शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

एसटीतील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली; १२५६ जणांनी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

भंडारा विभागात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी या सहा आगारांचा समावेश आहे. आगार स्तरावर चालक, वाहक, तांत्रिक आणि प्रशासकीय असे १४४३ कर्मचारी कार्यरत आहेत. महिनाभरापासून कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यापैकी १७८ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला नाही. परंतु, या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर बससेवा सुरू करणे अडचणीचे जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटायचे नाव घेत नाही. शहरी आणि ग्रामीण प्रवासी यामुळे त्रस्त झाले आहेत. अशातच शासनाने वेतनवाढ घोषित केली, तरी कर्मचारी मात्र संपावर कायम आहेत. भंडारा विभागातील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली असून ते कामावर हजर आहेत. तर १२६५ कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.भंडारा विभागात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी या सहा आगारांचा समावेश आहे. आगार स्तरावर चालक, वाहक, तांत्रिक आणि प्रशासकीय असे १४४३ कर्मचारी कार्यरत आहेत. महिनाभरापासून कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यापैकी १७८ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला नाही. परंतु, या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर बससेवा सुरू करणे अडचणीचे जात आहे. गत तीन दिवसांपासून केवळ साकोली आगारातून दोन बसफेऱ्या भंडारासाठी निघत आहेत. इतर आगाराच्या बसेस ठप्प आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना बाहेरगावी जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खासगी गाड्यांची सवय झाली

महिनाभरापासून एसटीचा संप आहे. बाहेरगावी जायचे म्हटले तर मोठा प्रश्न आहे. परंतु आता खासगी गाड्या मिळतात. दोन पैसे जास्त द्यावे लागत आहेत. परंतु, आता खासगी गाड्यांशिवाय पर्याय नाही. महामंडळाने तत्काळ संप मागे घ्यावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खासगी वाहनात अपघाताची भीती कायम असते. संप कधी मिटणार हा प्रश्न आहे.-महेश कुंभारे, प्रवासी

एसटी सेवा बंद असल्याने आमचा शेतमाल शहरापर्यंत नेणे अडचणीचे जात आहे. अनेकदा शेतात पिकलेला भाजीपाला आम्ही बसद्वारे भंडारापर्यंत पाठवित होतो. आता खासगी वाहनात भाजीपाला पाठवावा लागतो. परंतु खासगी वाहनधारक पैसेही अधिक घेतात आणि अनेकदा नकार देतात. एसटीचा संप लवकर मिटल्यास सर्वांना दिलासा मिळेल.-धनराज कायते, टेकेपार

प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आता सामोपचाराची भूमिका घ्यायला हवी. महिनाभरापासून बससेवा बंद आहे. महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. आधीच घाट्यात असलेली एसटी यामुळे आणखी रसातळाला जाईल. कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी कामावर हजर व्हावे. आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिलाच पाहिजे. परंतु प्रवाशांची गैरसोयही टाळणे तेवढेच महत्त्वाचे आहे. -डाॅ.चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक नियंत्रक

१९८ कर्मचारी निलंबित- भंडारा विभागातील १९८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले तर रोजंदारी ८६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली आहे.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप