शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कार्यालयावर संतप्त ग्रामस्थांचा हल्लाबोल

By admin | Updated: October 11, 2014 22:58 IST

वाढत्या वीज भारनियमनामुळे अंतिम टप्प्यातील धानपिकांना वाचविण्यासाठी विहिरीचे पाणी देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सावरी आणि लाखांदूर येथील ग्रामस्थांनी वीज

उद्रेक भारनियमनाचा : सावरीत तोडफोड, लाखांदुरात आक्रोशजवाहरनगर/लाखांदूर : वाढत्या वीज भारनियमनामुळे अंतिम टप्प्यातील धानपिकांना वाचविण्यासाठी विहिरीचे पाणी देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सावरी आणि लाखांदूर येथील ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयावर हल्लाबोल केला. सावरी येथे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारला विद्युत कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी अज्ञात नागरिकांविरूध्द जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.पेंच पाटबंधारे प्रकल्पांतर्गत खरबी (नाका) परिसरातील शेतीला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र कालव्यांची दैनावस्था, नहरात झुडपे वाढल्याने पाण्याचा पुरवठा होत नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे विहिरीवर व नाल्यातून पाणीपुरवठा करण्यासाठी मोटारपंप लावण्यात येते मात्र सावरी, इंदिरानगर, राजेदहेगाव, खराडी, खरबी, परसोडी, नांदोरा या परिसरात आठ तास भारनियमनामुळे शेतीला पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत आहे. विद्युत विभाग व पाटबंधारे विभागाला सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी संतप्त नागरिकांनी सकाळी १० वाजता सावरी येथील विद्युत कार्यालयावर हल्लाबोल केला. त्यावेळी शाखा अभियंता उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी टेबलावरील कागदपत्र खाली फेकून खुर्च्यांची व दर्शनी फलकाची तोडफोड केली. आसोला आणि आथली येथील शेतकऱ्यांचा हल्लाबोललाखांदूर : दिवसाचे भारनियमन व रात्रपाळीत केल्यामुळे वैतागलेल्या आसोला आणि आथली येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी रात्री लाखांदूर विद्युत कार्यालयावर हल्लाबोल केला. संपूर्ण चौरास भागात धानपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. कृषी पंपाचीही संख्या सर्वाधिक आहे. धानपीक अंतिम टप्प्यात असताना विद्युत विभागाने भारनियमन सुरू केले आहे. दिवसाचे भारनियमन करुन रात्री १२ वाजेनंतर केवळ सहा तास विद्युत पुरवठा पुरविण्याचा निर्णय घेतल्याने हातचे पीक जाणार म्हणून शेतकऱ्यांनी विद्युत विभागाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत कार्यालयावर हल्लाबोल केला. दिवसा कृषी पंपाचे भारनियमनाचे कारण सांगून बंद केला जातो. ऐन धान गर्भात असताना रात्री १२ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा केवळ सहा तासाकरिता सुरु केला जातो. पिकाला पाणी देण्यासाठी हा वेळ अत्यल्प असल्याने चौरास भागातील धानपिक धोक्यात आले आहे. आसोला व आथली येथील शेतकऱ्यांनी भारनियमनाला कंटाळून अधिकाऱ्यांना घेराव करण्यासाठी तयारी केली होती. कनिष्ठ अभियंता देवगडे व वरिष्ठ अभियंता राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, भारनियमन बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी माघार घेतली. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)