शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही ‘शिल्पा’च्या मृतदेहाची फरफट

By admin | Updated: February 22, 2015 00:30 IST

शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मृत्युमुखी पडलेल्या शिल्पाच्या मृतदेहावर अंत्यसंकारासाठी तब्बल २४ तासांचा कालावधी लागला. दरम्यान, शिल्पाच्या मृतदेहाला अंत्यविधी ...

प्रशांत देसाई  भंडाराशुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मृत्युमुखी पडलेल्या शिल्पाच्या मृतदेहावर अंत्यसंकारासाठी तब्बल २४ तासांचा कालावधी लागला. दरम्यान, शिल्पाच्या मृतदेहाला अंत्यविधी स्थळापर्यंत पोचण्यासाठी पवनी ते भंडारा आणि भंडारा ते पवनी असा चार वेळा प्रवास करावा लागला.वलनी येथील शिल्पा जांभुळकरचा शुक्रवारी सकाळी निर्दयपणे खून झाला होता. पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त जमावाने मृतदेह सहा तास उचलला नाही. शवविच्छेदनासाठी भंडारा व येथून वलनी अशा चार फेऱ्या मृतदेहाला घालाव्या लागल्या. अंत्यसंस्कारासाठी या मृतदेहाला २०० कि़मी. चा प्रवास करावा लागल्याने मेंदूच्या झिणझिण्या उडाल्या. आसगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या शिल्पावर गावातीलच देवा गभनेने कोयत्याने हल्ला करून हत्या केली. याची माहिती होताच मृतकाचे नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून पोलीस प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. पवनी पोलिसांनी या प्रकरणाची वेळीच दखल घेतली असती तर शिल्पा हत्याकांड घडले नसते, असा आरोप नातेवाईकांनी करून एसडीपीओ, पोलीस निरीक्षक व दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मागणी केली. निलंबन होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा निर्णय कुटुंबीयांनी घेतल्याने सहा तास मृतदेह घटनास्थळावर पळून होता. घटनेला काही राजकीय पक्षानी वळण देवून नातेवाईकांच्या भावना रेटून धरल्या. पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेऊन मृतदेह शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उत्तरीय तपासणीकरिता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. येथे शिवसैनिकांनी शिल्पाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मागणी केली. तणावाच्या परिस्थितीत पोलीस बंदोबस्तात शिल्पाचे रात्री शवविच्छेदन करण्यात आले. रात्री १० वाजताच्या सुमारास कडक पोलीस बंदोबस्तात शिल्पाचा मृतदेह वलनी येथे नेला. मात्र गावकऱ्यांमध्ये असलेला असंतोष बघून पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मृतदेह पून्हा भंडाऱ्याला आणला. सकाळपासून रात्रीपर्यंत शिल्पाच्या मृत्युनंतरही तिच्या मृतदेहाचीही अवहेलना सुरूच होती. आज सकाळपासून ग्रामस्थ व नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी रेटून धरत खैरी चौरस्ता रोखून धरला. अशास्थितीत शिल्पाचा मृतदेह भंडारा सामान्य रुग्णालयातील शवगृहात पडून होता. वलनी फाट्यावर रास्तारोको करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून दंगा नियंत्रण पथकाला चौरस्त्यावर तैनात केले होते. जिल्हा अधिक्षक कैलास कणसे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळ गाठून मृतकाच्या नातेवाईकाला व जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी तणाव निवळल्यानंतर मृतदेह भंडारा येथून वलनी येथे नेण्यात आला व सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तणावपूर्ण स्थितीत व शोकाकूल वातावरणात तिच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पवनी ते भंडारा व भंडारा ते पवनी मार्गे वलनी असा २०० कि़मी.चा चार फेऱ्यांचा प्रवास केल्यानंतर तब्बल २४ तासानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.