तालुक्यातील रोहा, बेटाळा, पांजरा आणि भंडारा तालुक्यातील खमारी, कोथूर्ना, बेलगाव घाटावर तस्करांची यात्रा भरली आहे.दररोज शेकडो वाहनातून रात्रीच्यावेळी रेतीची तस्करी होत आहे. हा सर्व प्रकार एवढा बिनबोभाट सुरू असल्याने याला महसूल आणि पोलिसांचे अभय निश्चितच असावे, असा कयास सर्वांना आहे.घाटावर १२ चक्का टिप्पर भरण्यासाठी २० हजार रूपये घेतली जातात. २२ बकेट जेसीबी रेती यात भरली जाते. साधारणत: शंभर ते दीडशे वाहने येथे भरली जातात. २० हजार रूपयाप्रमाणे एका दिवसाची होणारी रक्कम सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारी आहे. महिन्याभराच्या उलाढालीचा अंदाज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यात प्रचंड मेहनत आणि धोका रेती तस्करांना आहे. त्यांना यातील मोबदला मिळत असला तरी रेतीचे पाट गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत आणि तेथून वरिष्ठांपर्यंत वाहतात. त्यामुळे शासनाच्या महसुलाला कोट्यवधीचा चुना लागत असला तरी कोणतीच कारवाई होत नाही. घाटाशेजारच्या गावांनी आक्रमक पवित्रा घेतला तर गाव विकासाच्या नावावर पैसे देवून गावपुढाऱ्यांची बोलती बंद केली जाते.रेती तस्करांनी गत १५ दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. नागपूर आणि मध्यप्रदेशात रेती दिवसाढवळ्या पोहचविली जात आहे. यासाठी रेती तस्करांचे मोठे नेटवर्क रस्त्यांवर काम करताना दिसून येते. धाड टाकण्यासाठी कुणी येत असल्यास अवघ्या काही वेळातच त्याची माहिती घाटापर्यंत पोहचते.रेतीचा दर पाच पट वाढलाजिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव झाला असता तर रेतीचे दर गगणाला भीडले नसते. सध्या रेती पाच पट महाग दराने सर्वसामान्यान्यांना घ्यावी लागत आहे. साधारणत: एक ट्रॅक्टर रेतीसाठी सध्या पाच हजार रूपये मोजावे लागतात. मात्र घाटांचा लिलाव झाला असता तर रॉयल्टी आणि वाहतुकीच्या खर्चात हीच रेती दीड हजारात मिळाली असती. तसेच शासनाला महसूलही मोठ्या प्रमाणात मिळाला असता. परंतु घाट लिलावाचे भीजत घोंगडे कायम आहे. खनिकर्म विभागही डोळ्याला पट्टी बांधून आहे.

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया